शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
2
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
3
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
4
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
5
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
6
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
7
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
8
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
9
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
11
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
12
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
13
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
14
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
15
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
16
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
17
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
18
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
19
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
20
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!

भाजपमध्ये खरेच खतखते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 07:58 IST

मनोहर पर्रीकर यांचे निधन झाल्यानंतरच्या काळापासून विविध राजकारण्यांना पर्रीकरांविषयी जास्तच प्रेम वाटू लागले आहे.

मनोहर पर्रीकर यांचे निधन झाल्यानंतरच्या काळापासून विविध राजकारण्यांना पर्रीकरांविषयी जास्तच प्रेम वाटू लागले आहे. पर्रीकर हयात होते, राज्य कारभार चालवत होते त्यावेळी काही राजकारणी काय बोलत होते व नंतर काय बोलू लागलेत, याची असंख्य उदाहरणे जनतेसमोर आहेत. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीवेळी रमेश तवडकर यांना काणकोणमध्ये भाजपने तिकीट नाकारले होते. अर्थात त्यावेळी तिकीटवाटपाचे सर्वाधिकार त्या वेळचे केंद्रीय मंत्री पर्रीकर यांनाच होते. लक्ष्मीकांत पार्सेकर त्यावेळी मुख्यमंत्रिपदी होते, तरी त्यावेळी तिकीटवाटप कसे व्हायचे हे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर व त्यावेळच्या कोअर टीमलाही ठाऊक असेल. तिकीट नाकारल्याने तवडकर भाजप सोडून अपक्ष लढले होते. साहजिकच त्यांच्या वाट्याला पराभव आला. तिकीट नाकारले तरी, भाजपमध्येच राहीन आणि पक्षाची सेवा करीन, असा उदात्त किंवा राष्ट्रप्रेमाचा विचार तेव्हा तवडकर यांनी केला नव्हता, हा भाग वेगळा.

तवडकर २०२२ साली निवडून आले. भाजपने तिकीट देऊन स्वतःची चूक सुधारली. मात्र, अलीकडे तवडकर यांच्याकडून जी विधाने केली जात आहेत, त्यातून भाजपमधील शिस्तीला तडे जाणार नाहीत ना, असा प्रश्न निर्माण होतो. अर्थात पक्षात आता पूर्वीसारखी शिस्त राहिलेलीच नाही. माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी मध्यंतरी गोवा सरकारचे वस्त्रहरण केले. त्यानंतर त्यांनी यू-टर्न घेतला हा वेगळा विषय. अलीकडे बाबू आजगावकर व प्रवीण आर्लेकर यांच्यात वाद रंगलाय. मध्यंतरी मंत्री गोविंद गावडे व सभापती तवडकर यांच्यातील युद्ध सर्वांनीच अनुभवले. प्रसंगी सभापतिपद सोडेन, असा इशारा तवडकर यांना द्यावा लागला होता. गेल्या आठवड्यात मायकल लोबो आणि जोशुआ डिसोझा या दोन्ही भाजप आमदारांनी एकमेकांना जाहीरपणे आव्हान दिले. एकंदरीत भाजपमधील शिस्तीच्या सध्या चिंधड्या उडविल्या जात आहेत. नवे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांना हे पाहावे लागत आहे. अधूनमधून मंत्री विश्वजित राणे आपले बाण चातुर्याने सोडतात. भाजप-मगो युती कायम राहायलाच हवी, असा मुद्दा ते मांडतात; तर मुख्यमंत्री सावंत युती कशीही करा; पण, मांद्रेची जागा भाजप सोडणार नाही, असे बजावतात.

तवडकर यांनी दोनच दिवसांपूर्वी जाहीर कार्यक्रमात मोठे विधान केले. भाजपमध्ये आता मिक्स भाजी आणि खतखते झालेले आहे, असे तवडकर म्हणाले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. निष्ठावान कार्यकर्ते आता भाजपमध्ये शोधूनही सापडेनासे झाले आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. श्रमधाम उपक्रमासंबंधीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी एक प्रकारे आक्रमक भूमिका घेतली. भाजपमध्ये विविध ठिकाणांहून नेते, कार्यकर्ते यांची आयात सुरू आहे, हे तवडकर यांना मान्य नसावे; हे त्यांच्या नाराजीवरून कळून येते. तवडकर यांना लवकर एकदा मंत्रिमंडळाची फेररचना झालेली हवी आहे. मंत्री गावडे यांच्याशी त्यांचे पटण्याचा प्रश्नच येत नाही. प्रियोळमध्ये तवडकर अनेकदा जातात, ही गोष्ट गावडे यांनाही खटकते. तवडकर यांची दीपक ढवळीकर तसेच माजी आमदार दयानंद सोपटे यांच्याशी दोस्ती वाढली आहे, हे भाजपच्या कोअर टीमच्याही लक्षात आले आहे. मनोहर पर्रीकर आमच्यातून लवकर जातील, असे कुणालाही वाटले नव्हते. पर्रीकर यांना मानणारा मोठा वर्ग होता. त्यामुळे कार्यकर्ते निरपेक्ष भावनेने काम करायचे, असे तवडकर म्हणाले. पर्रीकरांच्या निधनानंतर भाजपमध्ये स्थिती बदलली. आता तर मिक्स भाजी आणि खतखतेच झाले आहे, असे निरीक्षण तवडकर यांनी नोंदविले आहे.

तवडकर यांच्या भूमिकेविषयी भाजपचे नेतृत्व काय तो विचार करील. शेवटी पक्षात नेत्यांची, कार्यकर्त्यांची आयात करण्याचे निर्णय दिल्लीतच होतात. भाजपने सर्व राज्यांत गेल्या १० वर्षांत तेच केले आहे. मग, गोव्यातच मिक्स भाजी व खतखते झाले, असे कसे म्हणता येईल? पक्षाची वाढ अशाच प्रकारे झालेली आहे. काहीवेळा असे करताना निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होतो, ही गोष्ट खरी. तवडकर खोटे बोलले, असे मुळीच नाही. त्यांनी सत्यच अधोरेखित केले; पण, ते आता सांगण्याची वेळ का आली, हा प्रश्न येतोच. मध्यंतरी त्यांनी मंत्रिमंडळ फेररचना १५ दिवसांत होईल, अशा अर्थाचे विधानही केले होते. मात्र, अजून तरी फेररचना झालेली नाही.

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण