शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
6
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
7
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
8
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
9
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
10
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
11
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
12
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
13
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
14
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
15
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
16
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
17
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
18
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
19
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
20
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)

माणसांच्या जीवाला, इथे मोल नाही का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 08:43 IST

या पापाचे प्रायश्चित्त खरे म्हणजे संबंधित सरकारी यंत्रणेनेच घ्यायला हवे. होय, हे पापच आहे. 

सांगे येथील पुलावरून एक कार सोमवारी रात्री नदीत कोसळली. त्यात महिलेसह तिच्या दोन वर्षीय तान्हुल्याचा बळी गेला. अत्यंत हृदयद्रावक, मनाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेमुळे तरी गोवा सरकारच्या यंत्रणेला जाग यायला हवी. सरकारी यंत्रणांचे काळीज जेव्हा दगडाचे होऊन जाते तेव्हा गरिबांनाच फुकट मरावे लागते. महिला, तिचा पती आणि मूल असा तिघांचा जीव गेला. या पापाचे प्रायश्चित्त खरे म्हणजे संबंधित सरकारी यंत्रणेनेच घ्यायला हवे. होय, हे पापच आहे. 

ही घटना मानवनिर्मित मानून संबंधित यंत्रणेविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करायला हवा होता. तारीपाटो येथे पुलाच्या दोन्ही बाजूने संरक्षक कठडे नाहीत, ते कठडे असते तर कदाचित कार खाली पडली नसती. पावसाळ्यात रात्रीच्या वेळी नदीच्या ठिकाणी आजूबाजूचे काही दिसत नाही. कधी झाडी वाढलेली असते, तर बहुतेकदा पुलावर किंवा रस्त्याकडेला दिवाबत्तीची सोय नसते. खांबांवरील वीजदिवे पेटत नाहीत. गोव्यातील ग्रामीण भागात मुक्तीनंतरच्या साठ वर्षांत देखील अशीच स्थिती आहे. काणकोण, केपे, सांगे व सत्तरी तालुक्यांतील काही गावांतील लोकांना अजूनही मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. काणकोणमधील एका गावातील लोकांना साध्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जायचे असेल तर ३२ किलोमीटर चालावे लागते. मुलांना शाळेत जाण्यासाठीही अनेक किलोमीटर चालावे लागते. 

सांगेसह अनेक तालुक्यांतील छोट्या पुलांना कठडे नाहीत, रस्त्यांवर वीजदिव्यांची सोय नाही. सर्वच राज्यकर्त्यांना या स्थितीची लाज वाटायला हवी. शेकडो कोटी रुपयांची सोहळ्यांवर उधळपट्टी करणाऱ्या सावंत सरकारने तारीपांटो येथील त्या दुर्दैवी पुलावर आता तरी तातडीने कठड्यांची व्यवस्था करावी. मंत्र्यांसाठी लाखो रुपयांच्या कार खरेदी करणाऱ्या सरकारने तसेच आमदारांचे वेतन वाढवा, अशी मागणी करणाऱ्या दिगंबर कामत यांच्यासारख्या नेत्याने सांगेतील या दुर्दैवी घटनेसाठी डोळ्यांतून दोन अश्रू ढाळले तर बरे होईल.कुमयामळ सांगे येथे राहणाऱ्या नाईक कुटुंबाचा सोमवारच्या अपघाताने बळी घेतला. रात्री आठच्या सुमारास या कुटुंबाची कार पुलावरून नदीत गेली. त्यात पती, पत्नी व लहान मूल असा तिघांचा जीव गेला. 

गोव्यात अशा घटना सहसा घडत नाहीत. महाराष्ट्र व अन्य मोठ्या राज्यांतील गरीब व मागास जिल्ह्यांमध्ये अशा घटना घडत असतात. सांगेतील घटनेने गोव्यातील संवेदनशील लोकांचे काळीज खरोखर हलले. सोमवारी पहिल्या रात्री आई व मुलाचा मृतदेह मिळाला. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी मुलाचे वडील मिलिंद नाईक यांचा मृतदेह सापडला. अरेरे, असे व्हायला नको होते, अशी प्रतिक्रिया लोकांमध्ये व्यक्त झाली. घरी राहिलेली मुलगी वाचली. असा मृत्यू कुणाच्याच वाट्याला येऊ नये. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याने जागे होण्याची वेळ आली आहे. स्थानिक ग्रामपंचायत आणि बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना पुलासाठी संरक्षक कठड्याची तातडीने सोय करावी लागेल. मुख्यमंत्री सावंत यांनी किंवा सांगेचे आमदार तथा मंत्री सुभाष फळदेसाई यांनी पोर्तुगीजकालीन खुणा पुसण्याच्या मागे नंतर लागावे, अगोदर लोकांचे जीव वाचविण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उभ्या केल्या तर गोव्यावर उपकार होतील.

हळदोणा मतदारसंघातील कालवी येथे फेब्रुवारी २०१२ मध्ये घडलेल्या मोठ्या दुर्घटनेची आठवण काल अनेकांना झाली. विधानसभा निवडणुकीपूर्वी बस नदीत पडून सहा जणांचा बळी गेला होता. त्यात आठ ते दहा वर्षांच्या चार विद्यार्थिनी होत्या. पूर्ण गोवा हादरला होता. त्यावेळी जनभावना एवढी संतप्त होती की, आमदार दयानंद नार्वेकर यांचा २०१२च्या निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर नार्वेकर पुन्हा विधानसभेत पोहोचलेच नाहीत, हा वेगळा मुद्दा. गोव्यातील सर्व छोट्या व मोठ्या पुलांचे सर्वेक्षण करून कठडे उभारण्याचे काम आता तरी बांधकाम खात्याने करावे. कमकुवत झालेले कठडे नव्याने बांधून द्यावे.

टॅग्स :goaगोवा