शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

'कदंब' चा प्रवास सुरक्षित आहे? महामार्गावर अचानक बंद पडणाऱ्या गाड्यांमुळे प्रवासी साशंक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 08:34 IST

बसेस बंद पडण्याच्या प्रकारांत वाढ झाल्याने लोकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गेल्या काही महिन्यांपासून कदंब महामंडळाच्या बसेस भर रस्त्यातच बंद होण्याचे प्रकार समोर आले आहेत. यातून महामंडळाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. बसेस बंद पडण्याच्या प्रकारांत वाढ झाल्याने लोकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

महामंडळ यावर कोणतीही ठोस उपाययोजना करण्याऐवजी विषय टाळण्यातच येत आहे. कदंब महामंडळ हे सरकारचे सर्वात जुने महामंडळ आहे. गाव, शहर याने जोडले जात आहे; परंतु गेल्या काही वर्षात हळूहळू कदंब बसेसचा दर्जा खालावल्याचेही चित्र आहे. अनेक घटना गेल्या काही वर्षांमध्ये घडल्या आहेत ज्यामुळे शंका निर्माण होते.

शालेय बसेस बंद

गावात, शहरांमध्ये सेवा देणाऱ्या बसेस प्रवासादरम्यान बंद पडण्याचे प्रकार समोर आले आहेच; परंतु गेल्या काही काळात शालेय मुलांना ये-जा करणाऱ्या कदंब गाड्याही बंद पडल्या होत्या. त्यानंतर दुरुस्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु याचा त्रास मात्र विद्यार्थी, पालकांना झाला.

महामंडळाकडे ५०० जुन्या गाड्या

इलेक्ट्रिक बसेसचा काळ सुरु असताना कदंब महामंडळ अद्याप इतरांच्या तुलनेत खूप मागे आहे. त्यांच्याकडे सुमारे ५०० जुन्या कदंब बसेस आहे, तर १५० इलेक्ट्रिक बसेस आहेत. अजून काही नवीन इलेक्ट्रिक बसेस आणण्याचा महामंडळाचा विचार आहे; पण याला अजून किती वेळ लागणार हे सांगता येत नाही.

दरवर्षी ३० बसेस होणार स्क्रॅप

केंद्र सरकारची नवी स्क्रॅप पॉलिसी कदंब महामंडळाला अडथळा ठरणार असल्याचे चित्र आहे. स्क्रॅप पॉलिसी अंतर्गत १५ वर्षे जुनी वाहने स्क्रॅप करावी लागत आहे. या अनुषंगाने कदंबच्या प्रत्येक वर्षाला सुमारे ३० बसेस स्क्रॅप होणार आहेत.

कदंब बसेसने पूर्वी प्रवास सुखकर व्हायचा; पण आता तसे होत नाही. अनेकदा बसेस भर रस्त्यात बंद पडतात, तसेच लोकांना पर्यायी बसेस पोहोचविण्यास महामंडळ अपयशी ठरले आहे.- रक्षंदा ठाकूर, प्रवासी, म्हापसा

कदंब महामंडळ देखरेखीच्या बाबतीत खूप मागे आहे. काही बसेसमध्ये बसायला व्यवस्थित आसनव्यवस्थादेखील नाही. तसेच चालकही आपल्याच धुंदीत वाहन चालवत असतात. - जगदीश कारापूरकर, प्रवासी, वास्को

 

टॅग्स :goaगोवाstate transportएसटी