शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

आणीबाणीविषयक अडवाणींच्या त्या विधानातून प्रेरणा - भाजप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 20:30 IST

देशात पुन्हा आणिबाणी लादली जाऊ शकते, अशा प्रकारची भीती व्यक्त करणारे विधान दोन-तीन वर्षापूर्वी भाजपचे राष्ट्रीय नेते लालकृष्ण अडवाणी यांनी करून देशात खळबळ उडवून दिली होती.

पणजी - देशात पुन्हा आणिबाणी लादली जाऊ शकते, अशा प्रकारची भीती व्यक्त करणारे विधान दोन-तीन वर्षापूर्वी भाजपचे राष्ट्रीय नेते लालकृष्ण अडवाणी यांनी करून देशात खळबळ उडवून दिली होती. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस मुरलीधर राव यांनी मात्र अडवाणी यांच्या त्या विधानातूनच भाजपने प्रेरणा घेतली व आता देशभर आम्ही 1975 सालच्या आणीबाणीशीनिगडीत आठवणी जागविण्याचा कार्यक्रम करत आहोत, असे मंगळवारी येथे सांगितले.

मुरलीधर राव यांनी भाजपच्या पणजीतील कार्यालयात प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर व खासदार नरेंद्र सावईकर यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. घराणोशाही व लोकशाही एकत्र राहू शकत नाही. राहुल गांधी यांना फक्त काँग्रेसमधील घराणोशाहीमुळे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद मिळाले आहे. त्या पक्षाचा लोकशाहीवर विश्वास नाही. लोकशाही त्या पक्षात किंचित देखील नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना अंतर्गत लोकशाही प्रक्रिया राबविण्याबाबत अधिक जबाबदार करण्याचा मार्ग शोधून काढावा, असे आवाहन आम्ही करत असल्याचे राव म्हणाले. भाजप हा एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे, ज्या पक्षात पूर्णपणो लोकशाही आहे, असेही राव म्हणाले. आणीबाणीविरुद्ध अडवाणी, वाजपेयी आदी अनेक नेते 1975 साली लढले. काँग्रेस सरकारने व तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी ती आणीबाणी लादली होती. सारा देश त्याविरुद्ध लढला. त्या संघर्षाबाबतचे विषय पाठय़पुस्तकात समाविष्ट करायला हवेत अशीही मागणी राव यांनी केली. 

 अडवाणी यांनी देशात पुन्हा आणीबाणी येऊ शकते असे विधान केले होते, असे पत्रकारांनी विचारताच मुरलीधर राव म्हणाले, की अडवाणी यांच्या त्या विधानातूनच आम्ही प्रेरणा घेऊन आता देशभर कार्यक्रम करत आहोत. या कार्यक्रमाच्यामागे अडवाणी यांचे विचार, स्फुर्ती व पाठींबा सर्व काही आहे. भारतीय जनता पक्ष कधीच कुठल्याच पक्षाला किंवा नेतृत्वाला किंवा नेत्याला देशात पुन्हा कधीच आणीबाणी लादू देणार नाही. लोकशाही हे भाजपचे प्राणत्त्व आहे. आम्ही कधीच कुणाला लोकशाहीवर हल्ला करू देणार नाही. केंद्रात काँग्रेसचे सरकार अधिकारावर असतानाच लोकशाहीवर सर्वाधिक हल्ले झाले. भाजपच्या तत्त्वज्ञानाचा आत्मा लोकशाही हाच आहे.

..........

टॅग्स :BJPभाजपाgoaगोवा