शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

आणीबाणीविषयक अडवाणींच्या त्या विधानातून प्रेरणा - भाजप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 20:30 IST

देशात पुन्हा आणिबाणी लादली जाऊ शकते, अशा प्रकारची भीती व्यक्त करणारे विधान दोन-तीन वर्षापूर्वी भाजपचे राष्ट्रीय नेते लालकृष्ण अडवाणी यांनी करून देशात खळबळ उडवून दिली होती.

पणजी - देशात पुन्हा आणिबाणी लादली जाऊ शकते, अशा प्रकारची भीती व्यक्त करणारे विधान दोन-तीन वर्षापूर्वी भाजपचे राष्ट्रीय नेते लालकृष्ण अडवाणी यांनी करून देशात खळबळ उडवून दिली होती. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस मुरलीधर राव यांनी मात्र अडवाणी यांच्या त्या विधानातूनच भाजपने प्रेरणा घेतली व आता देशभर आम्ही 1975 सालच्या आणीबाणीशीनिगडीत आठवणी जागविण्याचा कार्यक्रम करत आहोत, असे मंगळवारी येथे सांगितले.

मुरलीधर राव यांनी भाजपच्या पणजीतील कार्यालयात प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर व खासदार नरेंद्र सावईकर यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. घराणोशाही व लोकशाही एकत्र राहू शकत नाही. राहुल गांधी यांना फक्त काँग्रेसमधील घराणोशाहीमुळे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद मिळाले आहे. त्या पक्षाचा लोकशाहीवर विश्वास नाही. लोकशाही त्या पक्षात किंचित देखील नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना अंतर्गत लोकशाही प्रक्रिया राबविण्याबाबत अधिक जबाबदार करण्याचा मार्ग शोधून काढावा, असे आवाहन आम्ही करत असल्याचे राव म्हणाले. भाजप हा एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे, ज्या पक्षात पूर्णपणो लोकशाही आहे, असेही राव म्हणाले. आणीबाणीविरुद्ध अडवाणी, वाजपेयी आदी अनेक नेते 1975 साली लढले. काँग्रेस सरकारने व तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी ती आणीबाणी लादली होती. सारा देश त्याविरुद्ध लढला. त्या संघर्षाबाबतचे विषय पाठय़पुस्तकात समाविष्ट करायला हवेत अशीही मागणी राव यांनी केली. 

 अडवाणी यांनी देशात पुन्हा आणीबाणी येऊ शकते असे विधान केले होते, असे पत्रकारांनी विचारताच मुरलीधर राव म्हणाले, की अडवाणी यांच्या त्या विधानातूनच आम्ही प्रेरणा घेऊन आता देशभर कार्यक्रम करत आहोत. या कार्यक्रमाच्यामागे अडवाणी यांचे विचार, स्फुर्ती व पाठींबा सर्व काही आहे. भारतीय जनता पक्ष कधीच कुठल्याच पक्षाला किंवा नेतृत्वाला किंवा नेत्याला देशात पुन्हा कधीच आणीबाणी लादू देणार नाही. लोकशाही हे भाजपचे प्राणत्त्व आहे. आम्ही कधीच कुणाला लोकशाहीवर हल्ला करू देणार नाही. केंद्रात काँग्रेसचे सरकार अधिकारावर असतानाच लोकशाहीवर सर्वाधिक हल्ले झाले. भाजपच्या तत्त्वज्ञानाचा आत्मा लोकशाही हाच आहे.

..........

टॅग्स :BJPभाजपाgoaगोवा