शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

देशी पर्यटकांसाठी गोव्यातील किनारे असुरक्षित?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 12:40 IST

राज्यात वार्षिक सरासरी 50 ते 60 लाख पर्यटक गोव्यात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येतात.

विलास ओहाळ

पणजी : राज्यात वार्षिक सरासरी 50 ते 60 लाख पर्यटक गोव्यात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येतात. परंतु आंतरराष्ट्रीय पर्यटकांना येथील समुद्र किनारे सुरक्षित वाटत असले तरी, देशी पर्यटकांना असुरक्षित वाटतात. ‘इंटरनॅशनल जनरल ऑफ रिसर्च अँड अॅनेलिटिकल रिव्हिवज’ (आयजेआरएआर) या संस्थेच्या ताज्या अहवालात हा निष्कर्ष काढला आहे.  

डॉ. यास्मिन शेख यांनी ‘गोव्यातील पर्यटन-पर्यटकांचा दृष्टिकोन’ या मथळ्याखाली ‘आयजेआरएआर’ला प्रबंध सादर केला आहे. त्यांनी 400 देशी-विदेशी पर्यटकांची मनोगते जाणून घेतली आणि निरीक्षणे नोंदविली आहेत. प्रबंधात त्यांनी म्हटले आहे की, जवळपास 50 लाख विदेशी पर्यटक दरवर्षी गोव्यात येतात. ते किनारे असुरक्षित आहेत, असा कधी प्रसार करीत नाहीत. मात्र देशी पर्यटकांकडून किनारे असुरक्षित असल्याचा गवगवा केला जातो. 

राज्यातील किनाऱ्यावर बहुतांश पर्यटकांना दिवसा सुरक्षितत वाटते, रात्रीच्या वेळी असुरक्षित वाटते. किमान 62.19 टक्के देशी पर्यटकांना किनारे असुरक्षित वाटतात. उलट परदेशी पर्यटकांना रात्रीचे किनारे सुरक्षित वाटतात. डॉ. शेख यांच्या प्रबंधात इंग्लंडच्या 15 वर्षीय स्कार्लेट किलिंगच्या 2008 मधील हणजुणे किनाऱ्यावर झालेल्या मृत्यू प्रकरणावर प्रकाशझोत आहे. स्कार्लेटच्या मृत्यूनंतर विदेशी माध्यमांनी हा विषय चांगलाच चर्चिला होता. त्यावेळी गोव्यातील किनाऱ्यावर परदेशी पर्यटकांना सुरक्षित ठिकाण आहे का, अशी विचारणा माध्यमांतून केली जात असे. गोव्यात 21 वर्षात 245 परदेशी पर्यटकांचा मृत्यू झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने राज्य सरकारला याविषयी विशेष विभागाची निर्मिती करण्याची सूचना केली होती, याचाही उल्लेख या प्रबंधात आहे.

प्रबंधातील निवडक मुद्यांवर एक नजर..

1) पर्यटनासाठी सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. काही पर्यटकांनी वैद्यकीय सुविधा, पोलीस यंत्रणा यांच्याविषयीसुद्धा प्रश्न उपस्थित केले आहेत. 

2) किनाऱ्यावर रात्रीच्यावेळी गुन्हे घडू नयेत याकरिता रात्रीचा फिरता पहारा ठेवणे महत्त्वाचे आहे. पर्यटक सुरक्षित असतील तरच पर्यावरणही सुरक्षित राहील. 

3) ट्रॅव्हल अँड टुरिझमने सुरक्षिततेवर भर द्यावा आणि त्यांना ही चांगली संधीही आहे. महिलांना किनाऱ्यावर रात्रीच्यावेळी सुरक्षित वाटावे, यासाठी महिला पोलीस दलाची किनाऱ्यावर नियुक्ती करावी, तरच महिला पर्यटकांना सुरक्षित वाटेल आणिकिनाऱ्यावर गुन्ह्याच्या घडणाऱ्या घटनांनाही आळा बसेल.  

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन