शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

देशी पर्यटकांसाठी गोव्यातील किनारे असुरक्षित?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 12:40 IST

राज्यात वार्षिक सरासरी 50 ते 60 लाख पर्यटक गोव्यात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येतात.

विलास ओहाळ

पणजी : राज्यात वार्षिक सरासरी 50 ते 60 लाख पर्यटक गोव्यात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येतात. परंतु आंतरराष्ट्रीय पर्यटकांना येथील समुद्र किनारे सुरक्षित वाटत असले तरी, देशी पर्यटकांना असुरक्षित वाटतात. ‘इंटरनॅशनल जनरल ऑफ रिसर्च अँड अॅनेलिटिकल रिव्हिवज’ (आयजेआरएआर) या संस्थेच्या ताज्या अहवालात हा निष्कर्ष काढला आहे.  

डॉ. यास्मिन शेख यांनी ‘गोव्यातील पर्यटन-पर्यटकांचा दृष्टिकोन’ या मथळ्याखाली ‘आयजेआरएआर’ला प्रबंध सादर केला आहे. त्यांनी 400 देशी-विदेशी पर्यटकांची मनोगते जाणून घेतली आणि निरीक्षणे नोंदविली आहेत. प्रबंधात त्यांनी म्हटले आहे की, जवळपास 50 लाख विदेशी पर्यटक दरवर्षी गोव्यात येतात. ते किनारे असुरक्षित आहेत, असा कधी प्रसार करीत नाहीत. मात्र देशी पर्यटकांकडून किनारे असुरक्षित असल्याचा गवगवा केला जातो. 

राज्यातील किनाऱ्यावर बहुतांश पर्यटकांना दिवसा सुरक्षितत वाटते, रात्रीच्या वेळी असुरक्षित वाटते. किमान 62.19 टक्के देशी पर्यटकांना किनारे असुरक्षित वाटतात. उलट परदेशी पर्यटकांना रात्रीचे किनारे सुरक्षित वाटतात. डॉ. शेख यांच्या प्रबंधात इंग्लंडच्या 15 वर्षीय स्कार्लेट किलिंगच्या 2008 मधील हणजुणे किनाऱ्यावर झालेल्या मृत्यू प्रकरणावर प्रकाशझोत आहे. स्कार्लेटच्या मृत्यूनंतर विदेशी माध्यमांनी हा विषय चांगलाच चर्चिला होता. त्यावेळी गोव्यातील किनाऱ्यावर परदेशी पर्यटकांना सुरक्षित ठिकाण आहे का, अशी विचारणा माध्यमांतून केली जात असे. गोव्यात 21 वर्षात 245 परदेशी पर्यटकांचा मृत्यू झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने राज्य सरकारला याविषयी विशेष विभागाची निर्मिती करण्याची सूचना केली होती, याचाही उल्लेख या प्रबंधात आहे.

प्रबंधातील निवडक मुद्यांवर एक नजर..

1) पर्यटनासाठी सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. काही पर्यटकांनी वैद्यकीय सुविधा, पोलीस यंत्रणा यांच्याविषयीसुद्धा प्रश्न उपस्थित केले आहेत. 

2) किनाऱ्यावर रात्रीच्यावेळी गुन्हे घडू नयेत याकरिता रात्रीचा फिरता पहारा ठेवणे महत्त्वाचे आहे. पर्यटक सुरक्षित असतील तरच पर्यावरणही सुरक्षित राहील. 

3) ट्रॅव्हल अँड टुरिझमने सुरक्षिततेवर भर द्यावा आणि त्यांना ही चांगली संधीही आहे. महिलांना किनाऱ्यावर रात्रीच्यावेळी सुरक्षित वाटावे, यासाठी महिला पोलीस दलाची किनाऱ्यावर नियुक्ती करावी, तरच महिला पर्यटकांना सुरक्षित वाटेल आणिकिनाऱ्यावर गुन्ह्याच्या घडणाऱ्या घटनांनाही आळा बसेल.  

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन