शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

“भारत हिंदू राष्ट्र, भगवा देशाचा प्राण; हिंदू धर्मियांनी एकत्र येण्याची गरज”: संभाजी भिडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 09:26 IST

कोणीही भगव्या झेंड्याला विसरता कामा नये. हिंदू धर्मियांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे संभाजी भिडेंनी म्हटले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : भारत हे हिंदू राष्ट्र आहे आणि भगवा झेंडा हा देशाचा प्राण आहे. गोवा राज्य देशाचा हिस्सा असल्यामुळे कोणीही भगव्या झेंड्याला विसरता कामा नये. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी राष्ट्रध्वज तिरंगा बनविलेला आहे. हिरवा हा इस्लामिक रंग आहे. मुस्लिमांनी आपल्या देशावर ८०० वर्षे राज्य करून हिंदूवर बरेच अत्याचार केले आहेत, असे मत संभाजी भिडे यांनी मांडले.

दवर्ली येथील समर्थ गडावर आयोजित केलेल्या सभेत 'छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी गोमंतकातील मठ-मंदिर हिंदू धर्म रक्षणार्थ दिलेले योगदान आणि पोर्तुगीजकालीन विध्वंस झालेल्या मंदिरांची पुनर्स्थापना' या विषयावर ते बोलत होते.

गोव्यात हिंदू धर्मीयांनी एकत्र येऊन सुरुवातीला दोन हजार युवकांची एक तुकडी तयार करण्याची गरज आहे. नंतरच्या काळात एक-एक तरुण त्यांच्या तुकडीला जोडला जाऊन हिंदूंची मोठी फौज तयार होणार आहे. शिवनेरी किल्ल्यावर दरवर्षी मराठ्यांचा मेळावा भरत असतो. गोव्याच्या तुकडीने दरवर्षी शिवनेरीवर जाऊन मराठ्यांच्या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही भिडे यांनी केले.

रामायण, महाभारत, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र व युद्धाचे शिक्षण त्यांनी त्यांच्याकडून घेतले. शहाजी महाराज त्यांचे वडील. ते मोगलांकडे नोकरी करीत होते. तरी त्यांनी हिंदूंच्या रक्षणासाठी मोगलांविरुद्ध युद्ध पुकारले. हिंदवी स्वराज्य स्थापन करणे शहाजी महाराजांचे स्वप्न होते. शिवरायांनी १५ ते ३५ वर्षांत मोगलांशी युद्ध करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करून हिंदूंचे रक्षण केल्याचे त्यांनी सांगितले.

हिंदू धर्मीयांना आपल्या दबावाखाली ठेवले

इंग्रजांनी मोगलांकडून देश बळकावून घेऊन हिंदू धर्मीयांना आपल्या दबावाखाली ठेवले. कायद्यांत बदल केले. लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपीन पाल यांनी स्वातंत्र्याच्या लढ्याला सुरुवात केली. अखेर प्रदीर्घ काळानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले. हे हिंदूचे भाग्य समजावे लागेल. 

टॅग्स :goaगोवाSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी