शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

“भारत हिंदू राष्ट्र, भगवा देशाचा प्राण; हिंदू धर्मियांनी एकत्र येण्याची गरज”: संभाजी भिडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 09:26 IST

कोणीही भगव्या झेंड्याला विसरता कामा नये. हिंदू धर्मियांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे संभाजी भिडेंनी म्हटले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : भारत हे हिंदू राष्ट्र आहे आणि भगवा झेंडा हा देशाचा प्राण आहे. गोवा राज्य देशाचा हिस्सा असल्यामुळे कोणीही भगव्या झेंड्याला विसरता कामा नये. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी राष्ट्रध्वज तिरंगा बनविलेला आहे. हिरवा हा इस्लामिक रंग आहे. मुस्लिमांनी आपल्या देशावर ८०० वर्षे राज्य करून हिंदूवर बरेच अत्याचार केले आहेत, असे मत संभाजी भिडे यांनी मांडले.

दवर्ली येथील समर्थ गडावर आयोजित केलेल्या सभेत 'छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी गोमंतकातील मठ-मंदिर हिंदू धर्म रक्षणार्थ दिलेले योगदान आणि पोर्तुगीजकालीन विध्वंस झालेल्या मंदिरांची पुनर्स्थापना' या विषयावर ते बोलत होते.

गोव्यात हिंदू धर्मीयांनी एकत्र येऊन सुरुवातीला दोन हजार युवकांची एक तुकडी तयार करण्याची गरज आहे. नंतरच्या काळात एक-एक तरुण त्यांच्या तुकडीला जोडला जाऊन हिंदूंची मोठी फौज तयार होणार आहे. शिवनेरी किल्ल्यावर दरवर्षी मराठ्यांचा मेळावा भरत असतो. गोव्याच्या तुकडीने दरवर्षी शिवनेरीवर जाऊन मराठ्यांच्या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही भिडे यांनी केले.

रामायण, महाभारत, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र व युद्धाचे शिक्षण त्यांनी त्यांच्याकडून घेतले. शहाजी महाराज त्यांचे वडील. ते मोगलांकडे नोकरी करीत होते. तरी त्यांनी हिंदूंच्या रक्षणासाठी मोगलांविरुद्ध युद्ध पुकारले. हिंदवी स्वराज्य स्थापन करणे शहाजी महाराजांचे स्वप्न होते. शिवरायांनी १५ ते ३५ वर्षांत मोगलांशी युद्ध करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करून हिंदूंचे रक्षण केल्याचे त्यांनी सांगितले.

हिंदू धर्मीयांना आपल्या दबावाखाली ठेवले

इंग्रजांनी मोगलांकडून देश बळकावून घेऊन हिंदू धर्मीयांना आपल्या दबावाखाली ठेवले. कायद्यांत बदल केले. लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपीन पाल यांनी स्वातंत्र्याच्या लढ्याला सुरुवात केली. अखेर प्रदीर्घ काळानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले. हे हिंदूचे भाग्य समजावे लागेल. 

टॅग्स :goaगोवाSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी