शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

“भारत हिंदू राष्ट्र, भगवा देशाचा प्राण; हिंदू धर्मियांनी एकत्र येण्याची गरज”: संभाजी भिडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 09:26 IST

कोणीही भगव्या झेंड्याला विसरता कामा नये. हिंदू धर्मियांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे संभाजी भिडेंनी म्हटले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : भारत हे हिंदू राष्ट्र आहे आणि भगवा झेंडा हा देशाचा प्राण आहे. गोवा राज्य देशाचा हिस्सा असल्यामुळे कोणीही भगव्या झेंड्याला विसरता कामा नये. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी राष्ट्रध्वज तिरंगा बनविलेला आहे. हिरवा हा इस्लामिक रंग आहे. मुस्लिमांनी आपल्या देशावर ८०० वर्षे राज्य करून हिंदूवर बरेच अत्याचार केले आहेत, असे मत संभाजी भिडे यांनी मांडले.

दवर्ली येथील समर्थ गडावर आयोजित केलेल्या सभेत 'छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी गोमंतकातील मठ-मंदिर हिंदू धर्म रक्षणार्थ दिलेले योगदान आणि पोर्तुगीजकालीन विध्वंस झालेल्या मंदिरांची पुनर्स्थापना' या विषयावर ते बोलत होते.

गोव्यात हिंदू धर्मीयांनी एकत्र येऊन सुरुवातीला दोन हजार युवकांची एक तुकडी तयार करण्याची गरज आहे. नंतरच्या काळात एक-एक तरुण त्यांच्या तुकडीला जोडला जाऊन हिंदूंची मोठी फौज तयार होणार आहे. शिवनेरी किल्ल्यावर दरवर्षी मराठ्यांचा मेळावा भरत असतो. गोव्याच्या तुकडीने दरवर्षी शिवनेरीवर जाऊन मराठ्यांच्या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही भिडे यांनी केले.

रामायण, महाभारत, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र व युद्धाचे शिक्षण त्यांनी त्यांच्याकडून घेतले. शहाजी महाराज त्यांचे वडील. ते मोगलांकडे नोकरी करीत होते. तरी त्यांनी हिंदूंच्या रक्षणासाठी मोगलांविरुद्ध युद्ध पुकारले. हिंदवी स्वराज्य स्थापन करणे शहाजी महाराजांचे स्वप्न होते. शिवरायांनी १५ ते ३५ वर्षांत मोगलांशी युद्ध करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करून हिंदूंचे रक्षण केल्याचे त्यांनी सांगितले.

हिंदू धर्मीयांना आपल्या दबावाखाली ठेवले

इंग्रजांनी मोगलांकडून देश बळकावून घेऊन हिंदू धर्मीयांना आपल्या दबावाखाली ठेवले. कायद्यांत बदल केले. लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपीन पाल यांनी स्वातंत्र्याच्या लढ्याला सुरुवात केली. अखेर प्रदीर्घ काळानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले. हे हिंदूचे भाग्य समजावे लागेल. 

टॅग्स :goaगोवाSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी