शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

कायदा व्यवस्था कोलमडल्याने हल्ल्यात वाढ; ॲड. शिराेडकर यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 14:25 IST

सरकारने याची गंभीर दखल घेतली नाही तर याचा फटका पर्यटन व्यवसायावर हाेणार आहे. असे ॲड. हृदयनाथ शिराेडकर आणि महेश म्हांबरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. वेर्णा येथे रस्त्यावर एका रेंट अ कार चालक पर्यटकाला ६ युवकांनी केलेल्या बेदम मारहाणीचा त्यांनी निषेध केला. 

नारायण गावस 

पणजी: राज्यातील कायदा सुव्यवस्था कोलमडल्याने आज पर्यटकांवर तसेच स्थानिकांवर हल्ले हाेण्याच्याघटना वाढत आहेत. सरकारने याची गंभीर दखल घेतली नाही तर याचा फटका पर्यटन व्यवसायावर हाेणार आहे. असे ॲड. हृदयनाथ शिराेडकर आणि महेश म्हांबरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. वेर्णा येथे रस्त्यावर एका रेंट अ कार चालक पर्यटकाला ६ युवकांनी केलेल्या बेदम मारहाणीचा त्यांनी निषेध केला. 

ॲड. हृदयनाथ शिराेडकर म्हणाले, आज कुणालाच कायद्याची भिती नसल्याने लहान लहान गोष्टींवर मारहाण भांडणे हाेत आहेत. कुणाला पाेलिसांची भिती नाही. कारण प्रत्येक गोष्टीत राजकारणी दखल घेत आहेत. या राजकारण्यांच्या दबावामुळे पाेलीसही काही करत नाही. आज जर राज्यातील पर्यटनाच्या संवर्धनासाठी याेग्य पॉलिसी लागू केली नाहीतर भविष्यात पर्यटन व्यावसाय पूर्णपणे काेलमडणार आहे. आणि याला जबाबदार हे सरकार असणार असेही ॲड. शिरोडकर म्हणाले.

ॲड शिरोडकर म्हणाले, आज राज्यात वाढते जुगार कॅसिनो यामुळे काही पर्यटक यासाठी येत असतात. त्यामुळे  गावा हे जुगाराचा अड्डा होत आहे. सरकारकडून कॅसिनाेमध्ये माेठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात.

त्यांच्यावर कडक कारवाई करा: महेश म्हांबरे

त्या रेंट अ कारवाल्या पर्यटकाला मारहाण झाली आहे ते उच्च शिक्षित वकील आहेत. त्या कारमध्ये त्यांची गराेदर पत्नी व एक लहान मुलगी हाेती. त्या युवकांनी त्यांच्या कारच्या काचा फोडल्या त्यांना मारहाण केली  काही जणांना अटक केली आहे. ते युवक  एका मंत्र्याचे समर्थक असल्याचे कळाले आहे. पण असे जे कोणी कायदा हातात घेतात. त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहीजे. यात कुठल्याच मंत्र्यांनी हस्तक्षेप करु नये. आज जर पर्यटक राज्यात आले नाही तर पर्यटक व्यावसाय बंद पडणार आहे. अगोदर खाण व्यावसाय बंद पडला आहे. याची सरकारने दखल घ्यावी.