शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

कर्नाटक बंदमुळे गोव्यातील प्रवाशांची गैरसोय, वाहनांवर दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 12:13 IST

म्हादई पाणी प्रश्नावरून कर्नाटकमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. यामुळे गोव्याच्या कदंब वाहतूक महामंडळाच्या बसगाड्या गुरुवारी कर्नाटकमध्ये धावल्या नाहीत.

पणजी : म्हादई पाणी प्रश्नावरून कर्नाटकमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. यामुळे गोव्याच्या कदंब वाहतूक महामंडळाच्या बसगाड्या गुरुवारी कर्नाटकमध्ये धावल्या नाहीत. गोव्याहून बेळगाव, हुबळी, धारवाड आदी भागांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली आहे. गोव्याच्या काही खासगी वाहनांवर कर्नाटकमध्ये दगडफेक झाली आहे.

कदंब वाहतूक महामंडळाने बुधवारपासूनच कर्नाटकमधील आपली प्रवासी बससेवा थांबवली आहे. फक्त बुधवारी रात्री गोव्याहून बंगळुर व म्हैसुरला कदंबच्या दोन बसगाड्या सोडण्यात आल्या. त्या आज पहाटे तिथे दाखल झाल्या. गोव्याहून कदंबच्या अन्य बसगाडय़ा गेल्या नाहीत. गोव्याहून जी खासगी वाहने कर्नाटकमध्ये जात होती, त्यांच्यावर दगडफेक करण्यात आल्याची माहिती मिळाली. अनेक गोमंतकीयांनी गुरुवारी कर्नाटकमध्ये आपली खासगी वाहने न नेणेच पसंत केले. हजारो प्रवासी कदंब बस स्थानके व अन्यत्र अडकून पडले. अलिकडे म्हादई पाणी प्रश्नावरून कर्नाटककडून वारंवार बंद पुकारला जात असल्याने गोव्यात चिड व्यक्त होत आहे. खरे म्हणजे गोमंतकीयांनीच बंद पुकारायला हवा, कारण गोव्यात येणाऱ्या म्हादई नदीचे पाणी कर्नाटक वळवू पाहत आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया गोव्याच्या एका मंत्र्यानेही व्यक्त केली आहे.

म्हादई पाणी प्रश्नावरून गोवा व कर्नाटकमधील संघर्ष वाढला आहे. कर्नाटकमधून रोज भाजी, कोंबडय़ा, मांस, अंडी, कडझधान्ये घेऊन वाहने येतात. काही वाहने गुरुवारी गोव्यात पोहचली नाहीत. गोवा सरकारच्या फलोत्पादन विकास महामंडळासाठी भाजी घेऊन जे ट्रक येतात, ते मात्र गोव्यात दाखल झाले आहेत. कर्नाटक बंदला फार मोठा प्रतिसाद मिळालेला नाही, असे सांगण्यात आले. पण वाहनांवर दगडफेक होत असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

कर्नाटकमध्ये उगम पावणारी म्हादई नदी गोव्यासह महाराष्ट्रातूनही वाहते. मात्र गोव्यात या नदीचा प्रवाह हा 56 किलोमीटर लांबीचा आहे. त्यामुळेच गोव्यासाठी ही नदी म्हणजे जीवनदायिनी आहे. कर्नाटकने म्हादईचे पाणी वळविले तर गोव्यातील पाणी पुरवठा प्रकल्प, शेती, जैवविविधता आणि पश्चिम घाट क्षेत्रवर मोठा परिणाम होणार आहे. आमचे सरकार म्हादई प्रश्नी कोणतीच तडजोड करणार नाही. कर्नाटकला पाणी दिले जाणार नाही, असे जलसंसाधन खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी स्पष्ट केले आहे.