शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक बंदमुळे गोव्यातील प्रवाशांची गैरसोय, वाहनांवर दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 12:13 IST

म्हादई पाणी प्रश्नावरून कर्नाटकमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. यामुळे गोव्याच्या कदंब वाहतूक महामंडळाच्या बसगाड्या गुरुवारी कर्नाटकमध्ये धावल्या नाहीत.

पणजी : म्हादई पाणी प्रश्नावरून कर्नाटकमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. यामुळे गोव्याच्या कदंब वाहतूक महामंडळाच्या बसगाड्या गुरुवारी कर्नाटकमध्ये धावल्या नाहीत. गोव्याहून बेळगाव, हुबळी, धारवाड आदी भागांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली आहे. गोव्याच्या काही खासगी वाहनांवर कर्नाटकमध्ये दगडफेक झाली आहे.

कदंब वाहतूक महामंडळाने बुधवारपासूनच कर्नाटकमधील आपली प्रवासी बससेवा थांबवली आहे. फक्त बुधवारी रात्री गोव्याहून बंगळुर व म्हैसुरला कदंबच्या दोन बसगाड्या सोडण्यात आल्या. त्या आज पहाटे तिथे दाखल झाल्या. गोव्याहून कदंबच्या अन्य बसगाडय़ा गेल्या नाहीत. गोव्याहून जी खासगी वाहने कर्नाटकमध्ये जात होती, त्यांच्यावर दगडफेक करण्यात आल्याची माहिती मिळाली. अनेक गोमंतकीयांनी गुरुवारी कर्नाटकमध्ये आपली खासगी वाहने न नेणेच पसंत केले. हजारो प्रवासी कदंब बस स्थानके व अन्यत्र अडकून पडले. अलिकडे म्हादई पाणी प्रश्नावरून कर्नाटककडून वारंवार बंद पुकारला जात असल्याने गोव्यात चिड व्यक्त होत आहे. खरे म्हणजे गोमंतकीयांनीच बंद पुकारायला हवा, कारण गोव्यात येणाऱ्या म्हादई नदीचे पाणी कर्नाटक वळवू पाहत आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया गोव्याच्या एका मंत्र्यानेही व्यक्त केली आहे.

म्हादई पाणी प्रश्नावरून गोवा व कर्नाटकमधील संघर्ष वाढला आहे. कर्नाटकमधून रोज भाजी, कोंबडय़ा, मांस, अंडी, कडझधान्ये घेऊन वाहने येतात. काही वाहने गुरुवारी गोव्यात पोहचली नाहीत. गोवा सरकारच्या फलोत्पादन विकास महामंडळासाठी भाजी घेऊन जे ट्रक येतात, ते मात्र गोव्यात दाखल झाले आहेत. कर्नाटक बंदला फार मोठा प्रतिसाद मिळालेला नाही, असे सांगण्यात आले. पण वाहनांवर दगडफेक होत असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

कर्नाटकमध्ये उगम पावणारी म्हादई नदी गोव्यासह महाराष्ट्रातूनही वाहते. मात्र गोव्यात या नदीचा प्रवाह हा 56 किलोमीटर लांबीचा आहे. त्यामुळेच गोव्यासाठी ही नदी म्हणजे जीवनदायिनी आहे. कर्नाटकने म्हादईचे पाणी वळविले तर गोव्यातील पाणी पुरवठा प्रकल्प, शेती, जैवविविधता आणि पश्चिम घाट क्षेत्रवर मोठा परिणाम होणार आहे. आमचे सरकार म्हादई प्रश्नी कोणतीच तडजोड करणार नाही. कर्नाटकला पाणी दिले जाणार नाही, असे जलसंसाधन खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी स्पष्ट केले आहे.