शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

उष्णतेत वीजेचा होतोय लपंडाव, सर्वसामान्य लोक हैराण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 16:32 IST

या आठवड्यात तापमान आणखी वाढणार असून ते ३६ अंशावर जाण्याची शक्यता हवामान वर्तविली आहे.

 - नारायण गावस

पणजी : राज्यात एकाबाजूने दिवसेंदिवस उष्णता वाढत आहे तर दुसऱ्या बाजूने लोकांना वीजेच्या लपंडावला सामोरे जावे लागत आहे. पावसाळी पूर्व कामे वीज खात्याने हाती घेतल्याने  अनेकवेळा वीज बंद ठेवली जात आहे. याचा फटका घरातील लोकांप्रमाणे कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बसत आहे. वीज बंद असल्याने पंखे तसेच एसीचा वापर करायला मिळत नसल्याने लोक हैराण झाले आहे.

शहरापासून खेड्यागावांपर्यंत सर्वत्र सध्या लोक उष्णतेने हैराण आहेत. वीज खात्याचे कर्मचारी नवीन केबल घालण्यासाठी तसेच   वीज तारांना लागलेल्या  झाडांच्या फांद्या कापण्यासाठी तासनतास वीज बंद ठेऊन काम करत आहेत. त्यामुळे दिवसभर घरात राहणाऱ्या लोकांना पंखा तसेच एसीचा वापर करता येत नाही. त्यामुळे लोकांना मोठ्या  प्रमाणात उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे. या उष्णतेमुळे  लहान मुलांना  तसेच ज्येष्ठ नागरिकांना खूपच त्रास होत आहे.

तापमानात आणखी वाढया आठवड्यात तापमान आणखी वाढणार असून ते ३६ अंशावर जाण्याची शक्यता हवामान वर्तविली आहे. पुढील आठ दिवस तापमान असेच चढेच राहणार आहे. हे तापमान सरासरी तापमानापेक्षा १ ते २ अंशाने वाढणार आहे. राज्यात सध्या सरासरी तापमान हे ३३.५ ते ३४.५ अंश असते ते आता वाढून ३५ ते ३६ पर्यंत जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना या तापमानाचा आणखी त्रास सहन करावा लागणार आहे. त्यातच वीजेचा लपंडाव असल्याने याचा नागरिकांना फटका  बसणार.  राज्यात मार्च महिना सुरु झाल्यापासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सियस पर्यंत गेले आहे. 

उष्णतेचा आरोग्यावर परिणामया वाढत्या उष्णतेमुळे लोकांच्या आरोग्यावर अनेक परिणाम दिसून येत आहे. लोकांना चक्कर येणे उलटी मळमळ या सरखे आजार जडले आहे. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे तसेच भर उन्हात बाहेर न जाण्याचे आवाहन आरोग्य खात्याने लोकांना केले आहे.

टॅग्स :electricityवीजgoaगोवा