शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

उष्णतेत वीजेचा होतोय लपंडाव, सर्वसामान्य लोक हैराण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 16:32 IST

या आठवड्यात तापमान आणखी वाढणार असून ते ३६ अंशावर जाण्याची शक्यता हवामान वर्तविली आहे.

 - नारायण गावस

पणजी : राज्यात एकाबाजूने दिवसेंदिवस उष्णता वाढत आहे तर दुसऱ्या बाजूने लोकांना वीजेच्या लपंडावला सामोरे जावे लागत आहे. पावसाळी पूर्व कामे वीज खात्याने हाती घेतल्याने  अनेकवेळा वीज बंद ठेवली जात आहे. याचा फटका घरातील लोकांप्रमाणे कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बसत आहे. वीज बंद असल्याने पंखे तसेच एसीचा वापर करायला मिळत नसल्याने लोक हैराण झाले आहे.

शहरापासून खेड्यागावांपर्यंत सर्वत्र सध्या लोक उष्णतेने हैराण आहेत. वीज खात्याचे कर्मचारी नवीन केबल घालण्यासाठी तसेच   वीज तारांना लागलेल्या  झाडांच्या फांद्या कापण्यासाठी तासनतास वीज बंद ठेऊन काम करत आहेत. त्यामुळे दिवसभर घरात राहणाऱ्या लोकांना पंखा तसेच एसीचा वापर करता येत नाही. त्यामुळे लोकांना मोठ्या  प्रमाणात उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे. या उष्णतेमुळे  लहान मुलांना  तसेच ज्येष्ठ नागरिकांना खूपच त्रास होत आहे.

तापमानात आणखी वाढया आठवड्यात तापमान आणखी वाढणार असून ते ३६ अंशावर जाण्याची शक्यता हवामान वर्तविली आहे. पुढील आठ दिवस तापमान असेच चढेच राहणार आहे. हे तापमान सरासरी तापमानापेक्षा १ ते २ अंशाने वाढणार आहे. राज्यात सध्या सरासरी तापमान हे ३३.५ ते ३४.५ अंश असते ते आता वाढून ३५ ते ३६ पर्यंत जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना या तापमानाचा आणखी त्रास सहन करावा लागणार आहे. त्यातच वीजेचा लपंडाव असल्याने याचा नागरिकांना फटका  बसणार.  राज्यात मार्च महिना सुरु झाल्यापासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सियस पर्यंत गेले आहे. 

उष्णतेचा आरोग्यावर परिणामया वाढत्या उष्णतेमुळे लोकांच्या आरोग्यावर अनेक परिणाम दिसून येत आहे. लोकांना चक्कर येणे उलटी मळमळ या सरखे आजार जडले आहे. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे तसेच भर उन्हात बाहेर न जाण्याचे आवाहन आरोग्य खात्याने लोकांना केले आहे.

टॅग्स :electricityवीजgoaगोवा