शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

चालू वर्षात २७ जणांचा रेल्वेखाली सापडून मृत्यू; नऊ मृतदेहांची ओळख अजून नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 08:23 IST

१८ मृतदेहांची ओळख पटली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव: रेल्वेखाली सापडून मृत्यू होण्याच्या घटना वाढत असून चालू वर्षात आतापर्यंत कोकण रेल्वे मार्गावर २७ जण रेल्वेखाली सापडून मरण पावले आहेत. यातील २३ जण प्रत्यक्षात रेल्वेखाली सापडले आहेत तर ४ जणांनी रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. नऊ मृतदेहांची ओळख पटू शकलेली नाही. तर - १८ मृतदेहांची ओळख पटली आहे.

कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील गुडलर यांनी दिलेल्या माहितीनुसार मडगाव रेल्वेस्थानक महाविद्यालय ते दामोदर गेट या दरम्यान सर्वात जास्त प्रकरणे घडतात. येथे रेल्वेखाली सापडून मरण पावल्याची एकूण १२ प्रकरणे घडली आहेत. तर रेल्वेखाली येऊन आत्महत्या करण्याच्या घटना मडगाव ते माजोर्डा दरम्यान रेल्वे मार्गावर घडलेल्या आहेत.

लोकांनी रेल्वे रुळ ओलांडू नये, असे आवाहनही कोकण रेल्वे पोलिसांनी केले आहे. अनेकदा रेल्वे येत असताना गेट पडलेली असतानाही लोक रेल्वे रुळ ओलांडण्याचे प्रयत्न करतात, हे धाडस मृत्यूच्या दारात नेणारे ठरते, असेही सूत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाKonkan Railwayकोकण रेल्वे