शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द ठरविल्याबद्दल काँग्रेसकडून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 08:37 IST

केंद्रातील भ्रष्ट सरकारच्या विरोधात राहुल गांधी आवाज उठवत असल्यानेच त्यांची खासदारकी अपात्र ठरविली.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: केंद्रातील भ्रष्ट सरकारच्या विरोधात राहुल गांधी आवाज उठवत असल्यानेच त्यांची खासदारकी अपात्र ठरविली. सरकारची कृती अयोग्य आहे, असे म्हणत गांधी यांच्यावरील अन्यायाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मेरशी येथे सत्यागृह आंदोलन केले. 

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्यावर जर सरकार अन्याय करीत असेल, तर आज देशातील सामान्य जनतेचे काय? सरकार हुकूमशाहीप्रमाणे वागत असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबत असल्याचा आरोपही त्यावेळी केला.

मेरशी येथील चर्च परिसरात या सत्यागृह आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, नेते एल्वीस गोम्स, जॉन नाझारेथ तसेच पणजी, ताळगाव, सांताक्रुझ, सांतआंद्रे व कुंभारजुवे येथील काँग्रेस गटाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांना अपात्र ठरविल्याबद्दल तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.

प्रदेशाध्यक्ष पाटकर म्हणाले, की राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रे दरम्यान कन्याकुमारी ते काश्मीर असा ४ हजार किलोमीटरचा पल्ला गाठला. या यात्रे दरम्यान त्यांनी केंद्र सरकारचा भ्रष्टाचार उघडकीस आणला. मोठ्या उद्योगपतींना हे सरकार कसे मदत करते हे सुद्धा त्यांनी जनतेला दाखवून दिले. मात्र, केंद्रातील भाजप सरकारला ते आवडले असल्यानेच त्यांच्याविरोधात गुजरात येथे गुन्हा दाखल केला. तसेच त्यांची खासदारकी रद्द केली. यावरून सरकारने त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबत असल्याचे सिद्ध होते, असा आरोप त्यांनी केला.

राहुल गांधी हे केवळ सामान्यांचे प्रश्न मांडत आहेत. मात्र, सरकारला ते आवडत नसल्यानेच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. कटकारस्थान रचून त्यांना खासदार पदासाठी अपात्र ठरविण्यात आले. त्यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेसचा लढा कायम राहील, असे पाटकर यांनी स्पष्ट केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी