शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द ठरविल्याबद्दल काँग्रेसकडून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 08:37 IST

केंद्रातील भ्रष्ट सरकारच्या विरोधात राहुल गांधी आवाज उठवत असल्यानेच त्यांची खासदारकी अपात्र ठरविली.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: केंद्रातील भ्रष्ट सरकारच्या विरोधात राहुल गांधी आवाज उठवत असल्यानेच त्यांची खासदारकी अपात्र ठरविली. सरकारची कृती अयोग्य आहे, असे म्हणत गांधी यांच्यावरील अन्यायाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मेरशी येथे सत्यागृह आंदोलन केले. 

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्यावर जर सरकार अन्याय करीत असेल, तर आज देशातील सामान्य जनतेचे काय? सरकार हुकूमशाहीप्रमाणे वागत असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबत असल्याचा आरोपही त्यावेळी केला.

मेरशी येथील चर्च परिसरात या सत्यागृह आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, नेते एल्वीस गोम्स, जॉन नाझारेथ तसेच पणजी, ताळगाव, सांताक्रुझ, सांतआंद्रे व कुंभारजुवे येथील काँग्रेस गटाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांना अपात्र ठरविल्याबद्दल तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.

प्रदेशाध्यक्ष पाटकर म्हणाले, की राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रे दरम्यान कन्याकुमारी ते काश्मीर असा ४ हजार किलोमीटरचा पल्ला गाठला. या यात्रे दरम्यान त्यांनी केंद्र सरकारचा भ्रष्टाचार उघडकीस आणला. मोठ्या उद्योगपतींना हे सरकार कसे मदत करते हे सुद्धा त्यांनी जनतेला दाखवून दिले. मात्र, केंद्रातील भाजप सरकारला ते आवडले असल्यानेच त्यांच्याविरोधात गुजरात येथे गुन्हा दाखल केला. तसेच त्यांची खासदारकी रद्द केली. यावरून सरकारने त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबत असल्याचे सिद्ध होते, असा आरोप त्यांनी केला.

राहुल गांधी हे केवळ सामान्यांचे प्रश्न मांडत आहेत. मात्र, सरकारला ते आवडत नसल्यानेच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. कटकारस्थान रचून त्यांना खासदार पदासाठी अपात्र ठरविण्यात आले. त्यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेसचा लढा कायम राहील, असे पाटकर यांनी स्पष्ट केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी