शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द ठरविल्याबद्दल काँग्रेसकडून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 08:37 IST

केंद्रातील भ्रष्ट सरकारच्या विरोधात राहुल गांधी आवाज उठवत असल्यानेच त्यांची खासदारकी अपात्र ठरविली.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: केंद्रातील भ्रष्ट सरकारच्या विरोधात राहुल गांधी आवाज उठवत असल्यानेच त्यांची खासदारकी अपात्र ठरविली. सरकारची कृती अयोग्य आहे, असे म्हणत गांधी यांच्यावरील अन्यायाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मेरशी येथे सत्यागृह आंदोलन केले. 

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्यावर जर सरकार अन्याय करीत असेल, तर आज देशातील सामान्य जनतेचे काय? सरकार हुकूमशाहीप्रमाणे वागत असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबत असल्याचा आरोपही त्यावेळी केला.

मेरशी येथील चर्च परिसरात या सत्यागृह आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, नेते एल्वीस गोम्स, जॉन नाझारेथ तसेच पणजी, ताळगाव, सांताक्रुझ, सांतआंद्रे व कुंभारजुवे येथील काँग्रेस गटाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांना अपात्र ठरविल्याबद्दल तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.

प्रदेशाध्यक्ष पाटकर म्हणाले, की राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रे दरम्यान कन्याकुमारी ते काश्मीर असा ४ हजार किलोमीटरचा पल्ला गाठला. या यात्रे दरम्यान त्यांनी केंद्र सरकारचा भ्रष्टाचार उघडकीस आणला. मोठ्या उद्योगपतींना हे सरकार कसे मदत करते हे सुद्धा त्यांनी जनतेला दाखवून दिले. मात्र, केंद्रातील भाजप सरकारला ते आवडले असल्यानेच त्यांच्याविरोधात गुजरात येथे गुन्हा दाखल केला. तसेच त्यांची खासदारकी रद्द केली. यावरून सरकारने त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबत असल्याचे सिद्ध होते, असा आरोप त्यांनी केला.

राहुल गांधी हे केवळ सामान्यांचे प्रश्न मांडत आहेत. मात्र, सरकारला ते आवडत नसल्यानेच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. कटकारस्थान रचून त्यांना खासदार पदासाठी अपात्र ठरविण्यात आले. त्यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेसचा लढा कायम राहील, असे पाटकर यांनी स्पष्ट केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी