शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांना आता पायघड्या; औद्योगिक धोरणात बदल, भूखंड वाटपात सुटसुटीतपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 07:58 IST

येत्या २९ रोजी राजधानी शहरातील कन्वेंशन सेंटरमध्ये 'इन्व्हेस्ट गोवा २०२४' शिखर परिषदेचे आयोजन केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात अधिकाधिक औद्योगिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सरकारने आपल्या धोरणांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. उद्योगांना भूखंड वाटपात सुटसुटीतपणा आणला आहे. तसेच बांधकामाच्या बाबतीतही असलेल्या कटकटी दूर केल्या आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल उद्योजकांशी संवाद साधून त्यांची गा-हाणी ऐकल्यानंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 'इज ऑफ डुइंग बिझनेस'ला चालना देताना आणखी काही गोष्टीही सुटसुटीत केल्या आहेत.

गुंतवणूकदारांसाठी भूखंड आणि उद्योग उभारणीसाठी एक खिडकी योजनेसह प्रक्रिया सुलभ केली आहे. लॉजिस्टिक वेअरहाऊस आणि माहिती तंत्रज्ञान उद्योगांनाही उद्योगाचा दर्जा देण्यात आला आहे. उद्योगांसाठी व्यावसायिक भूखंड आता लिलावाच्या मार्गाने उपलब्ध करून दिले जातील. हस्तांतरण आणि - उप भाडेपट्टी प्रक्रियादेखील शिथिल केली आहे. महिला उद्योजक, बौद्धिक संपदाधारक आणि स्टार्ट अप यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

या प्रसंगी उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, आयडीसीचे अध्यक्ष आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय), गोवा उद्योग संघटना व राज्यातील इतर उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींकडे चर्चा केली.

किमान वेतन द्यावेच लागेल : मुख्यमंत्री

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना एका प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, कारखानदारांनी कामगारांना अधिसूचित किमान वेतन द्यावेच लागेल. ज्या उद्योगांनी कामगारांना अद्याप किमान वेतन लागू केलेले नाही त्यांनी ते लागू करावे लागेल. ज्या दिवशी अधिसूचना जारी झाली आहे. त्या दिवसापासून किमान वेतन द्यावे लागेल.

२९ रोजी 'इन्व्हेस्ट गोवा २०२४' परिषद

मुख्यमंत्री म्हणाले की, औद्योगिक क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक यावी तसेच महसूल आणि रोजगाराच्या संधी वाढाव्यात यासाठी धोरणांमध्ये सुधारणा आणलेल्या आहेत. येत्या २९ रोजी राजधानी शहरातील कन्वेंशन सेंटरमध्ये 'इन्व्हेस्ट गोवा २०२४' शिखर परिषदेचे आयोजन केले आहे.

गोव्यातच नव्हे तर देशातील इतर भागातही अभूतपूर्व सुधारणा घडवून आणण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत ते वाखाणण्याजोगे आहेत. उद्योगांना सकारात्मक भूमिका बजावण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले. सरकारबरोबरच उद्योगांनाही कामगिरी बजावावी. गोव्याला अधिकाधिक गुंतवणूक, अधिकाधिक नोकऱ्या आणि महसूल निर्मितीची गरज आहे. - श्रीनिवास धेंपो, अध्यक्ष, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स 

टॅग्स :goaगोवा