शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

ऑगस्टमध्ये राजकीय सांजाव; अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळाच्या फेररचनेची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 13:28 IST

दिल्लीतील नेत्यांचा निरोप

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : विधानसभेचे पावसाळी अधिवेशन जुलै महिन्यात सुरू होणार आहे. तर दि. ८ ऑगस्टला हे अधिवेशन संपेल. त्यानंतर लगेच ऑगस्टमध्येच राज्यात राजकीय सांजाव होईल. म्हणजेच अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ फेररचना करण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळातून दोघा-तिघांना डच्चू देऊन त्याजागी नव्या आमदारांना स्थान दिले जाईल, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, काल बहुतेक राजकारण्यांनी पारंपरिक सांजाव उत्सवाचा आनंद लुटला. काहींनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत सांजाव साजरा केला.

गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून मुख्यमंत्र्यांनी डच्चू दिला. त्यानंतर लगेच मंत्रिमंडळातील रिक्त जागा भरली गेलेली नाही. आता विधानसभा अधिवेशन सुरू होणार असल्याने मंत्रिमंडळात आता बदल नको, असा संदेश दिल्लीहून आलेला आहे. मंत्र्यांना आपापल्या खात्यांशी निगडीत प्रश्नांना अधिवेशनात उत्तरे देणे गरजेचे असते. आताच नवे कुणी मंत्री केले तर अधिवेशनात गोंधळ उडू शकतो. उत्तरे देणे जड जाऊ शकते. त्यामुळे तूर्त फेररचना शक्य नाही. येत्या ऑगस्ट महिन्यात मंत्रिमंडळाची फेररचना होईल. कारण सध्याच्या मंत्रिमंडळाला घेऊन २०२७ च्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणे धोक्याचे ठरेल याची कल्पना भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांना दिलेली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याच नेतृत्वाखाली २०२७ ची निवडणूक होईल. पण मंत्रिमंडळात तीन-चार नवे मंत्री असतील. त्यामुळे या फेरबदलाकडे राजकीय नेत्यांसह गोमंतकीयांचे लक्ष लागले आहे.

गोविद-सीएमचे हस्तांदोलन

आमदार गोविंद गावडे काल सायंकाळी कला अकादमीत सोहळ्यासाठी आले होते. तिथे मुख्यमंत्री सावंत यांनाही ते भेटले व मुख्यमंत्री समोर येताच त्यांनी मुख्यमंत्र्यांशी हस्तांदोलन केले. मात्र, यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावर मनापासून आनंद नव्हता, असे लोकांनाही जाणवले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत