शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील भाजपाची जनमानसातील प्रतिमा उतरली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 20:47 IST

गोव्याच्या राजकारणाने, विशेषत: भाजपाने आपले सरकार स्थिर राखण्यासाठी निचांक गाठल्याची चर्चा राज्यात होऊ लागली आहे.

-राजू नायक

गोव्याच्या राजकारणाने, विशेषत: भाजपाने आपले सरकार स्थिर राखण्यासाठी निचांक गाठल्याची चर्चा राज्यात होऊ लागली आहे. हल्लीच भाजपाने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे दोन आमदार फोडले. त्यातील एकाला उपमुख्यमंत्रीपद तर दुस-याला प्रबळ मंत्रीपद देण्यात आले. 

या प्रकारामुळे राजकीय निरीक्षक खवळले आहेतच, परंतु भाजपा निष्ठावंतांमध्येही चिंता आहे. मूळ भाजपा व संघाच्या मुशीत वाढलेल्या नेत्यांना बाजूला ठेवून बाहेरच्या सत्तेला चटावलेल्या नेत्यांना पक्षात प्रवेश दिला जातोय असे भाजपात वातावरण आहे व लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या पाठोपाठ तत्त्वनिष्ठ राजेंद्र आर्लेकर यांनी तीव्र खंत व्यक्त केली आहे. सध्या भाजपात माविन गुदिन्हो, पांडुरंग मडकईकर, विश्वजीत राणे, मनोहर आजगावकर व दीपक पाऊसकर आदी बाहेरून आलेले नेते महत्त्वाची पदे बळकावून बसले आहेत. 

ताजी परिस्थिती निर्माण झाली जेव्हा मगोपने सरकारविरोधात कारवाया सुरू केल्या. त्या पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांनी कॉँग्रेसशी संधान बांधले व आपल्या दोघा आमदारांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला. त्यांना प्रतिटोला हाणताना या दोघाही आमदारांनी वेगळा गट बनवून भाजपात जाणे पसंत केले. एक गोष्ट खरी आहे की ढवळीकर यांना मुख्यमंत्री बनण्याची स्वप्ने पडत होती व मनोहर पर्रीकर आजारी असताना त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठी अनेक भल्याबु-या मार्गाचा अवलंब केला. त्यानंतर तीन पोटनिवडणुका लढवून भाजपाचा मनोभंग करण्याचीही त्यांनी व्यूहरचना केली व त्यांचे भाऊ युतीचे संकेत तोडून शिरोडा पोटनिवडणूक लढवू पाहात आहेत. या तिन्ही जागा मगोपने जिंकल्या असत्या तर भाजपा अल्पमतात येऊन त्यांना एकतर ढवळीकरांना नेतेपद द्यावे लागले असते किंवा ते कॉँग्रेसबरोबर सरकार घडवू शकले असते. त्याचा प्रतिकार करताना भाजपाने मगोपलाच खिंडार पाडणे पसंत केले. 

यात जरी राजकीय व्यूहरचनेचा भाग असला तरी, भाजपाने ज्या पद्धतीने २०१७ नंतर सरकार घडवले व त्यानंतर ते स्थिर राखताना फुटिरांना पक्षात वाव देण्याचा प्रयत्न चालविला, त्यामुळे त्या पक्षाबद्दल जनमानसात तिटकारा निर्माण झाला आहे. २०१७मध्ये अल्पमतात असतानाही त्यांनी सरकार घडविले. परंतु त्यावेळी नेतेपदी मनोहर पर्रीकर होते. त्यांनी राज्याच्या हिताचे राजकारण चालविले. लोकांनी आजारी असतानाही सत्तेसाठीच्या या कसरती सहन केल्या. परंतु त्यांच्या निधनानंतर ज्या पद्धतीने भाजपा राजकारणाचा तळ गाठू लागले आहे त्यामुळे जनता हवालदिल बनली आहे. पर्रीकरांचे अस्थिकलश फिरवून सहानुभूती मिळविण्याचा या पक्षाने जोरदार प्रयत्न चालविला आहे. परंतु लोक म्हणतात, जो बुंदसे गयी व हौदसे नही आती. भ्रष्टाचाराचा मुकाबला करणो, फुटिरांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करून प्रामाणिक सरकार देत विकास योजनांना प्रचंड रेटा दिला तरच लोकांचे सरकारविषयीचे मत बदलू शकते. तसेच घडले नाही तर पुढच्या दोन वर्षात येणा-या निवडणुकीत लोक या रागाचा वचपा काढू शकतात. शिवाय २३ एप्रिल रोजी होणा-या लोकसभा व तीन विधानसभा पोटनिवडणुका यामध्ये जनता सरकारला योग्य धडा शिकवू शकते. 

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत.)

टॅग्स :goaगोवा