शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

गोव्यातील भाजपाची जनमानसातील प्रतिमा उतरली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 20:47 IST

गोव्याच्या राजकारणाने, विशेषत: भाजपाने आपले सरकार स्थिर राखण्यासाठी निचांक गाठल्याची चर्चा राज्यात होऊ लागली आहे.

-राजू नायक

गोव्याच्या राजकारणाने, विशेषत: भाजपाने आपले सरकार स्थिर राखण्यासाठी निचांक गाठल्याची चर्चा राज्यात होऊ लागली आहे. हल्लीच भाजपाने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे दोन आमदार फोडले. त्यातील एकाला उपमुख्यमंत्रीपद तर दुस-याला प्रबळ मंत्रीपद देण्यात आले. 

या प्रकारामुळे राजकीय निरीक्षक खवळले आहेतच, परंतु भाजपा निष्ठावंतांमध्येही चिंता आहे. मूळ भाजपा व संघाच्या मुशीत वाढलेल्या नेत्यांना बाजूला ठेवून बाहेरच्या सत्तेला चटावलेल्या नेत्यांना पक्षात प्रवेश दिला जातोय असे भाजपात वातावरण आहे व लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या पाठोपाठ तत्त्वनिष्ठ राजेंद्र आर्लेकर यांनी तीव्र खंत व्यक्त केली आहे. सध्या भाजपात माविन गुदिन्हो, पांडुरंग मडकईकर, विश्वजीत राणे, मनोहर आजगावकर व दीपक पाऊसकर आदी बाहेरून आलेले नेते महत्त्वाची पदे बळकावून बसले आहेत. 

ताजी परिस्थिती निर्माण झाली जेव्हा मगोपने सरकारविरोधात कारवाया सुरू केल्या. त्या पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांनी कॉँग्रेसशी संधान बांधले व आपल्या दोघा आमदारांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला. त्यांना प्रतिटोला हाणताना या दोघाही आमदारांनी वेगळा गट बनवून भाजपात जाणे पसंत केले. एक गोष्ट खरी आहे की ढवळीकर यांना मुख्यमंत्री बनण्याची स्वप्ने पडत होती व मनोहर पर्रीकर आजारी असताना त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठी अनेक भल्याबु-या मार्गाचा अवलंब केला. त्यानंतर तीन पोटनिवडणुका लढवून भाजपाचा मनोभंग करण्याचीही त्यांनी व्यूहरचना केली व त्यांचे भाऊ युतीचे संकेत तोडून शिरोडा पोटनिवडणूक लढवू पाहात आहेत. या तिन्ही जागा मगोपने जिंकल्या असत्या तर भाजपा अल्पमतात येऊन त्यांना एकतर ढवळीकरांना नेतेपद द्यावे लागले असते किंवा ते कॉँग्रेसबरोबर सरकार घडवू शकले असते. त्याचा प्रतिकार करताना भाजपाने मगोपलाच खिंडार पाडणे पसंत केले. 

यात जरी राजकीय व्यूहरचनेचा भाग असला तरी, भाजपाने ज्या पद्धतीने २०१७ नंतर सरकार घडवले व त्यानंतर ते स्थिर राखताना फुटिरांना पक्षात वाव देण्याचा प्रयत्न चालविला, त्यामुळे त्या पक्षाबद्दल जनमानसात तिटकारा निर्माण झाला आहे. २०१७मध्ये अल्पमतात असतानाही त्यांनी सरकार घडविले. परंतु त्यावेळी नेतेपदी मनोहर पर्रीकर होते. त्यांनी राज्याच्या हिताचे राजकारण चालविले. लोकांनी आजारी असतानाही सत्तेसाठीच्या या कसरती सहन केल्या. परंतु त्यांच्या निधनानंतर ज्या पद्धतीने भाजपा राजकारणाचा तळ गाठू लागले आहे त्यामुळे जनता हवालदिल बनली आहे. पर्रीकरांचे अस्थिकलश फिरवून सहानुभूती मिळविण्याचा या पक्षाने जोरदार प्रयत्न चालविला आहे. परंतु लोक म्हणतात, जो बुंदसे गयी व हौदसे नही आती. भ्रष्टाचाराचा मुकाबला करणो, फुटिरांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करून प्रामाणिक सरकार देत विकास योजनांना प्रचंड रेटा दिला तरच लोकांचे सरकारविषयीचे मत बदलू शकते. तसेच घडले नाही तर पुढच्या दोन वर्षात येणा-या निवडणुकीत लोक या रागाचा वचपा काढू शकतात. शिवाय २३ एप्रिल रोजी होणा-या लोकसभा व तीन विधानसभा पोटनिवडणुका यामध्ये जनता सरकारला योग्य धडा शिकवू शकते. 

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत.)

टॅग्स :goaगोवा