शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
2
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
3
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
4
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
5
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
6
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
7
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
8
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
9
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
10
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
11
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
12
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
13
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
14
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
15
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
16
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
17
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
18
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
19
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
20
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
Daily Top 2Weekly Top 5

म्हादई पाणीप्रश्नी तोडगा न निघाल्यास सरकारमध्ये वाद शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 20:54 IST

पणजी - म्हादई पाणीप्रश्नी नजिकच्या भविष्यात तोडगा न निघाल्यास मंत्रिमंडळात वाद निर्माण होऊ शकतो, असे संकेत मिळतात. सध्या काही मंत्री ...

ठळक मुद्देम्हादई पाणीप्रश्नी कुठच्याच मंत्री किंवा आमदाराने केंद्राविरुद्ध बोलायचे नाही अशा प्रकारची अलिखित सूचना दिली गेली असल्याचे सुत्रंनी सांगितले. केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्याच मंत्रालयाला गोव्यातील बहुतेक आमदार दोष देत आहेत.

पणजी - म्हादई पाणीप्रश्नी नजिकच्या भविष्यात तोडगा न निघाल्यास मंत्रिमंडळात वाद निर्माण होऊ शकतो, असे संकेत मिळतात. सध्या काही मंत्री कामे होत नसल्याने नाराज असून ते म्हादई प्रश्नाचे भांडवल करून बंडाची भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

म्हादई पाणीप्रश्नी कुठच्याच मंत्री किंवा आमदाराने केंद्राविरुद्ध बोलायचे नाही अशा प्रकारची अलिखित सूचना दिली गेली असल्याचे सुत्रंनी सांगितले. म्हादईचे आंदोलन वाढत गेले तर सरकारच्या प्रतिमेवर त्याचा मोठा परिणाम होईल याची कल्पना काही मंत्री व आमदारांना आहे. उत्तर गोव्यात म्हादई बचाव आंदोलनाच्या चळवळीचा परिणाम जास्त होईल, असेही मानले जात आहे. कर्नाटकमधील विधानसभेच्या पोटनिवडणुका पार पडल्यानंतरही जर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हादईप्रश्नी तोडगा काढला नाही तर गोवासरकारसमोरील समस्या आणखी वाढतील असे एक मंत्री आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर लोकमतशी बोलताना म्हणाले. आमच्या सरकारविरुद्ध आम्ही बोलू शकत नाही पण म्हादई पाणीप्रश्नी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलयाने कर्नाटकला दिलेले पत्र मागे घेतले गेले नाही तर गोव्यातील लोकांमधील रोष वाढत जाईल असे हे मंत्री म्हणाले. म्हादई पाणीप्रश्न मुख्यमंत्री व्यवस्थित हाताळतील. आम्ही थोडा धीर धरायला  हवा, असे भाजपच्या एक-दोन आमदारांना वाटते. मात्र सर्व विरोधी पक्षांना म्हादईच्या विषयावरून सरकारने आयता इश्यू दिला अशी भावना मंत्री व्यक्त करत आहेत. केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्याच मंत्रालयाला गोव्यातील बहुतेक आमदार दोष देत आहेत. म्हादईप्रश्नी तोडगा निघाला नाही व आंदोलन वाढत गेले तर मंत्री, आमदार जाहीरपणो बोलू लागतील, त्यावेळी सरकारमध्ये वाद होईल, असे भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना वाटते. मंत्री मायकल लोबो यांनी तर दोन दिवसांपूर्वीच आपली भूमिका मांडली व म्हादईप्रश्नी कोणतीच तडजोड नको असा सल्ला सरकारला दिला. मंत्री विश्वजित राणो सध्या स्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :goaगोवाWaterपाणीGovernmentसरकार