शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

म्हादई पाणीप्रश्नी तोडगा न निघाल्यास सरकारमध्ये वाद शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 20:54 IST

पणजी - म्हादई पाणीप्रश्नी नजिकच्या भविष्यात तोडगा न निघाल्यास मंत्रिमंडळात वाद निर्माण होऊ शकतो, असे संकेत मिळतात. सध्या काही मंत्री ...

ठळक मुद्देम्हादई पाणीप्रश्नी कुठच्याच मंत्री किंवा आमदाराने केंद्राविरुद्ध बोलायचे नाही अशा प्रकारची अलिखित सूचना दिली गेली असल्याचे सुत्रंनी सांगितले. केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्याच मंत्रालयाला गोव्यातील बहुतेक आमदार दोष देत आहेत.

पणजी - म्हादई पाणीप्रश्नी नजिकच्या भविष्यात तोडगा न निघाल्यास मंत्रिमंडळात वाद निर्माण होऊ शकतो, असे संकेत मिळतात. सध्या काही मंत्री कामे होत नसल्याने नाराज असून ते म्हादई प्रश्नाचे भांडवल करून बंडाची भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

म्हादई पाणीप्रश्नी कुठच्याच मंत्री किंवा आमदाराने केंद्राविरुद्ध बोलायचे नाही अशा प्रकारची अलिखित सूचना दिली गेली असल्याचे सुत्रंनी सांगितले. म्हादईचे आंदोलन वाढत गेले तर सरकारच्या प्रतिमेवर त्याचा मोठा परिणाम होईल याची कल्पना काही मंत्री व आमदारांना आहे. उत्तर गोव्यात म्हादई बचाव आंदोलनाच्या चळवळीचा परिणाम जास्त होईल, असेही मानले जात आहे. कर्नाटकमधील विधानसभेच्या पोटनिवडणुका पार पडल्यानंतरही जर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हादईप्रश्नी तोडगा काढला नाही तर गोवासरकारसमोरील समस्या आणखी वाढतील असे एक मंत्री आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर लोकमतशी बोलताना म्हणाले. आमच्या सरकारविरुद्ध आम्ही बोलू शकत नाही पण म्हादई पाणीप्रश्नी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलयाने कर्नाटकला दिलेले पत्र मागे घेतले गेले नाही तर गोव्यातील लोकांमधील रोष वाढत जाईल असे हे मंत्री म्हणाले. म्हादई पाणीप्रश्न मुख्यमंत्री व्यवस्थित हाताळतील. आम्ही थोडा धीर धरायला  हवा, असे भाजपच्या एक-दोन आमदारांना वाटते. मात्र सर्व विरोधी पक्षांना म्हादईच्या विषयावरून सरकारने आयता इश्यू दिला अशी भावना मंत्री व्यक्त करत आहेत. केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्याच मंत्रालयाला गोव्यातील बहुतेक आमदार दोष देत आहेत. म्हादईप्रश्नी तोडगा निघाला नाही व आंदोलन वाढत गेले तर मंत्री, आमदार जाहीरपणो बोलू लागतील, त्यावेळी सरकारमध्ये वाद होईल, असे भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना वाटते. मंत्री मायकल लोबो यांनी तर दोन दिवसांपूर्वीच आपली भूमिका मांडली व म्हादईप्रश्नी कोणतीच तडजोड नको असा सल्ला सरकारला दिला. मंत्री विश्वजित राणो सध्या स्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :goaगोवाWaterपाणीGovernmentसरकार