शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

म्हादई पाणीप्रश्नी तोडगा न निघाल्यास सरकारमध्ये वाद शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 20:54 IST

पणजी - म्हादई पाणीप्रश्नी नजिकच्या भविष्यात तोडगा न निघाल्यास मंत्रिमंडळात वाद निर्माण होऊ शकतो, असे संकेत मिळतात. सध्या काही मंत्री ...

ठळक मुद्देम्हादई पाणीप्रश्नी कुठच्याच मंत्री किंवा आमदाराने केंद्राविरुद्ध बोलायचे नाही अशा प्रकारची अलिखित सूचना दिली गेली असल्याचे सुत्रंनी सांगितले. केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्याच मंत्रालयाला गोव्यातील बहुतेक आमदार दोष देत आहेत.

पणजी - म्हादई पाणीप्रश्नी नजिकच्या भविष्यात तोडगा न निघाल्यास मंत्रिमंडळात वाद निर्माण होऊ शकतो, असे संकेत मिळतात. सध्या काही मंत्री कामे होत नसल्याने नाराज असून ते म्हादई प्रश्नाचे भांडवल करून बंडाची भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

म्हादई पाणीप्रश्नी कुठच्याच मंत्री किंवा आमदाराने केंद्राविरुद्ध बोलायचे नाही अशा प्रकारची अलिखित सूचना दिली गेली असल्याचे सुत्रंनी सांगितले. म्हादईचे आंदोलन वाढत गेले तर सरकारच्या प्रतिमेवर त्याचा मोठा परिणाम होईल याची कल्पना काही मंत्री व आमदारांना आहे. उत्तर गोव्यात म्हादई बचाव आंदोलनाच्या चळवळीचा परिणाम जास्त होईल, असेही मानले जात आहे. कर्नाटकमधील विधानसभेच्या पोटनिवडणुका पार पडल्यानंतरही जर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हादईप्रश्नी तोडगा काढला नाही तर गोवासरकारसमोरील समस्या आणखी वाढतील असे एक मंत्री आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर लोकमतशी बोलताना म्हणाले. आमच्या सरकारविरुद्ध आम्ही बोलू शकत नाही पण म्हादई पाणीप्रश्नी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलयाने कर्नाटकला दिलेले पत्र मागे घेतले गेले नाही तर गोव्यातील लोकांमधील रोष वाढत जाईल असे हे मंत्री म्हणाले. म्हादई पाणीप्रश्न मुख्यमंत्री व्यवस्थित हाताळतील. आम्ही थोडा धीर धरायला  हवा, असे भाजपच्या एक-दोन आमदारांना वाटते. मात्र सर्व विरोधी पक्षांना म्हादईच्या विषयावरून सरकारने आयता इश्यू दिला अशी भावना मंत्री व्यक्त करत आहेत. केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्याच मंत्रालयाला गोव्यातील बहुतेक आमदार दोष देत आहेत. म्हादईप्रश्नी तोडगा निघाला नाही व आंदोलन वाढत गेले तर मंत्री, आमदार जाहीरपणो बोलू लागतील, त्यावेळी सरकारमध्ये वाद होईल, असे भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना वाटते. मंत्री मायकल लोबो यांनी तर दोन दिवसांपूर्वीच आपली भूमिका मांडली व म्हादईप्रश्नी कोणतीच तडजोड नको असा सल्ला सरकारला दिला. मंत्री विश्वजित राणो सध्या स्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :goaगोवाWaterपाणीGovernmentसरकार