शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोणाचेही कंत्राट मी रद्द करणार नाही, पण 'माध्यान्ह'चा दर्जा सुधारा; मुख्यमंत्र्यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 08:02 IST

'अक्षय पात्र'च्या गोव्यातील पहिल्या हायटेक किचनचे पिळर्ण येथे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'कोणत्याही सेल्फ हेल्प ग्रुपचे माध्यान्ह आहार कंत्राट रद्द करणार नाही. परंतु आहाराचा दर्जा सुधारावाच लागेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. पिळर्ण येथे 'अक्षय पात्र'च्या गोव्यातील पहिल्या आणि देशभरातील ७८ व्या हायटेक किचनचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

या प्रसंगी साळगावचे आमदार केदार नाईक, शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, उत्तर गोवा जिल्हाधिकारी डॉ. स्नेहा गित्ते यांच्यासह अक्षय पात्रचे सह-संस्थापक आणि उपाध्यक्ष चंचलपती दास, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) च्या वतीने सीएसआरचे वरिष्ठ प्रमुख सुभाष चंद्र राय, अक्षय पात्रचे सीईओ श्रीधर वेंकट उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, अक्षय पात्र राज्य सरकारसोबत दीर्घकाळ काम करणार आहे. मुलांना चांगला व दर्जेदार आहार मिळावा यासाठी माझे सरकार कटिबद्ध आहे. पहिली ते दहावीपर्यंत माध्यान्ह आहाराची सोय केली आहे. शालेय पोषण क्षेत्रातील गोवा सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी अक्षय पात्र राज्यातील लाभार्थी मुलांना ताजे शिजवलेले, स्वच्छ आणि पौष्टिक माध्यान्ह भोजन देईल.

या स्वयंपाकगृहासाठी गोवा सरकारने १५,००० चौरस फूट जागा उपलब्ध करून दिली आहे. ५,००० मुलांसाठी येथे माध्यान्ह आहार शिजवून वितरित करण्याची क्षमता आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने आवश्यक स्वयंपाकघर पायाभूत सुविधांसह मदत केली आहे. अक्षय पात्र संस्था सुरुवातीला भारत सरकारच्या प्रमुख शालेय आहार कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान पोषण अभियानाचा भाग म्हणून राज्यातील २,५०० मुलांना आहार देईल.

सावंत म्हणाले की, दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या पुण्यतिथीदिनी मुलांना पौष्टिक माध्यान्ह भोजन देण्याचे त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरताना पाहून मला खूप आनंद होत आहे. जवळजवळ एक दशकापूर्वी 'अक्षय पात्र'ला गोव्यात आमंत्रित करण्यासाठी पर्रीकर यांनीच पुढाकार घेतला होता आणि २०१३-१४ मध्ये सुरू झालेल्या प्रयत्नांना आज यश आले आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, या वर्षापासून आम्ही इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनाही माध्यान्ह आहार देत आहोत. साळगाव, कळंगुट आणि शिवोली मतदारसंघातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. पंतप्रधान पोषण अभियानांतर्गत हा कार्यक्रम आम्ही राबवत आहोत.

१६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशात अक्षयपात्रचे जाळे

अक्षयपात्र फाउंडेशनचे सह-संस्थापक आणि उपाध्यक्ष चंचलपती दास म्हणाले की, अक्षय पात्रने २००० मध्ये स्थापनेपासून खूप मोठा पल्ला गाठला आहे. या वर्षी फाउंडेशनच्या सेवेची २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या स्वयंपाकघराच्या उद्घाटनासह, अक्षय पात्राच्या केंद्रीकृत स्वयंपाकघरांचे नेटवर्क आता १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरले आहे. स्थानिक चव आणि अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता मानकांचे पालन करून गोव्यातील मुलांना पौष्टिक आणि स्वच्छ माध्यान्ह आहार देण्यासाठी फाउंडेशन वचनबद्ध आहे.

मुलांसाठी मेन्यू

अक्षय पात्र देशभरातील स्थानिक चवीनुसार अन्न पुरवते. गोव्यात मेनूमध्ये चपाती, बटाटा भाजी, वाटाणा भाजी, कुर्मा भाजी, इडली- सांबार, सोया चंक्स, मिक्स-व्हेज पुलाव इत्यादी पदार्थांचा समावेश असेल.

५००० हजार मुलांना लाभ

एनपीसीआयचे प्रवक्ते म्हणाले, अक्षयपात्रमुळे गोव्यातील ५००० शालेय मुलांसाठी माध्यान्ह भोजन उपलब्ध होईल. मुलांच्या आरोग्याला आणि सर्वांगीण विकासाला हातभार लागेल. या उदात्त उपक्रमाला चालना देण्यासाठी गोवा सरकार आणि अक्षयपात्र फाउंडेशनच्या प्रयत्नांचे आम्ही मनापासून कौतुक करतो.

७८ देशात स्वयंपाकघरे तांदूळ शिजवण्याच्या ६०० लिटर क्षमतेच्या कढईत ६० मिनिटांत १,२५० जणांचे जेवण तयार करते. 

डाळीच्या ६०० लिटर क्षमतेच्या कढईत २० मिनिटांत २००० जणांचे जेवण सुनिश्चित करते. इडली दर तासाला इडली स्टीमरद्वारे तयार करता येतात. 

निमस्वयंचलित चपाती मशीन: तासाला २००० चपात्या बनवते. यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत आणि चांगले जेवण पुरवण्यात येणार आहे. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत