शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
3
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
4
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
5
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
6
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
7
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
8
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
9
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
10
चांदीसाठी किलोला ‘जीएसटी’सह मोजा दोन लाख रुपये ! दोन हजारांच्या वाढीसह पोहोचली १,९४,००० रुपयांवर
11
इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
12
भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
13
विमा क्षेत्रात १०० टक्के ‘एफडीआय’ला मंजुरी; आतापर्यंत एफडीआयमार्फत ८२,००० कोटींची परकीय गुंतवणूक
14
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
15
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
16
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
17
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
18
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
19
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
20
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभर फिरून लोकांच्या समस्या ऐकल्या, आता अधिवेशनात सरकारला जाब विचारेन: विजय सरदेसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 09:48 IST

सर्व विरोधकांशी समन्वय ठेवून सरकारला घेरणार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील सर्व १२ तालुक्यांतील लोकांच्या समस्या घेऊन पावसाळी अधिवेशनात सरकारवर हल्लाबोल केला जाईल, अशी माहिती गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी दिली. यावेळी त्यांनी सर्व विरोधी पक्षांशी समन्वय साधत सरकारला विविध मुद्द्यावर जाब विचारू, असेही सांगितले.

पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 'आमचो आवाज विजय'च्या बॅनरखाली पक्षाने मागील अनेक दिवसांपासून सर्व तालुक्यांत जाऊन लोकांची गाऱ्हाणी ऐकली. आता लोकांच्या समस्या घेऊन सरकारला अधिवेशनात जाब विचारला जाईल. पेडणेत टॅक्सी व्यावसायिकांचे प्रश्न आहेत, वाळपईत नवोदय विद्यालयाचा प्रश्न आहे, पणजीत स्मार्ट सिटी मोठी समस्या बनली आहे. कुडचडेत आरोग्य सुविधांची वाणवा आहे, शिरोडेत पिण्याच्या पाण्याचा तुटवडा, सासष्टीत जिल्हा इस्पितळ असूनही आरोग्याच्या अनेक समस्या आहेत तर काणकोणातही विविध समस्या असून, याबद्दल विचारले जाईल, असेही सरदेसाई यांनी सांगितले. सभापती रमेश तवडकर हे भाजपच्या बैठकीत उपस्थित राहिल्यावर आपण टीका केली म्हणून पोलिस तक्रार दाखल करण्यात आली. परंतु असल्या तक्रारींना आपण भीत नाही. कोमुनिदादींच्या जमिनीत असलेली घरे वाचविण्यासाठी सरकारकडून आणल्या जाणाऱ्या विधेयकाविषयी बोलताना सरदेसाई म्हणाले की, त्या विधेयकाचा अगोदर अभ्यास केला जाईल.

...तर दामू नाईक आमचे नेते आहेत, असे मानू

गोमंतकीयांचे विविध प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. पारपंरिक व्यवसाय करणारे भरडले जात आहेत. आम्ही जे विषय काढले त्याच्या समर्थनार्थ खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक बोलत आहेत ही चांगली गोष्ट आहे. टॅक्सी व्यावसायिकांच्या समस्या आयएएस अधिकाऱ्यांना कळत नाहीत, असे दामू म्हणाले. त्यामुळे विधानसभेतही त्यांनी आपल्या आमदारांना तशीच भूमिका घ्यायला सांगावे आणि सरकारच लोकांच्या हिताचे काम करीत नाही हे मान्य करण्यास सांगावे जेणे करून आम्ही त्यांना समर्थन देऊ आणि ते आमचे नेते आहेत असेही मानू, असेही ते म्हणाले.

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण