शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत जाण्याची इच्छा नाही!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे उद्‌गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2025 09:41 IST

गोव्याचा अजूनही बराच विकास करण्याचे काम बाकी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: 'दिल्लीत जाण्याची माझी इच्छा नाही. मुख्यमंत्री म्हणून गोव्याचा अजून बराच विकास करण्याचे काम बाकी आहे. माझ्यासाठी गोवाच ठीक असून या लहान राज्याचेच नेतृत्व करायला मला आवडेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही गोव्यात सर्वांत जास्त काळ काम केलेले आहे. प्रशासनाचा अनुभव तुम्हाला आहे. पर्रीकर यांना मोदींनी केंद्रात नेले होते, तसे तुम्हाला नेले तर जाणार काय, या प्रश्नावर सावंत म्हणाले की, गोव्यासारखे लहान राज्यच माझ्यासाठी चांगले. गोव्यात आणखी बरेच काम करावयाचे आहे. दिल्लीत जाण्याची माझी इच्छा नाही.

सावंत म्हणाले की, गोव्याचे पर्यटन केवळ 'सन, सॅण्ड अॅण्ड सी' यापुरतेच मर्यादित नाही तर येथे ऐतिहासिक मंदिरेही असून आध्यात्मिक पर्यटनही चालते. राज्यात ७० टक्के हिंदू आहेत. अयोध्येतील राम जन्मभूमीसारखा इतिहास महालसा मंदिरालाही आहे. पाचशे वर्षे जुने असलेले हे मंदिर पोर्तुगीजांनी पाडले, मात्र सरकारने वेर्णा येथे या मंदिराचे पुनर्निर्माण केले. पोर्तुगीजांनी पाडलेले सप्तकोटेश्वर मंदिराचे शिवाजी महाराजांनी पुनर्निर्माण केले होते. हे मंदिर नव्याने बांधून लोकार्पण करण्याचे भाग्य मुख्यमंत्री म्हणून मला लाभले.

केंद्र सरकारने २०४७ पर्यंत 'विकसित भारत'चे लक्ष्य ठेवले असताना गोवा सरकारने २०३७ पर्यंत 'विकसित गोवा'चा संकल्प सोडलेला आहे. पुढील २५ वर्षांचे नियोजन करून चालू असलेली ८० टक्के पायाभूत विकासाची कामे पूर्ण झालेली आहेत. पर्यटन व उद्योग क्षेत्रात आवश्यक मनुष्यबळ तयार करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी कौशल्य प्रशिक्षण दिले जात आहे.

महाकुंभला अमृतस्नान करून सकारात्मक ऊर्जा मिळाली. ५० कोटीहून अधिक लोकांनी महाकुंभमध्ये स्नान केले. तो एक अदभूत अनुभव होता. महाकुंभला व्हीआयपी सुविधांची तशी गरज नाही. मी तसा व्हीआयपी कल्चरमध्ये राहात नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

गोव्याचे किनारे स्वच्छ व सुरक्षित आहेत. गेल्या दहा वर्षांत राज्य सरकारने झपाट्याने पायाभूत सुविधा निर्माण केल्या. रस्ते व पुलांवर ४० हजार कोटी रुपये खर्च केले. दाबोळी विमानतळाचा विस्तार केला. मोपा येथे नवीन विमानतळ बांधून कार्यरत केला व कनेक्टिव्हिटी वाढवली.

'इन्फ्ल्युएन्सर्स' खोटी माहिती पसरवत आहेत

पर्यटन उद्योग राज्य सरकारच्या घरेलू उत्पन्नात १६.४ टक्के योगदान देतो. गोव्यातील ३५ टक्के लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पर्यटनावर अवलंबून आहेत. असे असताना राज्यात पर्यटकांची संख्या झपाट्याने का घटते आहे? असा प्रश्न केला असता मुख्यमंत्री म्हणाले की, पर्यटकांची संख्या कमी झालेली नाही. उलट ती वाढत आहे. काही इन्फ्ल्युएन्सर्स खोटी माहिती पसरवून अपप्रचार करत आहेत. गोव्यातील पर्यटन हिसकावून घेण्यासाठी हा खटाटोप आहे.

'इव्हेंटस' ग्रामीण भागात

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सनबर्न तसेच इतर इव्हेंट किनाऱ्यापासून दूर नेले. त्यामुळे नववर्ष-नाताळात किनाऱ्यावर गर्दी दिसली नाही. याचा अर्थ गोव्यात यंदा पर्यटक आलेच नाहीत किंवा संख्या घटली असा होत नाही. उलट या वर्षी १ कोटी पर्यटकांनी गोव्याला भेट दिली. गेल्या वर्षी हीच संख्या ८० लाख होती. पर्यटन मोसम बहरलेला असताना जीएसटीमध्ये ९ टक्के वाढ झाली.

पाच मिनिटात पोलिस पोहचतात घटनास्थळी

मुख्यमंत्री म्हणाले की, किनारी भागात १०० क्रमांकांवर घटनेची माहिती मिळताच पाच ते दहा मिनिटात पोलिस घटनास्थळी पोहचतात. पूर्वी काही दुर्दैवी घटना घडल्या असतील, परंतु प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. पर्यटकांनीही स्थानिकांशी चांगल्या प्रकारे वागले पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिस नजर ठेवून असतात. किनाऱ्यांवर जीवरक्षक कार्यरत असून गेल्या पाच वर्षांत ७०० हून अधिक जणांना बुडताना वाचवले आहे.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत