शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

दिल्लीत जाण्याची इच्छा नाही!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे उद्‌गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2025 09:41 IST

गोव्याचा अजूनही बराच विकास करण्याचे काम बाकी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: 'दिल्लीत जाण्याची माझी इच्छा नाही. मुख्यमंत्री म्हणून गोव्याचा अजून बराच विकास करण्याचे काम बाकी आहे. माझ्यासाठी गोवाच ठीक असून या लहान राज्याचेच नेतृत्व करायला मला आवडेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही गोव्यात सर्वांत जास्त काळ काम केलेले आहे. प्रशासनाचा अनुभव तुम्हाला आहे. पर्रीकर यांना मोदींनी केंद्रात नेले होते, तसे तुम्हाला नेले तर जाणार काय, या प्रश्नावर सावंत म्हणाले की, गोव्यासारखे लहान राज्यच माझ्यासाठी चांगले. गोव्यात आणखी बरेच काम करावयाचे आहे. दिल्लीत जाण्याची माझी इच्छा नाही.

सावंत म्हणाले की, गोव्याचे पर्यटन केवळ 'सन, सॅण्ड अॅण्ड सी' यापुरतेच मर्यादित नाही तर येथे ऐतिहासिक मंदिरेही असून आध्यात्मिक पर्यटनही चालते. राज्यात ७० टक्के हिंदू आहेत. अयोध्येतील राम जन्मभूमीसारखा इतिहास महालसा मंदिरालाही आहे. पाचशे वर्षे जुने असलेले हे मंदिर पोर्तुगीजांनी पाडले, मात्र सरकारने वेर्णा येथे या मंदिराचे पुनर्निर्माण केले. पोर्तुगीजांनी पाडलेले सप्तकोटेश्वर मंदिराचे शिवाजी महाराजांनी पुनर्निर्माण केले होते. हे मंदिर नव्याने बांधून लोकार्पण करण्याचे भाग्य मुख्यमंत्री म्हणून मला लाभले.

केंद्र सरकारने २०४७ पर्यंत 'विकसित भारत'चे लक्ष्य ठेवले असताना गोवा सरकारने २०३७ पर्यंत 'विकसित गोवा'चा संकल्प सोडलेला आहे. पुढील २५ वर्षांचे नियोजन करून चालू असलेली ८० टक्के पायाभूत विकासाची कामे पूर्ण झालेली आहेत. पर्यटन व उद्योग क्षेत्रात आवश्यक मनुष्यबळ तयार करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी कौशल्य प्रशिक्षण दिले जात आहे.

महाकुंभला अमृतस्नान करून सकारात्मक ऊर्जा मिळाली. ५० कोटीहून अधिक लोकांनी महाकुंभमध्ये स्नान केले. तो एक अदभूत अनुभव होता. महाकुंभला व्हीआयपी सुविधांची तशी गरज नाही. मी तसा व्हीआयपी कल्चरमध्ये राहात नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

गोव्याचे किनारे स्वच्छ व सुरक्षित आहेत. गेल्या दहा वर्षांत राज्य सरकारने झपाट्याने पायाभूत सुविधा निर्माण केल्या. रस्ते व पुलांवर ४० हजार कोटी रुपये खर्च केले. दाबोळी विमानतळाचा विस्तार केला. मोपा येथे नवीन विमानतळ बांधून कार्यरत केला व कनेक्टिव्हिटी वाढवली.

'इन्फ्ल्युएन्सर्स' खोटी माहिती पसरवत आहेत

पर्यटन उद्योग राज्य सरकारच्या घरेलू उत्पन्नात १६.४ टक्के योगदान देतो. गोव्यातील ३५ टक्के लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पर्यटनावर अवलंबून आहेत. असे असताना राज्यात पर्यटकांची संख्या झपाट्याने का घटते आहे? असा प्रश्न केला असता मुख्यमंत्री म्हणाले की, पर्यटकांची संख्या कमी झालेली नाही. उलट ती वाढत आहे. काही इन्फ्ल्युएन्सर्स खोटी माहिती पसरवून अपप्रचार करत आहेत. गोव्यातील पर्यटन हिसकावून घेण्यासाठी हा खटाटोप आहे.

'इव्हेंटस' ग्रामीण भागात

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सनबर्न तसेच इतर इव्हेंट किनाऱ्यापासून दूर नेले. त्यामुळे नववर्ष-नाताळात किनाऱ्यावर गर्दी दिसली नाही. याचा अर्थ गोव्यात यंदा पर्यटक आलेच नाहीत किंवा संख्या घटली असा होत नाही. उलट या वर्षी १ कोटी पर्यटकांनी गोव्याला भेट दिली. गेल्या वर्षी हीच संख्या ८० लाख होती. पर्यटन मोसम बहरलेला असताना जीएसटीमध्ये ९ टक्के वाढ झाली.

पाच मिनिटात पोलिस पोहचतात घटनास्थळी

मुख्यमंत्री म्हणाले की, किनारी भागात १०० क्रमांकांवर घटनेची माहिती मिळताच पाच ते दहा मिनिटात पोलिस घटनास्थळी पोहचतात. पूर्वी काही दुर्दैवी घटना घडल्या असतील, परंतु प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. पर्यटकांनीही स्थानिकांशी चांगल्या प्रकारे वागले पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिस नजर ठेवून असतात. किनाऱ्यांवर जीवरक्षक कार्यरत असून गेल्या पाच वर्षांत ७०० हून अधिक जणांना बुडताना वाचवले आहे.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत