शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

पंधरा दिवसात निर्णय घ्या;अन्यथा कारखान्यासमोर उपोषणास बसणार

By आप्पा बुवा | Updated: November 17, 2023 18:23 IST

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा इशारा.

फोंडा: संजीवनी साखर कारखान्याच्या बाबतीत नेहमीप्रमाणे सरकारने पुन्हा एकदा चालढकल सुरू केली आहे. सरकार आपण दिलेले आश्वासन नेहमीप्रमाणे विसरलेले आहे. शेतकऱ्यांचा सरकारवरील विश्वास हळूहळू ढळत चालला असून सरकारने पंधरा दिवसात संजीवनी साखर कारखान्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा संजीवनी साखर कारखान्यासमोर प्रसंगी आमरण उपोषणास बसू. असा इशारा ऊस उत्पादक शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यावेळी अध्यक्ष राजेंद्र देसाई, उपाध्यक्ष हर्षद प्रभुदेसाई, गुरुदास गाड , फ्रान्सिस मस्केरेनास आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 यावेळी बोलताना अध्यक्ष राजेंद्र देसाई म्हणाले की सरकारने ज्यावेळी कारखाना बंद केला त्यावेळी येथे इथेनॉल प्रकल्प आणण्यासाठीचे सुतोवाच केले होते.  प्रकल्पासाठी काही संस्था पुढे आल्या परंतु काही कारणास्तव ती बोली पुढे जाऊ शकली नाही. परिणामी सरकारने शेतकऱ्यांनाच  प्रकल्पासंदर्भात योग्य ती व्यक्ती आणण्यासाठी सुचवले. आम्ही यथार्थ अभ्यास करून एक व्यक्ती सरकारच्या निदर्शनास आणून दिली. तो माणूस सरकारला प्रत्येक वर्षी दीड कोटी द्यायला तयार आहे व इथले ऊस  उत्पादन तसेच कारखान्यातील उत्पादन घ्यायला तयार आहे. कारखाना चालवायला  समोर माणूस तयार आहे . सरकारला पैसे द्यायला तयार आहे. अशावेळी सुद्धा सरकार त्यावर ठोस निर्णय घेत नाही. यावरून असे सिद्ध होते की सरकारला कारखाना सुरू करायचाच नाही. इथली जमीन ते अन्य संस्थांना देण्यासाठी वावरत आहेत की काय असा आम्हाला संशय आम्हाला येत आहे.परंतु इथली एक इंच जमीन आम्ही कुणाला विकू देणार नाही. परिणामी रस्त्यावर झोपू परंतु कारखान्याच्या जमिनीला हात लावू देणार नाही.

 या संदर्भात बोलताना उपाध्यक्ष हर्षद प्रभुदेसाई म्हणाले की आतापर्यंत इथल्या  लाखो चौरस मीटर जमिनीवर सगळ्यांचा डोळा आहे. परंतु ही जमीन शेतकऱ्यांच्या हक्काची आहे. ती कुणालाही आम्ही देऊ देणार नाही. सरकारने आम्हाला काही वर्षाकरिता अनुदान देण्याची भाषा केली होती. ते अनुदान आम्हाला मिळाला आहे त्याबद्दल आम्ही सरकारचे आभारी आहोत. परंतु  पुढच्या वर्षीपासून आम्हाला मदत मिळणार नाही. आता  सरकारने स्पष्ट सांगावे जेणेकरून शेतकरी इतर उत्पादन घेण्यासाठी हालचाल करू शकेल. ऊस उत्पादनातून शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळत होता. परंतु सरकारला शेतकऱ्यांना उपाशीच ठेवायचे आहे की काय असा संशय आम्हाला येत आहे.

टॅग्स :goaगोवाStrikeसंपSugar factoryसाखर कारखाने