शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

पंधरा दिवसात निर्णय घ्या;अन्यथा कारखान्यासमोर उपोषणास बसणार

By आप्पा बुवा | Updated: November 17, 2023 18:23 IST

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा इशारा.

फोंडा: संजीवनी साखर कारखान्याच्या बाबतीत नेहमीप्रमाणे सरकारने पुन्हा एकदा चालढकल सुरू केली आहे. सरकार आपण दिलेले आश्वासन नेहमीप्रमाणे विसरलेले आहे. शेतकऱ्यांचा सरकारवरील विश्वास हळूहळू ढळत चालला असून सरकारने पंधरा दिवसात संजीवनी साखर कारखान्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा संजीवनी साखर कारखान्यासमोर प्रसंगी आमरण उपोषणास बसू. असा इशारा ऊस उत्पादक शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यावेळी अध्यक्ष राजेंद्र देसाई, उपाध्यक्ष हर्षद प्रभुदेसाई, गुरुदास गाड , फ्रान्सिस मस्केरेनास आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 यावेळी बोलताना अध्यक्ष राजेंद्र देसाई म्हणाले की सरकारने ज्यावेळी कारखाना बंद केला त्यावेळी येथे इथेनॉल प्रकल्प आणण्यासाठीचे सुतोवाच केले होते.  प्रकल्पासाठी काही संस्था पुढे आल्या परंतु काही कारणास्तव ती बोली पुढे जाऊ शकली नाही. परिणामी सरकारने शेतकऱ्यांनाच  प्रकल्पासंदर्भात योग्य ती व्यक्ती आणण्यासाठी सुचवले. आम्ही यथार्थ अभ्यास करून एक व्यक्ती सरकारच्या निदर्शनास आणून दिली. तो माणूस सरकारला प्रत्येक वर्षी दीड कोटी द्यायला तयार आहे व इथले ऊस  उत्पादन तसेच कारखान्यातील उत्पादन घ्यायला तयार आहे. कारखाना चालवायला  समोर माणूस तयार आहे . सरकारला पैसे द्यायला तयार आहे. अशावेळी सुद्धा सरकार त्यावर ठोस निर्णय घेत नाही. यावरून असे सिद्ध होते की सरकारला कारखाना सुरू करायचाच नाही. इथली जमीन ते अन्य संस्थांना देण्यासाठी वावरत आहेत की काय असा आम्हाला संशय आम्हाला येत आहे.परंतु इथली एक इंच जमीन आम्ही कुणाला विकू देणार नाही. परिणामी रस्त्यावर झोपू परंतु कारखान्याच्या जमिनीला हात लावू देणार नाही.

 या संदर्भात बोलताना उपाध्यक्ष हर्षद प्रभुदेसाई म्हणाले की आतापर्यंत इथल्या  लाखो चौरस मीटर जमिनीवर सगळ्यांचा डोळा आहे. परंतु ही जमीन शेतकऱ्यांच्या हक्काची आहे. ती कुणालाही आम्ही देऊ देणार नाही. सरकारने आम्हाला काही वर्षाकरिता अनुदान देण्याची भाषा केली होती. ते अनुदान आम्हाला मिळाला आहे त्याबद्दल आम्ही सरकारचे आभारी आहोत. परंतु  पुढच्या वर्षीपासून आम्हाला मदत मिळणार नाही. आता  सरकारने स्पष्ट सांगावे जेणेकरून शेतकरी इतर उत्पादन घेण्यासाठी हालचाल करू शकेल. ऊस उत्पादनातून शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळत होता. परंतु सरकारला शेतकऱ्यांना उपाशीच ठेवायचे आहे की काय असा संशय आम्हाला येत आहे.

टॅग्स :goaगोवाStrikeसंपSugar factoryसाखर कारखाने