शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

विदेशातील गोमंतकीयांच्या आशा पुन्हा पल्लवीत; सर्वोच्च न्यायालयात विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 14:27 IST

विदेशात कार्यरत गोमंतकियांच्या आशा पुन्हा पल्लवित आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणात याचिका दाखल झाली आहे. त्यामुळे विदेशात कार्यरत गोमंतकियांच्या आशा पुन्हा पल्लवित आहेत.

'नागरिकत्व कायदा १९५५ मधील तरतुदींनुसार एखाद्या व्यक्तीने स्वतःहून दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर, त्याचे भारतीय नागरिकत्व आपोआप संपुष्टात येते. गोव्यातील अनेक नागरिकांनी युरोपात नोकरी करण्यास सोयीस्कर व्हावे, यासाठी पोर्तुगीज नागरिकत्व मिळविले आहे. पोर्तुगीज नागरिकत्व मिळाल्यामुळे त्यांना पोर्तुगाल व इंग्लंडसारख्या युरोपातील देशांत नोकरीसाठी संधी उपलब्ध झाल्या आहेत. अनेकांनी नोकऱ्या मिळवल्या आहेत. परंतु विदेशी नागरिकत्वामुळे भारतीय नागरिकत्व त्यांना गमवावे लागले.

दरम्यान, ही समस्या केवळ राज्यापुरती मर्यादित नसून देशभर आहे. प्रा. तरुनाभ खेतान याने या नागरिकत्व रद्द करण्याच्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देताना सरकारला याचा अधिकार नसल्याचा दावा केला आहे. कायदा असंवैधानिक असल्याचे याचिकेत म्हटले आहे. त्यांच्या याचिकेची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना आणि एम. सुंदरेश यांच्या पीठाने केंद्र सरकारला नोटीस बजावली.

अनेक देश दुहेरी नागरिकत्वाला मान्यता देतात. पण, भारताने एकल नागरिकत्वाचा पुरस्कार केल्याने विदेशात काम करणाऱ्या पण, भारताशी मूळ नाते असलेल्यांवर अन्याय होत आहे. या जाचक तरतुदींमधून तोडगा काढावा, अशी विनंती याचिकाकर्त्याने केली आहे. त्यामुळे न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली आहे.

याबाबत, ज्येष्ठ वकील एस. एन. जोशी यांच्या मतानुसार या याचिकेतील फलनिष्पत्तीवर विदेशी नागरिकत्व घेऊन विदेशात नोकरी करणाऱ्या गोमंतकीयांवर फारसा परिणाम होणार नाही. विदेशी नागरिकत्व घेतलेल्यांना भारतीय नागरिकत्व हवे असते, ते येथील मालमत्ता राखण्यासाठी. मालमत्ता राखण्यासाठी इतरही कायदेशीर मार्ग आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.

भारताचे उपसॉलीसीटर जनरल अॅड. प्रवीण फळदेसाई सांगतात की, सर्वोच्च न्यायालय फार तर केंद्र सरकारला यावर विचार करायला सांगू शकेल, विदेशी नागरिकत्व मिळविलेल्या अनेक गोमंतकियांची दुहेरी नागरिकत्वाची मागणीही आहे. ही मागणी योग्य की अयोग्य हा वेगळा विषय एनआरआय आयोग त्यावर काम करत आहे.

 

टॅग्स :goaगोवाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय