शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

सरकारी अर्जांवर दीनदयाळ उपाध्याय यांची छबी असलेला होलोग्राम, काँग्रेसचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 13:34 IST

गोव्यात सरकारी अर्जांवर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची छबी असलेला होलोग्राम छापल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी त्यास जोरदार हरकत घेतली असून हा होलोग्राम काढून टाकावा, अशी मागणी केली आहे.

पणजी : गोव्यात सरकारी अर्जांवर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची छबी असलेला होलोग्राम छापल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी त्यास जोरदार हरकत घेतली असून हा होलोग्राम काढून टाकावा, अशी मागणी केली आहे.पत्रकार परिषदेत शांताराम नाईक म्हणाले की, पंडित दीनदयाळ उपाध्याय लोकशाहीविरोधी होते. त्यांनी भारताच्या मुक्तीलढ्याला विरोध केला होता. ते कट्टर जातीयवादी होते. सरकारी अर्जांवर अशा व्यक्तीची छबी म्हणजे लोकशाहीचा आणि देशाच्या मुक्ती लढ्याचा अपमान आहे. शांताराम यांनी असाही आरोप केला की, पंडित दीनदयाळ यांनी त्यावेळी असे म्हटले होते की 'मुस्लिम आणि ख्रिस्ती लोकांनी त्यांचे  स्वतंत्र अस्तित्व विसरावे  आणि  हिंदू रितीरिवाजानुसार  या देशात  गुलाम म्हणून राहावे.' अशा अशा व्यक्तीची पूजा करणे गैर आहे. एका काँग्रेस कार्यकर्त्याने वाळू उपशासाठी खाण खात्यात अर्ज केला असता त्या अर्जावर  उपाध्याय यांची  छबी असलेला होलोग्राम आढळून आला. पत्रकार परिषदेसाठी हा कार्यकर्ता उपस्थित होता. त्याने हा अर्ज पत्रकारांना दाखवला. सरकारच्या अन्य योजनांसाठी असलेल्या अर्जावरही अशाच पद्धतीचे उपाध्याय यांची छबी असलेले होलोग्राम  असल्याचे आढळून आले आहे, असे शांताराम यांनी सांगितले.दरम्यान, उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक आणि डेटा एंट्री ऑपरेटर यांची भरती चालली आहे त्यात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप शांताराम यांनी केला असून दक्षता खात्याने या प्रकरणाची स्वेच्छा दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात 40 कनिष्ठ लिपिक आणि 24 डेटा एंट्री ऑपरेटर जागा दोन ते 10 महिन्यांच्या कालावधीसाठी भरण्यात येत आहेत त्यासाठी युवक युवतींनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. या भरतीत मोठा भ्रष्टाचार चालला असून 20 लाख रुपयांप्रमाणे पर्यंत दर चालला आहे, असा आरोप शांताराम यांनी केला. एक तर हे प्रकरण मुख्यमंत्र्यांनी स्वतः चौकशीसाठी दक्षता खात्याकडे सोपवावे किंवा दक्षता खात्याने याची स्वेच्छा दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे

दरम्यान राज्यात नारळाचे दर वाढल्याने महिला काँग्रेसने केलेल्या आंदोलनाला नावे ठेवून हेटाळणी केल्याबद्दल मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा समाचार घेतला आहे. एकीकडे मोदी सरकार स्टार्ट अप योजनेंतर्गत महिलांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देते तर दुसरीकडे पर्रिकर महिला उद्योजकांची हेटाळणी करतात, असा आरोप शांताराम यांनी केला. महिला काँग्रेसची केलेली हेटाळणी म्हणजे टाळणे मोदी यांच्या धोरणाचा अपमान आहे असे ते म्हणाले.