शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी अर्जांवर दीनदयाळ उपाध्याय यांची छबी असलेला होलोग्राम, काँग्रेसचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 13:34 IST

गोव्यात सरकारी अर्जांवर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची छबी असलेला होलोग्राम छापल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी त्यास जोरदार हरकत घेतली असून हा होलोग्राम काढून टाकावा, अशी मागणी केली आहे.

पणजी : गोव्यात सरकारी अर्जांवर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची छबी असलेला होलोग्राम छापल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी त्यास जोरदार हरकत घेतली असून हा होलोग्राम काढून टाकावा, अशी मागणी केली आहे.पत्रकार परिषदेत शांताराम नाईक म्हणाले की, पंडित दीनदयाळ उपाध्याय लोकशाहीविरोधी होते. त्यांनी भारताच्या मुक्तीलढ्याला विरोध केला होता. ते कट्टर जातीयवादी होते. सरकारी अर्जांवर अशा व्यक्तीची छबी म्हणजे लोकशाहीचा आणि देशाच्या मुक्ती लढ्याचा अपमान आहे. शांताराम यांनी असाही आरोप केला की, पंडित दीनदयाळ यांनी त्यावेळी असे म्हटले होते की 'मुस्लिम आणि ख्रिस्ती लोकांनी त्यांचे  स्वतंत्र अस्तित्व विसरावे  आणि  हिंदू रितीरिवाजानुसार  या देशात  गुलाम म्हणून राहावे.' अशा अशा व्यक्तीची पूजा करणे गैर आहे. एका काँग्रेस कार्यकर्त्याने वाळू उपशासाठी खाण खात्यात अर्ज केला असता त्या अर्जावर  उपाध्याय यांची  छबी असलेला होलोग्राम आढळून आला. पत्रकार परिषदेसाठी हा कार्यकर्ता उपस्थित होता. त्याने हा अर्ज पत्रकारांना दाखवला. सरकारच्या अन्य योजनांसाठी असलेल्या अर्जावरही अशाच पद्धतीचे उपाध्याय यांची छबी असलेले होलोग्राम  असल्याचे आढळून आले आहे, असे शांताराम यांनी सांगितले.दरम्यान, उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक आणि डेटा एंट्री ऑपरेटर यांची भरती चालली आहे त्यात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप शांताराम यांनी केला असून दक्षता खात्याने या प्रकरणाची स्वेच्छा दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात 40 कनिष्ठ लिपिक आणि 24 डेटा एंट्री ऑपरेटर जागा दोन ते 10 महिन्यांच्या कालावधीसाठी भरण्यात येत आहेत त्यासाठी युवक युवतींनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. या भरतीत मोठा भ्रष्टाचार चालला असून 20 लाख रुपयांप्रमाणे पर्यंत दर चालला आहे, असा आरोप शांताराम यांनी केला. एक तर हे प्रकरण मुख्यमंत्र्यांनी स्वतः चौकशीसाठी दक्षता खात्याकडे सोपवावे किंवा दक्षता खात्याने याची स्वेच्छा दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे

दरम्यान राज्यात नारळाचे दर वाढल्याने महिला काँग्रेसने केलेल्या आंदोलनाला नावे ठेवून हेटाळणी केल्याबद्दल मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा समाचार घेतला आहे. एकीकडे मोदी सरकार स्टार्ट अप योजनेंतर्गत महिलांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देते तर दुसरीकडे पर्रिकर महिला उद्योजकांची हेटाळणी करतात, असा आरोप शांताराम यांनी केला. महिला काँग्रेसची केलेली हेटाळणी म्हणजे टाळणे मोदी यांच्या धोरणाचा अपमान आहे असे ते म्हणाले.