शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

वाहिनी गंजल्याने पडली छिद्रे; १ किमी परिसरात पसरले तेल, दुरुस्तीसाठी हालचाली सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 15:46 IST

१५ दिवसांनी सापडली पेट्रोल गळती 

लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : माटवे-दाबोळी येथील विहिरीच्या पाण्यात पेट्रोलियम पदार्थ कोठून मिसळला याचे सत्य १५ दिवसांनंतर काल, मंगळवारी उघड झाले. मुरगाव बंदरातून साकवाळ येथील झुआरी कंपनी व्यवस्थापनाकडे पेट्रोलियम पदार्थ वाहून नेणारी भूमिगत वाहिनी गंजून तिला गळती लागल्याची माहिती मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमळी यांनी दिली.

२७ नोव्हेंबर रोजी माटवे-दाबोळी येथील एका विहिरीत पेट्रोलियम पदार्थ मिसळून पाणी दूषित झाले होते. नंतर काही दिवसांनी तेथील नाल्यात आणि लोकांच्या शेतजमिनीतूनही पेट्रोलियम पदार्थासारखा वास येऊ लागला. या प्रकारामुळे माटवे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच दूषित पाण्यामुळे येथील शेती, झाडे, माड याला मोठा धोका निर्माण झाला होता.

मुरगाव बंदरात जहाजाद्वारे येणाऱ्या पेट्रोल, डिझेल या पदार्थांचा साठा करून ठेवला जातो. मुरगाव बंदरातून साकवाळ झुआरी व्यवस्थापनाकडे हा साठा नेण्यासाठी १४ किलोमीटर भूमिगत वाहिनी घालण्यात आली आहे. या वाहिनीला कुठेतरी गळती लागल्याने पेट्रोलियम पदार्थ विहिरीच्या पाण्यात, नाल्यात, शेतजमिनीत मिसळल्याचा दाट संशय होता. त्यामुळे झुआरी कंपनीने गळती शोधण्यासाठी खोदकामास सुरुवात केली.

सुरुवातीला काही दिवस गळतीचा शोध न लागल्यामुळे झुआरी व्यवस्थापनाने दुसऱ्या राज्यातून तज्ज्ञ बोलावले तसेच पंजाबहून विशेष श्वान पथक पाचारण केले. या पथकाने गळतीची काही ठिकाणी दाखविल्यानंतर पुन्हा खोदकाम सुरू करण्यात आले. अखेर मंगळवारी दुपारी ३च्या सुमारास गळतीची जागा सापडली.

९०० मीटर भाग बाधित

दाबोळी-वालीस जंक्शनजवळून पेट्रोलियम पदार्थ वाहून नेण्याऱ्या भूमिगत वाहिनीचा काही भाग गंजून त्याला छिद्रे पडल्याचे निदर्शनास आले. खोदकाम सुरू असतानाच कामगारांना त्या जागेवर पेट्रोलियम पदार्थाचा उग्र वास येऊ लागला. याबाबत उपजिल्हाधिकारी भगवंत करमळी यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, वाहिनीला कुठे गळती लागली, ती जागा सापडली आहे. जिथे वाहिनीला छिद्र पडले तिथून साधारणतः ९०० मीटर अंतरावर उतरणी भागात ती विहीर (माटवे) दूषित झालेली विहीर आहे.

तपासणीत 3 वाहिनीच्या एका ठिकाणी गंजून छिद्र पडल्याचे आढळून आले आहे. ही वाहिनी २२ वर्षीय जुनी असून, तिची पूर्ण तपासणी होणार आहे. वेळोवेळी वाहिनीची देखभाल, दुरुस्ती केली जाते. याच महिन्यात या कामासाठी जर्मनीच्या एका कंपनीला बोलविण्यात आले होते. २२ नोव्हेंबरपूर्वी या वाहिनीतून शेवटचा पेट्रोलियम पदार्थ वाहून नेण्यात आला होता. विहिरीचे पाणी दूषित झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यापासूनही वाहिनी बंद आहे.

उद्या मलेशियाहून तज्ज्ञांचे पथक येणार

१५ दिवसांपासून वाहिनीला कुठे गळती लागली आहे, ते शोधून काढण्याचे काम युद्धपातळीवर चालू होते, अशी माहिती 'झुआरी'चे अधिकारी शिवप्रसाद नायक यांनी दिली. आता गुरुवारी मलेशियाहून कंपनीचे तज्ज्ञ अधिकारी व कर्मचारी आधुनिक यंत्रणासह गोव्यात येणार असून, त्यानंतर दुरुस्ती काम हाती घेतले जाईल. तसेच संपूर्ण वाहिनीचे सर्वेक्षण करून आणखी कुठे गळती लागली आहे का? याची तपासणी केली जाणार आहे.

संबंधित पेट्रोलियम कंपनीला सरकारने नोटीस बजावलेली आहे. पेट्रोलवाहिनीची वेळोवेळी देखभाल, दुरुस्ती न केल्यानेच हा प्रकार घडलेला आहे. सर्वेक्षण करून सर्वच पेट्रोल वाहिनी बदलण्याचे आदेश सरकारने कंपनीला दिलेले आहेत. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री. 

टॅग्स :goaगोवा