शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
5
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
6
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
7
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
8
61 पैशांच्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्याने लागतंय अप्पर सर्किट; कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
9
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
11
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
12
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
13
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
14
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

..तर भारतात हिंदवी स्वराज्याची आधीच स्थापन झाली असती: शरद पोंक्षे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 09:43 IST

पराक्रमी योद्ध्याला प्रसिद्धीपासून खूप लांब ठेवून त्याच्यावर अन्याय केला गेला, अशी खंत प्रसिद्ध अभिनेते व व्याख्याते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा: जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर अन्याय- अत्याचार करणाऱ्या शासकांची ही क्रूर परंपरा चालूच राहिली असती. शिवाजी महाराजांनंतर मोगलांना तोडीस तोड आव्हान देण्याचे काम बाजीराव पेशवे यांनी केले. 

अटकेपार झेंडे लावण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या योद्ध्यांच्या पराक्रमाला जागतिक दर्जा मिळायला पाहिजे होता; परंतु संकुचित वृत्तीच्या लोकांनी त्यांचा पराक्रम बाजूला ठेवून त्यांच्या जीवनात आलेल्या मस्तानीला अधोरेखित केले. कौटुंबिक कलहामुळे ४१ लढाया सतत जिंकलेला या पराक्रमी योद्ध्याला प्रसिद्धीपासून खूप लांब ठेवून त्याच्यावर अन्याय केला गेला, अशी खंत प्रसिद्ध अभिनेते व व्याख्याते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली.

हिंदू संस्कृतीत 'न्यास' या संस्थेची फोंड्यात स्थापना झाली असून तिचा प्रारंभ शरद पोंक्षे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जयंत मिरींगकर, सचिव मनोज गावकर, खजिनदार अजय सावईकर, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

बाजीराव पेशवे यांच्या शौर्यगाथेवर बोलताना शरद पोंक्षे पुढे म्हणाले, बाजीरावांवर लहानपणीच त्यांच्या आईने श्रीराम, श्रीकृष्ण व छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श बिंबवले. बाजीरावांनीसुद्धा या तीन महानायकांच्या जीवनाचा अभ्यास केला. जो त्यांना पुढे स्वराज्याची निर्मिती करताना कामी आला.

बाजीरावसुद्धा पंधरा वर्षे आणखी जगले असते तर आख्ख्या भारताचे हिंदवी स्वराज्य झाले असते. मोगलांकडे अफाट सैन्य होते; परंतु स्वतःकडे असलेल्या तुटपुंज्या सैनिकांच्या बळावर त्यांनी मोगलांना पळता भुई थोडी करून ठेवली होती. त्यांनी सैनिकांमध्ये विश्वास निर्माण केला होता.

कूटनीती राजकारण कसे करावे, हेसुद्धा त्यांच्याकडून शिकायला हवे. दिल्लीवर स्वारी करायची असेल तर या प्रवासादरम्यान येणाऱ्या प्रत्येक हिंदू राजांकडे समन्वय कसा साधावा, हे त्यांनी दाखवून दिले. म्हणूनच अवघे काही सैनिक व सामग्री घेऊन ते दिल्लीच्या तख्तापर्यंत जात होते व कामगिरी फत्ते करून येत होते, असेही पोंक्षे म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाSharad Ponksheशरद पोंक्षे