शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

..तर भारतात हिंदवी स्वराज्याची आधीच स्थापन झाली असती: शरद पोंक्षे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 09:43 IST

पराक्रमी योद्ध्याला प्रसिद्धीपासून खूप लांब ठेवून त्याच्यावर अन्याय केला गेला, अशी खंत प्रसिद्ध अभिनेते व व्याख्याते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा: जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर अन्याय- अत्याचार करणाऱ्या शासकांची ही क्रूर परंपरा चालूच राहिली असती. शिवाजी महाराजांनंतर मोगलांना तोडीस तोड आव्हान देण्याचे काम बाजीराव पेशवे यांनी केले. 

अटकेपार झेंडे लावण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या योद्ध्यांच्या पराक्रमाला जागतिक दर्जा मिळायला पाहिजे होता; परंतु संकुचित वृत्तीच्या लोकांनी त्यांचा पराक्रम बाजूला ठेवून त्यांच्या जीवनात आलेल्या मस्तानीला अधोरेखित केले. कौटुंबिक कलहामुळे ४१ लढाया सतत जिंकलेला या पराक्रमी योद्ध्याला प्रसिद्धीपासून खूप लांब ठेवून त्याच्यावर अन्याय केला गेला, अशी खंत प्रसिद्ध अभिनेते व व्याख्याते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली.

हिंदू संस्कृतीत 'न्यास' या संस्थेची फोंड्यात स्थापना झाली असून तिचा प्रारंभ शरद पोंक्षे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जयंत मिरींगकर, सचिव मनोज गावकर, खजिनदार अजय सावईकर, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

बाजीराव पेशवे यांच्या शौर्यगाथेवर बोलताना शरद पोंक्षे पुढे म्हणाले, बाजीरावांवर लहानपणीच त्यांच्या आईने श्रीराम, श्रीकृष्ण व छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श बिंबवले. बाजीरावांनीसुद्धा या तीन महानायकांच्या जीवनाचा अभ्यास केला. जो त्यांना पुढे स्वराज्याची निर्मिती करताना कामी आला.

बाजीरावसुद्धा पंधरा वर्षे आणखी जगले असते तर आख्ख्या भारताचे हिंदवी स्वराज्य झाले असते. मोगलांकडे अफाट सैन्य होते; परंतु स्वतःकडे असलेल्या तुटपुंज्या सैनिकांच्या बळावर त्यांनी मोगलांना पळता भुई थोडी करून ठेवली होती. त्यांनी सैनिकांमध्ये विश्वास निर्माण केला होता.

कूटनीती राजकारण कसे करावे, हेसुद्धा त्यांच्याकडून शिकायला हवे. दिल्लीवर स्वारी करायची असेल तर या प्रवासादरम्यान येणाऱ्या प्रत्येक हिंदू राजांकडे समन्वय कसा साधावा, हे त्यांनी दाखवून दिले. म्हणूनच अवघे काही सैनिक व सामग्री घेऊन ते दिल्लीच्या तख्तापर्यंत जात होते व कामगिरी फत्ते करून येत होते, असेही पोंक्षे म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाSharad Ponksheशरद पोंक्षे