शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाचा दिलासा

By admin | Updated: October 2, 2015 02:37 IST

पणजी : गुरुवारी अरबी समुद्रावरील हवामानात अचानक बदल झाल्यामुळे राजधानी पणजीसह राज्याच्या सर्वच भागांत जोरदार पाऊस पडला. त्यामुळे

पणजी : गुरुवारी अरबी समुद्रावरील हवामानात अचानक बदल झाल्यामुळे राजधानी पणजीसह राज्याच्या सर्वच भागांत जोरदार पाऊस पडला. त्यामुळे उष्म्याच्या प्रकोपाला कंटाळलेल्या गोमंतकीयांना दिलासा मिळाला. हा पाऊस आणखी चार दिवस बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याचा धोका असल्याने बळीराजा मात्र धास्तावला आहे. गोव्यातील किनारपट्टी भागात अधिक पाऊस पडला. दुपारी उष्मा वाढल्यामुळे सायंकाळी पाऊस पडणार, असा तर्कही केला जात होता. दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळू लागल्या. विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह हा पाऊस पडला. पणजी व राज्यात इतर ठिकाणी त्यामुळे वीजही खंडित झाली. अचानक पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडीही झाली होती. पर्वरीत ओ कोकेरो सर्कलजवळ, म्हापसा येथे वृंदावन इस्पितळाजवळील बायपास रस्त्यावर तसेच पणजीत दिवजा सर्कलजवळ बराच वेळ वाहतूक ठप्प झाली. भरदिवसा अंधारल्यामुळे वाहनधारकांना वाहनांच्या हेडलाईट्स चालू ठेवाव्या लागल्या. मोसमी पाऊस ३० सप्टेंबरला संपत असतो. त्यामुळे गुरुवारी पडलेला पाऊस हा पावसाळ्यानंतरचा पाऊस ठरला आहे. हा पाऊस चार दिवस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. खात्याचे शास्त्रज्ञ एन. हरिदासन यांनी याविषयी सांगितले की, वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रकारामुळे हा पाऊस पडला आहे. अरबी समुद्रपट्ट्यात उंच भागातील हवामानात वाढ झाल्यामुळे कॉन्व्हेक्शनल स्वरूपाचा पाऊस पडला. वातावरण बदलण्यासाठी किमान चार दिवस लागतील आणि तोपर्यंत पावसाच्या हलक्या सरी विशेषकरून किनारी भागात कोसळतील. (प्रतिनिधी)