शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

मुसळधार पावसाचा दिलासा

By admin | Updated: October 2, 2015 02:37 IST

पणजी : गुरुवारी अरबी समुद्रावरील हवामानात अचानक बदल झाल्यामुळे राजधानी पणजीसह राज्याच्या सर्वच भागांत जोरदार पाऊस पडला. त्यामुळे

पणजी : गुरुवारी अरबी समुद्रावरील हवामानात अचानक बदल झाल्यामुळे राजधानी पणजीसह राज्याच्या सर्वच भागांत जोरदार पाऊस पडला. त्यामुळे उष्म्याच्या प्रकोपाला कंटाळलेल्या गोमंतकीयांना दिलासा मिळाला. हा पाऊस आणखी चार दिवस बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याचा धोका असल्याने बळीराजा मात्र धास्तावला आहे. गोव्यातील किनारपट्टी भागात अधिक पाऊस पडला. दुपारी उष्मा वाढल्यामुळे सायंकाळी पाऊस पडणार, असा तर्कही केला जात होता. दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळू लागल्या. विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह हा पाऊस पडला. पणजी व राज्यात इतर ठिकाणी त्यामुळे वीजही खंडित झाली. अचानक पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडीही झाली होती. पर्वरीत ओ कोकेरो सर्कलजवळ, म्हापसा येथे वृंदावन इस्पितळाजवळील बायपास रस्त्यावर तसेच पणजीत दिवजा सर्कलजवळ बराच वेळ वाहतूक ठप्प झाली. भरदिवसा अंधारल्यामुळे वाहनधारकांना वाहनांच्या हेडलाईट्स चालू ठेवाव्या लागल्या. मोसमी पाऊस ३० सप्टेंबरला संपत असतो. त्यामुळे गुरुवारी पडलेला पाऊस हा पावसाळ्यानंतरचा पाऊस ठरला आहे. हा पाऊस चार दिवस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. खात्याचे शास्त्रज्ञ एन. हरिदासन यांनी याविषयी सांगितले की, वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रकारामुळे हा पाऊस पडला आहे. अरबी समुद्रपट्ट्यात उंच भागातील हवामानात वाढ झाल्यामुळे कॉन्व्हेक्शनल स्वरूपाचा पाऊस पडला. वातावरण बदलण्यासाठी किमान चार दिवस लागतील आणि तोपर्यंत पावसाच्या हलक्या सरी विशेषकरून किनारी भागात कोसळतील. (प्रतिनिधी)