शहरं
Join us  
Trending Stories
1
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
2
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
3
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
4
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
5
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
6
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
7
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
8
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
9
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
10
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
11
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
12
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
13
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
14
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
15
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
16
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
17
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
18
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
19
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
20
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा

राज्यात उष्णतेची लाट? सोमवारपासून तापमान ३५ अंश सेल्सियसवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2024 15:10 IST

यंदा मार्च महिन्यापासून उष्णतेचा पारा ३३ ते ३४ अंश पर्यंत गेला होता.

नारायण गावस, पणजी: राज्यात उष्णतेचा पारा वाढला असल्याने या उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत. उद्या साेमवार १५ एप्रिलपासून उष्णतेचा पारा ३५ अंश सेल्सियसवर जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे आता नागरिकांनाही या उष्णतेपासू्न  बचाव करण्यासाठी सतर्क राहण्याची गरज आहे.

यंदा मार्च महिन्यापासून उष्णतेचा पारा ३३ ते ३४ अंश पर्यंत गेला होता. गेले आठ दिवस उष्णतेत वाढ झालेली आहे. आता यंदाचा एप्रिल महिना हा उष्णतेची लाट घेऊन येणार असल्याचे अगोदरच हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. यासाठी आरोग्य खात्याने तसेच हवामान खात्याने नागरिकांना उष्णतेपासून काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन तत्वे  जारी केली आहेत. या उष्णतेच्या लाटेची  उद्यापासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने उद्या सोमवारपासून तापमान ३५ अंश सेल्सियसवर जाण्याची शक्यता वर्तविली आहे.

शनिवारी दक्षिण गोव्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. पण नंतर कर्नाटकच्या बाजूने सरकल्यानेे आता पावसाचा शक्यता नाही. त्यामुळे आता उष्णतेचा पारा आणखी वाढणार आहे. लोक या उष्णेतच्या बचावासाठी पावसाची वाट पाहत आहेत. गेल्या वर्षीही मधोमध अवकाळी पावसाच्या सरी पडत होत्या. पण यंदा नोव्हेबरपासून पाऊस गेल्यावर अजून तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे उष्णतेत वाढ होत आहे. 

या आठवड्यात काही प्रमाणात उष्णतेत वाढ होण्याची शक्यता आहे. काल राज्यात कमाल तापमान ३४ अंशाच्या आसपास होते.  ते आता उद्यापासून काही प्रमाणात वाढून ३५ अंश पर्यंत जाण्याची शक्यता असल्याने लोकांनी या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काळजी घ्यावी. सध्या तरी राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता नाही पण तापमानात वाढ होणार असे  गोवा वेधशाळेचे संचालक नहूष कुलकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाHeat Strokeउष्माघात