शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
7
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
8
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
11
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
12
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
13
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
14
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
15
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
16
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
17
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
18
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
19
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
20
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात उष्णतेची लाट? सोमवारपासून तापमान ३५ अंश सेल्सियसवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2024 15:10 IST

यंदा मार्च महिन्यापासून उष्णतेचा पारा ३३ ते ३४ अंश पर्यंत गेला होता.

नारायण गावस, पणजी: राज्यात उष्णतेचा पारा वाढला असल्याने या उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत. उद्या साेमवार १५ एप्रिलपासून उष्णतेचा पारा ३५ अंश सेल्सियसवर जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे आता नागरिकांनाही या उष्णतेपासू्न  बचाव करण्यासाठी सतर्क राहण्याची गरज आहे.

यंदा मार्च महिन्यापासून उष्णतेचा पारा ३३ ते ३४ अंश पर्यंत गेला होता. गेले आठ दिवस उष्णतेत वाढ झालेली आहे. आता यंदाचा एप्रिल महिना हा उष्णतेची लाट घेऊन येणार असल्याचे अगोदरच हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. यासाठी आरोग्य खात्याने तसेच हवामान खात्याने नागरिकांना उष्णतेपासून काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन तत्वे  जारी केली आहेत. या उष्णतेच्या लाटेची  उद्यापासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने उद्या सोमवारपासून तापमान ३५ अंश सेल्सियसवर जाण्याची शक्यता वर्तविली आहे.

शनिवारी दक्षिण गोव्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. पण नंतर कर्नाटकच्या बाजूने सरकल्यानेे आता पावसाचा शक्यता नाही. त्यामुळे आता उष्णतेचा पारा आणखी वाढणार आहे. लोक या उष्णेतच्या बचावासाठी पावसाची वाट पाहत आहेत. गेल्या वर्षीही मधोमध अवकाळी पावसाच्या सरी पडत होत्या. पण यंदा नोव्हेबरपासून पाऊस गेल्यावर अजून तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे उष्णतेत वाढ होत आहे. 

या आठवड्यात काही प्रमाणात उष्णतेत वाढ होण्याची शक्यता आहे. काल राज्यात कमाल तापमान ३४ अंशाच्या आसपास होते.  ते आता उद्यापासून काही प्रमाणात वाढून ३५ अंश पर्यंत जाण्याची शक्यता असल्याने लोकांनी या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काळजी घ्यावी. सध्या तरी राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता नाही पण तापमानात वाढ होणार असे  गोवा वेधशाळेचे संचालक नहूष कुलकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाHeat Strokeउष्माघात