शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

गोव्याच्या खाणप्रश्नी मंत्र्यांचा गट गंभीरपणे विचार करतोय - निर्मला सीतारामन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 12:52 IST

गोव्यातील खनिज खाण व्यवसायाविषयी केंद्रातील मंत्र्यांचा गट गंभीरपणे विचार करतोय एवढेच उत्तर केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहे.

ठळक मुद्दे गोव्यातील खनिज खाण व्यवसायाविषयी केंद्रातील मंत्र्यांचा गट गंभीरपणे विचार करतोय एवढेच उत्तर केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहे.वस्तू आणि सेवा करविषयक (जीएसटी) मंडळाची राष्ट्रीय बैठक गोव्यात सुरू आहे.देशी कंपन्यांसाठी कॉर्पोरेट कराचे प्रमाण 22 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आल्याचे सीतारामन यांनी जाहीर केले.

सदगुरू पाटील

पणजी - गोव्यातील खनिज खाण व्यवसायाविषयी केंद्रातील मंत्र्यांचा गट गंभीरपणे विचार करतोय एवढेच उत्तर केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहे. शुक्रवारी (20 सप्टेंबर) गोवा येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला अनुसरून उत्तर दिले आहे. वस्तू आणि सेवा करविषयक (जीएसटी) मंडळाची राष्ट्रीय बैठक गोव्यात सुरू आहे. त्या बैठकीचे अध्यक्षस्थान भुषविण्यासाठी सीतारामन येथे दाखल झाल्या आहेत.

बैठकीला जाण्यापूर्वी सीतारामन यांनी पणजीतील कदंब पठारावरील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली. देशात गुंतवणूक वाढावी आणि विदेशी गुंतवणुकीचेही प्रमाण वाढावे या हेतूने केंद्र सरकारने कोणते नवे प्रस्ताव आणले आहेत व मेक इन इंडियाच्या दृष्टीकोनातून कोणते नवे निर्णय घेतले आहेत याविषयी सीतारामन यांनी माहिती दिली. केंद्रीय महसुल सचिव अजय पांडे हेही यावेळी उपस्थित होते.

देशी कंपन्यांसाठी कॉर्पोरेट कराचे प्रमाण 22 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आल्याचे निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले आहे. तसेच नव्या देशी उत्पादन कंपन्यांसाठी कराचे हे प्रमाण 15 टक्क्यांपर्यंत निश्चित केल्याचे व अन्य अनेक आर्थिक सवलतींची दारे खुली केल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट केले. आर्थिक वाढ आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळण्याचे हेतू यामुळे साध्य होतील. ज्या देशी कंपन्या अन्य कोणत्याच सवलती प्राप्त करणार नाहीत, त्यांना 22 टक्के दराने प्राप्ती कर भरण्याची मुभा असेल. यासाठी प्राप्ती कर कायद्यात नव्या तरतुदीचा समावेश करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

निर्मला सीतारामन यांना यावेळी पत्रकारांनी गोव्यातील अर्थव्यवस्थाही डळमळीत झाल्याचे व खाण बंदीचा फटका बसल्याचे सांगत खनिज खाण धंदा कधी सुरू होईल असे विचारले असता, त्या म्हणाल्या की गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनीही हा विषय केंद्र सरकारसमोर मांडला आहे. केंद्राने मंत्र्यांचा जो गट स्थापन केला आहे, त्या गटाने गोव्याच्या खाणी सुरू करण्याच्या विषयात खूप रस घेतलेला आहे. मंत्र्यांचा गट एकूण विषयाबाबत गंभीरपणे विचार करत आहे.

गोवा येथे होत असलेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उद्योग जगताला मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे. कंपन्या आणि व्यावसायिकांना दिलासा देताना कॉर्पोरेट टॅक्स घटवण्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. कॉर्पोरेट टॅक्स घटवण्यासाठीचा अध्यादेश पारित झालेला आहे, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी यावेळी दिली. अर्थमंत्र्यांकडून करण्यात आलेल्या या घोषणेमुळे गेल्या काही दिवसांपासून मंदीचा सामना करत असलेल्या उद्योग जगताला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वित्तमंत्र्यांनी केलेल्या घोषणेचे सकारात्मक पडसाद तात्काळ शेअर बाजारामध्ये उमटले असून, मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील सूचकांक सेंसेक्स मोठ्या प्रमाणात वधारला आहे. 

 

टॅग्स :Nirmal Singhनिर्मल सिंहgoaगोवाEconomyअर्थव्यवस्था