शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
4
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
5
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
6
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
7
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
8
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
9
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
10
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
11
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
12
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
13
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
14
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
15
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
16
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
17
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
18
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
19
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
20
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालयाच्या निवाड्याचा सरकारने आदर ठेवावा: काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 08:50 IST

म्हादई वाचविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा दावा सरकार करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : म्हादई अभयारण्य परिसर हे व्याघ्र संरक्षित क्षेत्र जाहीर करण्याच्या विषयावरून सत्तरीचे आमदार लोकांची दिशाभूल करून भीतीचे वातावरण निर्माण करीत आहेत. उच्च न्यायालयाने व्याघ्र संरक्षित क्षेत्राबाबत दिलेल्या निवाड्याचा सरकारने आदर ठेवावा असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

व्याघ्र संरक्षित क्षेत्र झाले तर १० ते १५ हजार लोकांवर परिणाम होणार, अशी चुकीची माहिती देऊन तेथील आमदार लोकांमध्ये भीती निर्माण करीत आहेत. दुसरीकडे वन मंत्री हे उच्च न्यायालयाच्या निवाड्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे विधान करीत आहेत. हे योग्य नाही, असेही पाटकर यांनी स्पष्ट केले.

पाटकर म्हणाले, म्हादई वाचविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा दावा सरकार करीत आहे. खरेतर हा परिसर व्याघ्र संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर करणे फायदेशीर आहे. मात्र, उच्च न्यायालयाचा निवाडा सरकार डावलू पाहत आहे. सरकार जर म्हादई नदी वाचविण्याबाबत खरोखरच गंभीर असेल तर त्यांनी म्हादई अभयारण्य परिसर हा व्याघ्र संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर करणे गरजेचे आहे. मात्र, याउलट सत्तरीचे आमदार तथा वनमंत्री लोकांमध्ये या निवाड्यावरून भीतीचे वातावरण पसरवत आहेत. या भागात राहणाऱ्या अनुसूचित जमातीच्या लोकांच्या जमिनींचे हक्क, त्यांची शेती राखून हे व्याघ्र संरक्षित क्षेत्र अधिसूचित करणे शक्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे नेते अॅड. श्रीनिवास खलप, अमरनाथ पणजीकर उपस्थित होते.

टीका चुकीची 

लोकप्रतिनिधी हे लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी असतात. मात्र, व्याघ्र संरक्षित क्षेत्रावरून जनतेची दिशाभूल सुरू आहे. गोवा फाउंडेशनवरही मंत्र्यांनी टीका केली. तशी टीका चुकीची आहे असे पाटकर म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाHigh Courtउच्च न्यायालय