शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

गोविंद गावडे यांचे मंत्रिपद मुख्यमंत्र्यांमुळेच सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2024 07:50 IST

गावडे यांनी प्रेरणा दिन कार्यक्रमात आदिवासी कल्याण खात्यावर कडक भाष्य केले.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : मंत्री गोविंद गावडे यांनी अलिकडे आक्रमक भूमिका घेतली आहे. एसटी समाज बांधवांच्या मनातील नाराजी ते व्यक्त करून दाखवू लागलेत, हे भाजपच्या काही नेत्यांना आवडत नाही, त्यामुळे भाजपच्या आतील वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. गोविंद गावडे यांचे मंत्रीपद हे आतापर्यंत फक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यामुळेच सुरक्षित राहिले आहे, अशी चर्चा भाजप कोअर टीमच्या काही सदस्यांमध्येही सुरू झाली आहे.

गावडे यांनी प्रेरणा दिन कार्यक्रमात आदिवासी कल्याण खात्यावर कडक भाष्य केले. अधिकाऱ्यांचा समाचार घेतला. हे खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे. गावडे हे मंत्रिमंडळात असल्याने तेच स्वतः सरकार आहेत. मात्र, एसटी बांधवांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर एसटींना पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा देऊन गावडे मोकळे झाले. गावडे यांनी मुख्यमंत्र्यांवर कुठेच टीका केलेली नाही. पण भाजपच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गावडे यांच्या भूमिकेची दखल घेतलेली आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळात काही बदल करायचा विषय दिल्लीहून आला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी सध्या कोणताच बदल नको, असे भाजपच्या केंद्रीय नेत्यांना कळवले होते. नीलेश काब्राल यांना एकट्यालाच काढून आलेक्स सिक्वेरा यांना घेतले तेवढे पुरे असे मुख्यमंत्र्‍यांनी हायकमांडला कळवले होते. त्यावेळीच गावडे यांचे मंत्रीपद गेले असते व रमेश तवडकर यांना मंत्रीपद मिळाले असते. मुख्यमंत्र्यांशी यापूर्वी गावडे यांचे कायम चांगले संबंध राहिले. सावंत यांच्यामुळेच गावडे यांचे मंत्रीपद आतापर्यंत तरी सुरक्षित राहिले आहे. यापुढे काय होईल कोण जाणे अशी चर्चा भाजपच्या अत्यंत जबाबदार अशा पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणPramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपा