शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

राज्यपालांनी घोडेबाजाराला वाव दिला; काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 20:24 IST

पत्रकार परिषदेत काँग्रेसचे कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख ट्रोजन डिमेलो यांनी पत्रकार परिषदेत न्यायालयात जाण्याबाबत कायदेशीर सल्ला आम्ही घेत आहोत, असे सांगितले.

पणजी : राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी घोडेबाजाराला वाव दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. घटक पक्षांनी पर्रीकर यांच्या नेतृत्त्वाखालील आघाडी सरकारलाच पाठिंबा दिला होता मग नवा मुख्यमंत्री कसा स्वीकारला, असा प्रश्नही पक्षाने केला आहे. जनहितासाठी नव्हे तर लूट करण्यासाठी भाजप आणि घटकपक्ष एकत्र आल्याचा आरोप करण्यात आला आहे तसेच राज्यपालांनी काँग्रेस हा विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष असूनही सत्तास्थापनेसाठी न बोलावल्याने कोर्टात जाण्याचा पर्यायही खुला असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. 

पत्रकार परिषदेत काँग्रेसचे कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख ट्रोजन डिमेलो यांनी पत्रकार परिषदेत न्यायालयात जाण्याबाबत कायदेशीर सल्ला आम्ही घेत आहोत, असे सांगितले. ते म्हणाले की, १४ आमदारांसह काँग्रेस विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष आहे त्यामुळे या पक्षाला सरकार स्थापण्यासाठी निमंत्रित करणे आवश्यक होते परंतु राज्यपालांनी ते केले नाही. उलट भाजपला घोडेबाजाराला वाव दिला. पर्रीकर यांच्या निधनानंतर तब्बल ३0 तास राज्यात सरकारच नव्हते. बोलणी फिस्कटत होती त्यामुळे शपथविधीची वेळ वारंवार बदलण्यात आली. राज्यपालांनी त्यांची घटनात्मक जबाबदारी योग्यरित्या बजावली नाही. त्या ‘सुपर प्रेसिडेंट’ प्रमाणे वागल्याचा आरोप डिमेलो यांनी केला. 

हे सरकार लोकसभा निवडणुकीपर्यंतच सत्तेवर राहील, नंतर बरखास्त होईल, असे भाकितही त्यांनी वर्तविले. अजून खातेवांटप करण्यात आलेले नाही कारण खातेवाटपांनंतर मंत्र्यांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळेच नवे मुख्यमंत्री अगोदर विधानसभेत बहुमत सिध्द करण्यासाठी धडपडत आहेत, असेही डिमेलो म्हणाले. 

ते पुढे म्हणाले की, ‘सरकार बनविण्यासाठी भाजपने घटक पक्षांची कितीही मदत घेतली असली तरी पर्रीकर यांनी कधीही या घटक पक्षांच्या  किंवा खुद्द भाजप मंत्र्यांवर विश्वास दाखवला नाही, त्यामुळेच त्यांनी आजारी असताना सहीचे अधिकार विशेष सचिवांना दिले.’ 

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकरcongressकाँग्रेस