शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांनी घोडेबाजाराला वाव दिला; काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 20:24 IST

पत्रकार परिषदेत काँग्रेसचे कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख ट्रोजन डिमेलो यांनी पत्रकार परिषदेत न्यायालयात जाण्याबाबत कायदेशीर सल्ला आम्ही घेत आहोत, असे सांगितले.

पणजी : राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी घोडेबाजाराला वाव दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. घटक पक्षांनी पर्रीकर यांच्या नेतृत्त्वाखालील आघाडी सरकारलाच पाठिंबा दिला होता मग नवा मुख्यमंत्री कसा स्वीकारला, असा प्रश्नही पक्षाने केला आहे. जनहितासाठी नव्हे तर लूट करण्यासाठी भाजप आणि घटकपक्ष एकत्र आल्याचा आरोप करण्यात आला आहे तसेच राज्यपालांनी काँग्रेस हा विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष असूनही सत्तास्थापनेसाठी न बोलावल्याने कोर्टात जाण्याचा पर्यायही खुला असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. 

पत्रकार परिषदेत काँग्रेसचे कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख ट्रोजन डिमेलो यांनी पत्रकार परिषदेत न्यायालयात जाण्याबाबत कायदेशीर सल्ला आम्ही घेत आहोत, असे सांगितले. ते म्हणाले की, १४ आमदारांसह काँग्रेस विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष आहे त्यामुळे या पक्षाला सरकार स्थापण्यासाठी निमंत्रित करणे आवश्यक होते परंतु राज्यपालांनी ते केले नाही. उलट भाजपला घोडेबाजाराला वाव दिला. पर्रीकर यांच्या निधनानंतर तब्बल ३0 तास राज्यात सरकारच नव्हते. बोलणी फिस्कटत होती त्यामुळे शपथविधीची वेळ वारंवार बदलण्यात आली. राज्यपालांनी त्यांची घटनात्मक जबाबदारी योग्यरित्या बजावली नाही. त्या ‘सुपर प्रेसिडेंट’ प्रमाणे वागल्याचा आरोप डिमेलो यांनी केला. 

हे सरकार लोकसभा निवडणुकीपर्यंतच सत्तेवर राहील, नंतर बरखास्त होईल, असे भाकितही त्यांनी वर्तविले. अजून खातेवांटप करण्यात आलेले नाही कारण खातेवाटपांनंतर मंत्र्यांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळेच नवे मुख्यमंत्री अगोदर विधानसभेत बहुमत सिध्द करण्यासाठी धडपडत आहेत, असेही डिमेलो म्हणाले. 

ते पुढे म्हणाले की, ‘सरकार बनविण्यासाठी भाजपने घटक पक्षांची कितीही मदत घेतली असली तरी पर्रीकर यांनी कधीही या घटक पक्षांच्या  किंवा खुद्द भाजप मंत्र्यांवर विश्वास दाखवला नाही, त्यामुळेच त्यांनी आजारी असताना सहीचे अधिकार विशेष सचिवांना दिले.’ 

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकरcongressकाँग्रेस