शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

गोव्यात शिक्षण क्षेत्रातही सरकारची ‘घुसखोरी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 15:01 IST

गोव्यात सहकार क्षेत्राबरोबरच शिक्षण क्षेत्रातील राजकीय हस्तक्षेपही सरकारच्या अंगलट येऊ लागला आहे. पर्वरी येथील विद्या प्रबोधिनी विद्यालयातील आठ शिक्षकांच्या जागा भरण्यास शिक्षण खात्याला अखेर मोठ्या नामुष्कीने परवानगी द्यावी लागली.

पणजी : गोव्यात सहकार क्षेत्राबरोबरच शिक्षण क्षेत्रातील राजकीय हस्तक्षेपही सरकारच्या अंगलट येऊ लागला आहे. पर्वरी येथील विद्या प्रबोधिनी विद्यालयातील आठ शिक्षकांच्या जागा भरण्यास शिक्षण खात्याला अखेर मोठ्या नामुष्कीने परवानगी द्यावी लागली. दुसरीकडे माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांच्या मांद्रे येथील कॉलेजला अनुदानाच्या प्रश्नावर मात्र सरकार अजून अडून बसले आहे. या प्रश्नावर कॉलेज व्यवस्थापनाने नव्याने कोर्टात जाण्याची तयारी चालवली आहे. 

‘विद्या प्रबोधिनी’तील आठ शिक्षकांचा पगार गेले वर्षभर सरकारने रोखून धरला होता तसेच त्यांच्या नियुक्तीला परवानगी नाकारली होती. हे प्रकरण मानवी हक्क आयोगापर्यंत पोहोचले होते तसेच येत्या ३0 तारीखपर्यंत जर न्याय मिळाला नाही तर हायकोर्टात याचिका सादर करण्याची तयारीही व्यवस्थापनाने ठेवली होती. या शिक्षकांच्या शिक्षण खात्याच्या अधिका-यांच्या उपस्थितच मुलाखती झाल्या होत्या आणि व्यवस्थापनाने त्यांना सेवेत घेतले होते. परंतु सरकारने त्यांच्या भरतीस परवानगी नाकारली आणि त्यांचे वेतनही रोखले. विद्या प्रबोधिनी विद्यालयाच्या व्यवस्थापनाने सरकारच्या आडमुठेपणाविरुद्ध दिलेला लढा व प्रसंगी न्यायालयातही जाण्याची ठेवलेली तयारी यामुळे सरकारला नमते घ्यावे लागले.

सरकार सूडबुद्धीनं वागले : वेलिंगकर 

शिक्षण क्षेत्रातील राजकीय घुसखोरीबाबत संताप व्यक्त करताना विद्या प्रबोधिनी संस्थेचे प्रमुख सुभाष वेलिंगकर म्हणाले की, ‘गोवा मुक्तीपासून शैक्षणिक संस्थेशी इतक्या राजकीय सूडबुद्धीनं कुठलाही शिक्षणमंत्री वागला नाही. माझ्या विद्यालयात प्राथमिक स्तरापासून उच्च माध्यमिकपर्यंत नऊ जागा भरायच्या होत्या त्यासाठी आम्ही प्रस्ताव पाठवला परंतु शिक्षण खात्याने आठ महिने उत्तरच दिले नाही. त्यानंतर प्रस्ताव नामंजूर करताना जी कारणे दिली ती योग्य नव्हती. आम्ही मानवी हक्क आयोगाकडे पुरावे सादर केले. आतापर्यंत ज्या ज्यावेळी मंजुरी दिली त्या त्यावेळची माहिती दिली. मुख्यमंत्री, शिक्षण संचालकांना निवेदने दिली. एक शिक्षक हरमल पंचक्रोशी स्कूलमधून स्थलांतरित होऊन आला त्याला परवानगी दिली परंतु आठ शिक्षकांच्या बाबतीत अडवणूक करण्यात आली. त्यांचे वेतन गेले वर्षभर बंद केले. सूड उगवयाचा तर तो शिक्षकांवर का? असा सवाल करुन वेलिंगकर पुढे म्हणाले की, ‘सरकारची ही राजकीय घुसखोरी निंदनीय आहे. या वृत्तीविरुद्ध आम्ही संघटित लढा दिला. आम्ही हायकोर्टात गेलो असतो तर सरकारचा फज्जा उडाला असता. या प्रश्नावर सरकार कात्रीत सापडले होते. त्यामुळे न्याय द्यावाच लागला.’

ही शिक्षण क्षेत्राची गळचेपीच : खलप 

विकास परिषद मांद्रे कॉलेज व्यवस्थापनचे प्रमुख रमाकांत खलप यांनी शैक्षणिक क्षेत्रातील सरकारच्या हस्तक्षेपाचा कडक शब्दात निषेध केला. सरकारने शिक्षणाचा खेळखंडोबा मांडला आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. खलप म्हणाले की, ‘ बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे. हे सरकार विद्यार्थ्यांच्या भवितव्याकडे खेळत आहे. एकीकडे बेकारी वाढतेय, तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. असे असताना सरकार शिक्षण क्षेत्राची गळचेपी करीत आहे. 

मांद्रे येथील कॉलेजला परवानगी नाकारता सरकारने या कॉलेजचे अनुदानही बंद केले. गेली ७ वर्षे व्यवस्थापनाने स्वबळावर हे कॉलेज चालवले तसेच यापुढेही चालवावे, अनुदान देणार नाही अशी भूमिका सरकारने घेतली आहे. खलप म्हणाले की, ‘मांद्रेत तीन तसेच शिवोलीत १ हायरसेकंडरी आहे. या विद्यार्थ्यांसाठी मांद्रे भागात वाणिज्य शाखेची बी. कॉम पदवी देणारे कॉलेज आवश्यक आहे. परंतु सरकारने म्हापशात तीन कॉमर्स कॉलेज असल्याने मांद्रेत नव्या कॉलेजची गरज नाही, असा पवित्रा घेतला. 

मांद्रे कॉलेजला परवानगी नाकारताना पर्वरी, बोरी आणि धारबांदोडा येथे तीन कॉलेजना मात्र सरकारने परवानगी दिली. हा पक्षपात का?, असा सवाल खलप यांनी केला असून या प्रश्नावर सरकारविरोधात लवकरच हायकोर्टात याचिका सादर करणार असल्याचे सांगितले. शिक्षण क्षेत्रातील सरकारच्या अशा प्रकारे चाललेल्या हस्तक्षेपाबद्दल राज्यात विविध थरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणgoaगोवा