शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

सरकार भक्कम, सभापती बदलू; जुलैमध्ये अधिवेशन - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 19:50 IST

भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर व सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली.

पणजी : आपल्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर आणि भक्कम आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी येथे सांगितले. विधानसभेचे अधिवेशन येत्या जुलै महिन्यात घेतले जाईल. नव्या सभापतींचीही निवड करण्याचा विचार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर व सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. भाजपने विधानसभेच्या चारपैकी तीन जागा जिंकल्या. आम्हाला यासाठी मंत्री गोविंद गावडे यांनी विशेष मदत केली. त्यांना आम्ही धन्यवाद देतो. शिवाय भाजपप्रणीत आघाडीचे अन्य घटक व आमचे अन्य सहकारीही भाजपसाठी वावरले. सर्वाचाच हातभार लागला, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आता मंत्र्यांना अतिरिक्त खाती देणार काय असे पत्रकारांनी विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की थोडा वेळ लागेल. विधानसभा अधिवेशन दि. 31 जुलैर्पयत आम्हाला घ्यावे लागेल. आघाडीच्या घटक पक्षांशी बोलून तारीख नंतर ठरवू पण जुलैमध्ये अधिवेशन होईल. भाजपच्या यशानंतर घटक पक्षाच्या सर्व मंत्री, आमदारांनी, अपक्षांनी आपल्याला फोन केला व आपले अभिनंदन केले. 

पणजी मतदारसंघात भाजपचा पराभव झाल्याने उत्पल र्पीकर यांनी आता पणजीत भाजपच्या कामात जास्त सहभागी व्हावे असे वाटते काय असे पत्रकारांनी विचारले असता, तेंडुलकर म्हणाले की तो निर्णय उत्पलनेच घ्यावा. पक्षाला जी भूमिका घ्यायची असेल ती भूमिका पक्षाकडून चर्चेअंती घेतली जाईल.

तो निर्णय सुदिनवरच दरम्यान, मगो पक्षाने अजून सरकारचा पाठींबा मागे घेणारे पत्र राज्यपालांना दिलेले नाही, त्याविषयी काय वाटते असे पत्रकारांनी विचारताच मुख्यमंत्री म्हणाले की त्याविषयीचा काय तो निर्णय सुदिन ढवळीकर यांनीच घ्यावा. ज्याने पाठींबा दिला होता, तोच पाठींबा मागे घ्यावा की घेऊ नये हे ठरवू शकतो. मगोपचा पाठींबा आमच्या सरकारला फक्त कागदावरच आहे. 

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा