शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

सरकार असंवेदनशील, आश्वासनांना चुना; विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 13:20 IST

'पूरग्रस्तांसाठी सरकारने 48 तासात तातडीची मदत आर्थिक मदत देऊन दिलासा द्यायला हवा'

पणजी : सरकारने विधानसभेत दिलेली कोणतीही आश्वासने पाळली नाहीत, असा आरोप करीत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी हल्लाबोल केला. चतुर्थीपूर्वी रस्त्यांवरील खड्ड्यांची डागडुजी करण्याचे तसेच वीज खात्याने प्रत्येक उपविभागाला ४०० वीज उपकरणे देण्याची ग्वाही दिली होती. परंतु ही आश्वासने वेशीवर टांगली गेली आहेत. चतुर्थीत लोकांनी अंधारात राहावे का, असा सवाल कामत यांनी केला.पत्रकार परिषदेत प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या उपस्थितीत बोलताना कामत म्हणाले की, गणेश चतुर्थी तोंडावर आली आहे आणि भाज्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. पुढील पंधरा दिवसात तरी सरकारने फलोत्पादन महामंडळाला अनुदान आणखी वाढवून देऊन लोकांना स्वस्त दरात भाज्या उपलब्ध कराव्यात. खांडेपार येथे अलीकडे जलवाहिन्या कुठून फोंडा आणि तिसवाडी या तालुक्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागले, याची गंभीर दखल काँग्रेसने घेतली असून राज्यातील पूल, साकव तसेच जलवाहिन्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे अशी मागणी केली आहे.

ते म्हणाले की, कुठली जलवाहिनी कुठून कुठे जाते, कुठे पाणी पुरवले जाते याचे कोणतेही नकाशे सरकारकडे उपलब्ध नाहीत ते आधी तयार केले जावेत. आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास पणजी सारख्या राजधानी शहरासाठी जलाशय नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या सरकारला कोणतेही सामाजिक भान राहिले नाही, असा आरोप करताना कामत म्हणाले की जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी आठ ते दहा दिवस लागावी ही अत्यंत खेदजनक बाब आहे.

विरोधी पक्ष म्हणून आम्ही समाजाची निगडी निगडीत प्रश्न विधानसभेत उपस्थित केले होते त्याची उत्तरे त्यावेळी मंत्री देत असतात आणि वेळ मारून देत असतात परंतु ही आश्वासने पाळली जात नाहीत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले आहेत. एलईडी दिवे दिलेले नाहीत, त्यामुळे अंधारात रहावे लागेल चतुर्थी काळात लोकांनी या समस्यांना सामोरे जावे काय, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

काँग्रेस सरकार सत्तेवर असताना गावाात पिकप, ट्रकमधून स्वस्त दरात भाज्या पुरविल्या जात असत. या मोहिमेचे काय झाले किती पिकप गावागावात जातात, असा सवाल त्यांनी केला राज्यात भाज्यांचे दर आणि कडधान्याचे दर गगनाला भिडले आहेत याची जंत्रीच देऊन ते म्हणाले की, मडगावच्या बाजारात आज तूर डाळ 110 रुपये किलो, चणाडाळ 110 रुपये, उडीद डाळ 90 रुपये किलो, चणे 80 रुपये किलो तर भाज्यांमध्ये ढब्बू मिरची, भेंडी प्रत्येकी 80 रुपये किलो, गाजर 100 रुपये किलो असे दर आहेत हे दर पुढील पंधरा दिवसात आणखी वाढणार आहेत चतुर्थी काळात लोकांना दिलासा देण्याकरिता सरकारने काही उपाययोजना केल्या आहेत का, असा सवाल कामत यांनी केला. लोकांना भाज्या-फळे गत सालच्या दरानुसार मिळायला हवीत .यासाठी सरकारने अनुदान वाढवावे, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, राज्यात डेंग्युची प्रकरणे वाढली आहेत त्याबद्दल चिंता व्यक्त करताना कामत म्हणाले की, गोमेकॉ इस्पितळात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली आहे. डेंग्यूचा प्रसार होऊ नये यासाठी सरकारने युद्धपातळीवर उपाययोजना करायला हव्यात. पूरग्रस्तांसाठी सरकारने 48 तासात तातडीची मदत आर्थिक मदत देऊन दिलासा द्यायला हवा अशी मागणीही कामत यांनी यावेळी केली. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस