शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

सरकार असंवेदनशील, आश्वासनांना चुना; विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 13:20 IST

'पूरग्रस्तांसाठी सरकारने 48 तासात तातडीची मदत आर्थिक मदत देऊन दिलासा द्यायला हवा'

पणजी : सरकारने विधानसभेत दिलेली कोणतीही आश्वासने पाळली नाहीत, असा आरोप करीत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी हल्लाबोल केला. चतुर्थीपूर्वी रस्त्यांवरील खड्ड्यांची डागडुजी करण्याचे तसेच वीज खात्याने प्रत्येक उपविभागाला ४०० वीज उपकरणे देण्याची ग्वाही दिली होती. परंतु ही आश्वासने वेशीवर टांगली गेली आहेत. चतुर्थीत लोकांनी अंधारात राहावे का, असा सवाल कामत यांनी केला.पत्रकार परिषदेत प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या उपस्थितीत बोलताना कामत म्हणाले की, गणेश चतुर्थी तोंडावर आली आहे आणि भाज्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. पुढील पंधरा दिवसात तरी सरकारने फलोत्पादन महामंडळाला अनुदान आणखी वाढवून देऊन लोकांना स्वस्त दरात भाज्या उपलब्ध कराव्यात. खांडेपार येथे अलीकडे जलवाहिन्या कुठून फोंडा आणि तिसवाडी या तालुक्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागले, याची गंभीर दखल काँग्रेसने घेतली असून राज्यातील पूल, साकव तसेच जलवाहिन्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे अशी मागणी केली आहे.

ते म्हणाले की, कुठली जलवाहिनी कुठून कुठे जाते, कुठे पाणी पुरवले जाते याचे कोणतेही नकाशे सरकारकडे उपलब्ध नाहीत ते आधी तयार केले जावेत. आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास पणजी सारख्या राजधानी शहरासाठी जलाशय नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या सरकारला कोणतेही सामाजिक भान राहिले नाही, असा आरोप करताना कामत म्हणाले की जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी आठ ते दहा दिवस लागावी ही अत्यंत खेदजनक बाब आहे.

विरोधी पक्ष म्हणून आम्ही समाजाची निगडी निगडीत प्रश्न विधानसभेत उपस्थित केले होते त्याची उत्तरे त्यावेळी मंत्री देत असतात आणि वेळ मारून देत असतात परंतु ही आश्वासने पाळली जात नाहीत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले आहेत. एलईडी दिवे दिलेले नाहीत, त्यामुळे अंधारात रहावे लागेल चतुर्थी काळात लोकांनी या समस्यांना सामोरे जावे काय, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

काँग्रेस सरकार सत्तेवर असताना गावाात पिकप, ट्रकमधून स्वस्त दरात भाज्या पुरविल्या जात असत. या मोहिमेचे काय झाले किती पिकप गावागावात जातात, असा सवाल त्यांनी केला राज्यात भाज्यांचे दर आणि कडधान्याचे दर गगनाला भिडले आहेत याची जंत्रीच देऊन ते म्हणाले की, मडगावच्या बाजारात आज तूर डाळ 110 रुपये किलो, चणाडाळ 110 रुपये, उडीद डाळ 90 रुपये किलो, चणे 80 रुपये किलो तर भाज्यांमध्ये ढब्बू मिरची, भेंडी प्रत्येकी 80 रुपये किलो, गाजर 100 रुपये किलो असे दर आहेत हे दर पुढील पंधरा दिवसात आणखी वाढणार आहेत चतुर्थी काळात लोकांना दिलासा देण्याकरिता सरकारने काही उपाययोजना केल्या आहेत का, असा सवाल कामत यांनी केला. लोकांना भाज्या-फळे गत सालच्या दरानुसार मिळायला हवीत .यासाठी सरकारने अनुदान वाढवावे, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, राज्यात डेंग्युची प्रकरणे वाढली आहेत त्याबद्दल चिंता व्यक्त करताना कामत म्हणाले की, गोमेकॉ इस्पितळात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली आहे. डेंग्यूचा प्रसार होऊ नये यासाठी सरकारने युद्धपातळीवर उपाययोजना करायला हव्यात. पूरग्रस्तांसाठी सरकारने 48 तासात तातडीची मदत आर्थिक मदत देऊन दिलासा द्यायला हवा अशी मागणीही कामत यांनी यावेळी केली. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस