शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

शेती उत्पादन क्षेत्रात एका वर्षात स्वयंपूर्णता गाठण्याचे गोवा सरकारचे उद्दिष्ट- मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 19:30 IST

शेतकऱ्याला दर वर्षी किमान 3 लाखांचे उत्पन्न मिळावे यासाठी आमचे प्रयत्न असतील असे त्यांनी सांगितले.

मडगाव: अन्नधान्य, भाजी, दूध आणि अन्य कृषी उत्पादनात गोवा राज्याला एका वर्षात स्वयंपूर्णता मिळावी यासाठी वेगवेगळ्या खात्याना एकत्रित आणून सर्वसमावेशक कृषी धोरण राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी दिली. मडगाव येथे बांधण्यात आलेल्या कृषी विज्ञान केंद्राच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांनी व्हर्चुअल उद्घाटन केले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, सध्या गोव्याला दूध, भाजी आणि इतर धान्यासाठी इतर राज्यावर अवलंबून राहावे लागते. ही परिस्थिती आम्हाला एका वर्षात बदलायची आहे. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत. शेतकऱ्याला दर वर्षी किमान 3 लाखांचे उत्पन्न मिळावे यासाठी आमचे प्रयत्न असतील असे त्यांनी सांगितले.

सध्या कृषी कार्ड निधी योजनेखाली शेतकाऱ्याव्यतिरिक्त दूध उत्पादकांना 1.60 लाखांचे बिनव्याजी कर्ज देण्यास सुरुवात केली आहे, लवकरच या योजनेचा फायदा मासेमारी आणि बागायती व्यावसायिकांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी यावेळी बोलताना गोव्यातील काजू उत्पादकांना सरकारी योजनेचा फायदा मिळावा यासाठी कृषी कार्डाची सक्ती काढून टाकल्याने सुमारे 32 हजार शेतकऱ्यांना त्याचा अतिरिक्त फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत हेही उपस्थित होते.