शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

गोव्यात सरकारी नारळ विक्री उद्यापासून, 15 ते 20 रुपयांचा दर निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 21:13 IST

सरकारी नारळ विक्री उद्यापासून म्हणजेच गुरुवारपासून सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात आज फातोर्डा व आल्तिनो पणजी अशा दोनच ठिकाणच्या प्रत्येकी एका दालनामधून नारळ विक्री होईल. पंधरा ते वीस रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.

पणजी : सरकारी नारळ विक्री उद्यापासून म्हणजेच गुरुवारपासून सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात आज फातोर्डा व आल्तिनो पणजी अशा दोनच ठिकाणच्या प्रत्येकी एका दालनामधून नारळ विक्री होईल. पंधरा ते वीस रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.

गोवा फलोत्पादन विकास महामंडळावर अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कृषीमंत्री विजय सरदेसाई तसेच कृषी संचालक नेलसन फिगरेदो यांनी लोकमतला सांगितले की, येत्या पंधरा दिवसांत फलोत्पादन महामंडळाच्या सर्व दालनांमधून नारळ विक्री सुरू होईल. आज फक्त दोनच दालनांमध्ये नारळ विक्रीचा शुभारंभ होईल. आल्तिनो येथे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते तर फातोर्डा येथे मंत्री सरदेसाई यांच्या हस्ते उद्घाटन होईल.

फिगरेदो यांनी सांगितले, की ठरलेल्या योजनेप्रमाणो सर्व दालनांमध्ये पुढील पंधरा दिवसांत नारळ विक्री सुरू होईल. नारळाच्या आकारानुसार तीन वेगवेगळ्य़ा प्रकारचे दर निश्चित करण्यात आले आहेत. पंधरा रुपये, अठरा रुपये व वीस रुपये असे तीन दर ठरविण्यात आले आहेत. एकदम मोठय़ा संख्येने नारळ उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे टप्प्याटप्प्याने आम्ही अंमलबजावणी करू. पंधरा दिवसांत सर्व टप्पे पूर्ण होतील. स्थानिक जे बागायतदार, विक्रेते वगैरे आहेत त्यांच्याकडून नारळ विकत घेतले जातील.

दरम्यान, काँग्रेसच्या महिला शाखेने बुधवारी येथे पत्रकार परिषद घेतली. प्रत्येकी दहा रुपये दराने नारळाची विक्री व्हायला हवी, असे महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या. सरकारने केवळ राजकीय स्टंट करू नये. नारळ विक्रीची सविस्तर योजना जाहीर करावी, असे कुतिन्हो म्हणाल्या. काँग्रेसच्या महिला शाखेने राज्यभर केलेल्या आंदोलनामुळेच सरकारला महागाईची व नारळाच्या वाढत्या दरांची दखल घ्यावी लागली. त्यामुळे आपण अनुदानित दराने नारळ विक्री करू अशी घोषणा सरकारने केली. जर सरकारने कमी दरात नारळ विक्री केली नाही तर पुढील वर्षभर महिला काँग्रेसची नारळ विक्री करण्याची तयारी आहे. आम्ही पंधरा हजार नारळांची अवघ्याच दिवसांत विक्री केली. लोकांनी त्यास मोठा प्रतिसाद दिला व त्यामुळे भराभर नारळ विकले गेले, असे कुतिन्हो म्हणाल्या.

टॅग्स :goaगोवा