शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

सरकार आमचा आवाज बंद करू शकत नाही: मनोज परब; आयआयटी आंदोलनातील गुन्हे मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 07:39 IST

शेळ-मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाविरोधात आंदोलन केल्याप्रकरणी सरकारने आमच्या विरोधात गुन्हे दाखल केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सरकारकडून खोट्या तक्रारी करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण आम्ही त्याला घाबरणार नाही. सरकार आमचा आवाज बंद करू शकणार नाही, क्रांती सुरू राहणार, असे रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शेळ-मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाविरोधात आंदोलन केल्याप्रकरणी सरकारने आमच्या विरोधात गुन्हे दाखल केले. न्यायालयात त्याविरोधात लढा दिल्यानंतर हे गुन्हे रद्द झाले. न्यायालयाने आम्हाला न्याय दिला. यावरून सरकार जनतेचा आवाज दाबण्यासाठी खोट्या तक्रारी दाखल करीत असल्याचे सिद्ध झाल्याचे परब यांनी सांगितले. ते म्हणाले, की राज्यातील भाजप सरकार लोकशाहीचा खून करून हुकूमशाही आणू पाहात आहे. त्यामुळे न्याय मागण्यासाठी लोकांना न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागत आहेत. शेळ-मेळावली येथे आयआयटी प्रकल्पाविरोधात २०२१ साली जनआंदोलन झाले. त्यावेळी पोलिसांनी आमच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे. सरकारी अधिकाऱ्यांना त्यांची ड्युटी बजावू न देणे, जमाव करून हल्ला करणे, शस्त्रांचा वापर करणे अशा विविध कलमांखाली गुन्हे नोंद केले. मात्र अॅड. कार्ल्स फरेरा यांनी आमची बाजू न्यायालयात भक्कमपणे मांडली.

हळदोणेचे आमदार अॅड. कार्लस फरेरा यांनी आमची न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडल्याने गुन्हे रद्द झाले, अशी माहिती परब यांनी दिली. अॅड. कार्ल्स फरेरा यांनी नेहमीच राजकारण व आपले कायदेशीर प्रोफेशन वेगळे ठेवले आहे. आमदार म्हणून नव्हे तर वकील म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. त्यांनी नेहमीच आमची बाजू न्यायालयात भक्कमपणे मांडत न्याय मिळवून दिला आहे. अॅड. फरेरा हे आमदार होण्यापूर्वीपासून आरजी पक्षाचे खटले हाताळत असल्याचे परब यांनी सांगितले.

चुकीच्या धोरणांना विरोध करणारच

सरकारने कितीही प्रयत्न केला, पोलिसांचा सिसेमारा मागे लावला तरी ते जनतेचा तसेच रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचा आवाज दाबू शकणार नाही. आम्ही सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवत राहणार. आमची क्रांती सुरूच राहणार, असे मनोज परब यांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण