शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

दहावीच्या विद्यार्थ्यांना खुशखबर; गणित, विज्ञान पेपर सोडवण्यास १५ मिनिटे अधिक वेळ मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 13:16 IST

मागील वर्षीही दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना गणित पेपर सोडविण्यासाठी अधिक वेळ देण्यात आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी असून, गणित आणि विज्ञान परीक्षेचा पेपर लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांना यंदाही १५ मिनिटे अधिक देण्याचा निर्णय शालान्त मंडळाने घेतला आहे. मागील वर्षीही दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना गणित पेपर सोडविण्यासाठी अधिक वेळ देण्यात आला होता. यंदा केवळ दहावीच्या विद्यार्थ्यांनाच अधिक वेळ देण्यात आला आहे, अशी माहिती शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिली.

यंदा केवळ दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीच ही सवलत असेल. तीही गणित आणि विज्ञान विषयासाठी असेल. गणित व विज्ञानच्या पेपरासाठी दीड तास म्हणजे ९० मिनिटे दिली जातात. यावेळी ती १०५ मिनिटे दिली जातील. राष्ट्रीय सर्वेक्षणात गोव्यातील विद्यार्थी गणित विषयात मागे पडत असल्याचा निकष आल्यानंतर शालान्त मंडळाने हा निर्णय घेतला होता. तसेच मागील वर्षी कोविडमुळे अनेक विद्यार्थ्यांचे वर्ग झाले नव्हते. त्यामुळेही अधिक वेळ देण्यात आला होता. प्रथम सत्र परीक्षा ही केवळ पर्याय निवडून लिहिण्याची, म्हणजेच एमसीक्यू पद्धतीने लिहिण्याची होती. त्यामुळे अधिक वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला नव्हता. ही परीक्षा ही उत्तरपत्रिकेवर उत्तरे लिहिण्याची आणि गणिते सोडविण्याची आहे. त्यामुळे अधिक वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर १५ मिनिटे अतिरिक्त वेळ देण्याची सवलत देणारे हे शेवटचे वर्ष आहे. यापुढे ती दिली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. 

दहावीच्या द्वितीय सत्र परीक्षा १ एप्रिलपासून सुरू होत आहेत. तर बारावीच्या १५ मार्चपासून सुरू होत आहेत. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापूर्वीच दहावीचा आणि बारावीचा निकाल जाहीर करण्याचा शालान्त मंडळाचा यंदा इरादा आहे. 

शारीरिक शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण पर्यायी विषय

इयत्ता नववी ते १२वीपर्यंतच्या अभ्याक्रमात शारीरिक शिक्षण व शिक्षक प्रशिक्षण या पर्यायी विषयात वाढ करण्याचा शालान्त मंडळाचा प्रस्ताव आहे. त्यानुसार यापैकी कोणताही एक विषय विद्यार्थ्यांना सातवा विषय म्हणून घेता येईल. म्हणजेच, एकूण सात विषयांपैकी कोणत्याही सहा विषयांत विद्यार्थी उत्तीर्ण झाला तर तो उत्तीर्ण असे धरले जावे, असा हा प्रस्ताव आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होणार की नाही हे काही सांगता येत नाही. परंतु, पर्यायी विषय अभ्यासक्रमात जोडण्यासाठी प्रयत्न जोरात चालू आहेत, असे शेट्ये यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवाssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षा