शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या विद्यार्थ्यांना खुशखबर; गणित, विज्ञान पेपर सोडवण्यास १५ मिनिटे अधिक वेळ मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 13:16 IST

मागील वर्षीही दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना गणित पेपर सोडविण्यासाठी अधिक वेळ देण्यात आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी असून, गणित आणि विज्ञान परीक्षेचा पेपर लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांना यंदाही १५ मिनिटे अधिक देण्याचा निर्णय शालान्त मंडळाने घेतला आहे. मागील वर्षीही दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना गणित पेपर सोडविण्यासाठी अधिक वेळ देण्यात आला होता. यंदा केवळ दहावीच्या विद्यार्थ्यांनाच अधिक वेळ देण्यात आला आहे, अशी माहिती शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिली.

यंदा केवळ दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीच ही सवलत असेल. तीही गणित आणि विज्ञान विषयासाठी असेल. गणित व विज्ञानच्या पेपरासाठी दीड तास म्हणजे ९० मिनिटे दिली जातात. यावेळी ती १०५ मिनिटे दिली जातील. राष्ट्रीय सर्वेक्षणात गोव्यातील विद्यार्थी गणित विषयात मागे पडत असल्याचा निकष आल्यानंतर शालान्त मंडळाने हा निर्णय घेतला होता. तसेच मागील वर्षी कोविडमुळे अनेक विद्यार्थ्यांचे वर्ग झाले नव्हते. त्यामुळेही अधिक वेळ देण्यात आला होता. प्रथम सत्र परीक्षा ही केवळ पर्याय निवडून लिहिण्याची, म्हणजेच एमसीक्यू पद्धतीने लिहिण्याची होती. त्यामुळे अधिक वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला नव्हता. ही परीक्षा ही उत्तरपत्रिकेवर उत्तरे लिहिण्याची आणि गणिते सोडविण्याची आहे. त्यामुळे अधिक वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर १५ मिनिटे अतिरिक्त वेळ देण्याची सवलत देणारे हे शेवटचे वर्ष आहे. यापुढे ती दिली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. 

दहावीच्या द्वितीय सत्र परीक्षा १ एप्रिलपासून सुरू होत आहेत. तर बारावीच्या १५ मार्चपासून सुरू होत आहेत. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापूर्वीच दहावीचा आणि बारावीचा निकाल जाहीर करण्याचा शालान्त मंडळाचा यंदा इरादा आहे. 

शारीरिक शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण पर्यायी विषय

इयत्ता नववी ते १२वीपर्यंतच्या अभ्याक्रमात शारीरिक शिक्षण व शिक्षक प्रशिक्षण या पर्यायी विषयात वाढ करण्याचा शालान्त मंडळाचा प्रस्ताव आहे. त्यानुसार यापैकी कोणताही एक विषय विद्यार्थ्यांना सातवा विषय म्हणून घेता येईल. म्हणजेच, एकूण सात विषयांपैकी कोणत्याही सहा विषयांत विद्यार्थी उत्तीर्ण झाला तर तो उत्तीर्ण असे धरले जावे, असा हा प्रस्ताव आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होणार की नाही हे काही सांगता येत नाही. परंतु, पर्यायी विषय अभ्यासक्रमात जोडण्यासाठी प्रयत्न जोरात चालू आहेत, असे शेट्ये यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवाssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षा