शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
3
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
4
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
5
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
6
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
7
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
8
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
9
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
10
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
11
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
12
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
13
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
14
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
15
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
16
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
17
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
18
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
19
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
20
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी

‘अच्छे दिन’ मानण्यावर असतात - नितीन गडकरींचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 22:05 IST

‘अच्छे दिन’ हे प्रत्येकाच्या मानण्यावर असतात. माणूस सायकल मिळाली की, स्कुटर मिळावी अशी अपेक्षा धरतो व स्कुटर मिळाली की कारगाडी मिळावी, अशी अपेक्षा करतो. देशातील गरीब माणसाच्या मनात सुख समाधान नांदत असते; पण श्रीमंत माणसांच्या घरांमध्ये अस्वस्थता असते, असे निरीक्षण केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नोंदविले.

पणजी, दि. 7 -  ‘अच्छे दिन’ हे प्रत्येकाच्या मानण्यावर असतात. माणूस सायकल मिळाली की, स्कुटर मिळावी अशी अपेक्षा धरतो व स्कुटर मिळाली की कारगाडी मिळावी, अशी अपेक्षा करतो. देशातील गरीब माणसाच्या मनात सुख समाधान नांदत असते; पण श्रीमंत माणसांच्या घरांमध्ये अस्वस्थता असते, असे निरीक्षण केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नोंदविले.गुरुवारी ‘लोकमत’च्या गोवा आवृत्तीतर्फे आयोजित ‘लोकमत गोवन ऑफ द इयर’ पुरस्कार सोहळ्यावेळी वरिष्ठ साहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी गडकरी यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी गडकरी बोलत होते. त्यांनी विविध प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. आपल्या विशिष्ट शैलीत विनोद करत प्रेक्षकांमध्ये हास्य फुलविले. केंद्रात जेव्हा काँग्रेसप्रणित यूपीए सरकारची राजवट होती, तेव्हा देशातील महागाईचा दर 18.8 टक्के होता, तर आता महागाईचा दर केवळ 4 टक्के आहे. कोणीही पंतप्रधान झाला म्हणून लगेच सगळ्या गोष्टी होणार नाहीत. ‘अच्छे दिन’ हे प्रत्येकाच्या मानण्यावर आणि समाधानावर असतात, असे गडकरी यांनी नमूद केले. पंतप्रधान कोणा खासदाराला बोलू देत नाहीत, हा महाराष्ट्रातील एका खासदाराने केलेला आरोप चुकीचा आहे, असेही मत गडकरी यांनी मांडले.केंद्रीय मंत्र्यांची खाती बदलण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी आम्हा चौघा केंद्रीय मंत्र्यांना बसून सर्व मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांचे मूल्यांकन करण्यास सांगितले. त्यानुसार मी, अरुण जेटली, सुषमा स्वराज व राजनाथ सिंग एकत्र बसलो. प्रत्येक मंत्र्याकडील खात्यांचे मूल्यांकन केले व अहवाल पंतप्रधानांना दिला. त्यानंतर कुणाला कोणते खाते द्यावे व कुणाकडून कोणते खाते काढून घ्यावे, हे ठरविण्याचा अधिकार शेवटी पंतप्रधानांचाच असतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याबाबतचा निर्णय घेत नाही. संघाचा संबंध येत नाही, असे गडकरी म्हणाले. मला स्वत:ला जल या विषयात खूप रस आहे. मी गेली दहा-बारा वर्षे या विषयी काम करत आलो आहे. त्यामुळे जलसंपदा खाते माझ्याकडे आले, या विषयी आनंद आहे; पण मी ते खाते मागितले नव्हते. तुम्हाला जे काम व्हायला हवे असे वाटते व जे होणे  अशक्य झाले आहे, असे काम माझ्याकडे सोपवा. मी ते दोन वर्षात शक्य करून दाखवतो, एवढेच मी पंतप्रधानांना सांगितले होते. पंतप्रधानांनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्यांनी जलसंपदा खाते देऊन नद्यांच्या स्वच्छतेचेही काम सोपवले आहे. मी ते करून दाखवीन, असे गडकरी म्हणाले. गंगा नदी शुद्ध करण्याची आणि नद्या जोडणी प्रकल्प राबविण्याची संधी मला मिळाली आहे. त्या विषयी मला आनंद वाटतो, असे गडकरी यांनी नमूद केले. सर्वानाच भाजप प्रवेश नाही!विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्ष मजबूत व्हायला हवा, असे मला वाटते; मात्र राहुल गांधी यांनाच पक्ष विसर्जित करावा, असे वाटत असावे. आम्ही विविध पक्षांमधून येणा-या सर्वानाच भाजपमध्ये घेतले जात नाही. फक्त १० टक्क्यांना घेतले आहे, अजून ९० टक्के प्रतीक्षा यादीमध्ये आहेत, अशी मार्मिक टिप्पणी गडकरी यांनी केली.