शहरं
Join us  
Trending Stories
1
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
2
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
3
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
4
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
5
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
6
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
7
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
8
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
9
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
10
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
11
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
12
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
13
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
14
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
15
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
16
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
17
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
18
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
19
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
20
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद

नितीन गडकरींच्या योजनांपासून गोमंतकीयांनी सावधान राहावे - रवी नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 13:52 IST

मुंबईत नौदलाला एक इंचही जागा देणार नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणतात पण गोव्यात मात्र ते मोठमोठे प्रकल्प गोमंतकीयांवर लादू पाहत आहेत.

पणजी : मुंबईत नौदलाला एक इंचही जागा देणार नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणतात पण गोव्यात मात्र ते मोठमोठे प्रकल्प गोमंतकीयांवर लादू पाहत आहेत. गोमंतकीयांच्या नद्या वगैरे धोक्यात आल्या आहेत. जनमत कौल साजरा करतानाच गोमंतकीयांनी गडकरी यांच्या योजनांबाबत सावध रहावे, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार व माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले.

गोव्याचे महाराष्ट्रात विलिनीकरण व्हायला नको म्हणून गोव्यात जी चळवळ 1967 सालच्या आसपास सुरू झाली होती, त्या चळवळीत आपण सहभागी झालो होतो. आम्ही गोवा राज्याचे अस्तित्व स्वतंत्र राखले पण आज केंद्र सरकारच्या डावापासून गोव्याला धोका संभवतो. गोव्यातील नद्यांचे राष्ट्रीयीकरण करून केंद्र सरकार नद्या ताब्यात घेत आहे. मोठमोठ्या धक्क्यांचे बांधकाम नद्यांच्या किनारी गडकरी करू पाहत आहेत. जर गोव्यातील नद्या, जमिनी वगैरे गडकरी यांच्या मंत्रालयाच्या ताब्यात गेल्या तर गोव्यात गोमंतकीयच परकी होतील. गोमंतकीयांना कोणतेच हक्क राहणार नाहीत, असे रवी नाईक म्हणाले.

गोवा सरकारला सध्या जनमत कौलाबाबत नकली प्रेम वाटत आहे. जनमत कौल दिवसाचे नकली साजरीकरण सुरू झाले आहे. गोवा फॉरवर्ड पक्ष काँग्रेसच्या मतांचे विभाजन करण्यासाठी हे सगळे करत आहे. भाजपाला त्यापासून लाभ व्हावा, असे गोवा फॉरवर्डला वाटते पण तसे होणार नाही, असेही नाईक म्हणाले. 

महाराष्ट्र राज्य आम्हाला परकी नव्हे पण गोमंतकीयांचे स्वत:चे राज्य असावे म्हणून महाराष्ट्रातील विलिनीकरणाला आम्ही विरोध केला होता. त्यावेळी बरेच लोक विलिनीकरणाच्या बाजूने होते. पूर्ण फोंडा तालुकाही विलिनीकरणाच्या बाजूने होता. आता तर विलिनीकरण कुणालाच नको आहे. महाराष्ट्र हा भारताचाच भाग आहे. मात्र आता केंद्र सरकारच्या विविध योजनांपासून गोव्याने सावध राहावे. म्हादई पाणीप्रश्नी कर्नाटक गोव्यावर अन्याय करत आहे. दुस-या बाजूने गोव्यातील नद्यांची मालकी जर गडकरी यांच्या मंत्रालयाकडे गेली तर, गोव्याच्या नद्या गोमंतकीयांसाठी शिल्लक राहणार नाहीत, असे रवी नाईक म्हणाले.

स्वर्गीय जॉक सिक्वेरा हे विलिनीकरणविरोधकांचे नेते होते. ते विरोधी पक्षनेते होते. त्यामुळे गोवा विधानसभेसमोर सिक्वेरा यांचा पुतळा सरकारने उभा करावा,अशी मागणीही नाईक यांनी केली. स्व. भाऊसाहेब बांदोडकर हयात होते तेव्हा आपण महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षात गेलो नव्हतो. स्व. शशिकला काकोडकर यांची राजवट गोव्यात होती, त्यावेळी आपल्या काही मित्रंनी विनंती केली म्हणून आपण मगो पक्षात गेलो होतो, असेही नाईक म्हणाले.

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर