शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

म्हापशात काँग्रेसला सुवर्ण संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 13:48 IST

गोव्याच्या मुक्तीनंतर एकदाही म्हापसा मतदारसंघातून उमेदवार निवडून आणण्यास अपयश आलेल्या काँग्रेस पक्षाला येत्या पोटनिवडणुकीत आपला उमेदवार निवडून आणून इतिहास घडवण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे.

ठळक मुद्दे गोव्याच्या मुक्तीनंतर एकदाही म्हापसा मतदारसंघातून उमेदवार निवडून आणण्यास अपयश आलेल्या काँग्रेस पक्षाला येत्या पोटनिवडणुकीत आपला उमेदवार निवडून आणून इतिहास घडवण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. माजी उपमुख्यमंत्री अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला लाभलेल्या या संधीचा फायदा उठवण्याची गरज सध्या आहे. मतदारसंघात काँग्रेस पक्ष म्हणावा तसा सक्षम नसल्याचे दिसून आले असले तरी मागील काही महिन्यांपासून या पक्षाने आपल्या कार्याला बरीच गती दिली होती.

म्हापसा - गोव्याच्या मुक्तीनंतर एकदाही म्हापसा मतदारसंघातून उमेदवार निवडून आणण्यास अपयश आलेल्या काँग्रेस पक्षाला येत्या पोटनिवडणुकीत आपला उमेदवार निवडून आणून इतिहास घडवण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. माजी उपमुख्यमंत्री अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला लाभलेल्या या संधीचा फायदा उठवण्याची गरज सध्या आहे. त्या ताकदीचा उमेदवार रिंगणात उतरवणे पक्षाला गरजेचे आहे. 

१९६३ ते २०१७ पर्यंत १३ विधानसभेच्या निवडणुका म्हापसा मतदारसंघातून घेण्यात आल्या. त्यात सातवेळा मगोचे, चार वेळा भाजपाचे तर दर एकावेळी काँग्रेस (अर्स) व राजीव काँग्रेसचे उमेदवार येथून निवडून आले आहेत. यात एकदा राजीव काँग्रेसचे आमदार म्हणून फ्रान्सिस डिसोझा पहिल्यांदाच निवडून आले होते. या दोन निवडणुका सोडल्यास या मतदारसंघावर मगो व भाजपाने अधिकार गाजवला आहे. एकूण १३ निवडणुकांतील पाच वेळा फ्रान्सिस डिसोझा यांनी तर तीनवेळा प्रा. सुरेंद्र सिरसाट यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. मात्र एकदाही या मतदारसंघाने काँग्रेसला हात दिला नाही. 

सध्या बाबूशनंतर काँग्रेसला त्यांचा उमेदवार निवडून आणण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. मात्र उमेदवारी कोणाला लाभणार यावरुन सर्व काही अवलंबून राहणार आहे.  सध्या पक्षाकडून तीन उमेदवार निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यांची नावेही चर्चेत आहेत. यात उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके, पक्षाचे जेष्ठ उपाध्यक्ष डॉ. गुरुदास नाटेकर तसेच आर्मिन ब्रागांझा यांचा समावेश आहे. अलिकडेच काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले माजी केंद्रीय मंत्री अडॅ. रमाकांत खलप यांचे पूत्र आश्वीन खलप व स्नुषा श्रद्धा खलप यांच्या भूमिकेकडे सुद्धा लक्ष लागून राहिलेले आहे. या इच्छुकातील सर्वांनी यापूर्वी म्हापसा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती; पण प्रत्येकवेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. ब्रागांझा यानी फक्त एकदाच निवडणूक लढवली होती तर भिके व नाटेकर यांनी प्रत्येकी दोन वेळा निवडणूक लढवलेली. २०१७ च्या निवडणुकीत भिके हे बाबूश यांचे प्रतिस्पर्धी म्हणून रिंगणात होते. त्यांनी अंदाजीत ३०१३  मते प्राप्त झाली होती. 

मतदारसंघात काँग्रेस पक्ष म्हणावा तसा सक्षम नसल्याचे दिसून आले असले तरी मागील काही महिन्यांपासून या पक्षाने आपल्या कार्याला बरीच गती दिली होती. भाजपा तसेच सरकाराच्या विरोधातील नेत्यांना एकत्रित आणण्याचे काम काँग्रेसने हाती घेतले आहे. यात माजी उपमुख्यमंत्री अ‍ॅड. दयानंद नार्वेकर यांच्यासह इतर काँग्रेस नेत्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी पक्ष पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यांनी आपण म्हापशातून निवडणूक लढवणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मतदारसंघातील नेते सुद्धा जोमाने कामाला लागले आहेत. फक्त पक्ष कोणाला उमेदवारी देतो यावर सर्व काही अवलंबून आहे. 

म्हापशातून उमेदवारी कोणाला देण्यात यावी यावर पक्ष पातळीवर निर्णय घेतला जाईल असे विजय भिके म्हणाले. मात्र उमेदवारी फक्त पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच देण्यात येणार असून आयात उमेदवाराला स्थान दिले जाणार नाही. मागील निवडणुका पासून या मतदारसंघात पक्षाने केलेल्या कार्याचा निवडणुकीत नक्कीच लाभदायी ठरणार असल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :congressकाँग्रेसgoaगोवाPoliticsराजकारण