शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

म्हापशात काँग्रेसला सुवर्ण संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 13:48 IST

गोव्याच्या मुक्तीनंतर एकदाही म्हापसा मतदारसंघातून उमेदवार निवडून आणण्यास अपयश आलेल्या काँग्रेस पक्षाला येत्या पोटनिवडणुकीत आपला उमेदवार निवडून आणून इतिहास घडवण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे.

ठळक मुद्दे गोव्याच्या मुक्तीनंतर एकदाही म्हापसा मतदारसंघातून उमेदवार निवडून आणण्यास अपयश आलेल्या काँग्रेस पक्षाला येत्या पोटनिवडणुकीत आपला उमेदवार निवडून आणून इतिहास घडवण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. माजी उपमुख्यमंत्री अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला लाभलेल्या या संधीचा फायदा उठवण्याची गरज सध्या आहे. मतदारसंघात काँग्रेस पक्ष म्हणावा तसा सक्षम नसल्याचे दिसून आले असले तरी मागील काही महिन्यांपासून या पक्षाने आपल्या कार्याला बरीच गती दिली होती.

म्हापसा - गोव्याच्या मुक्तीनंतर एकदाही म्हापसा मतदारसंघातून उमेदवार निवडून आणण्यास अपयश आलेल्या काँग्रेस पक्षाला येत्या पोटनिवडणुकीत आपला उमेदवार निवडून आणून इतिहास घडवण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. माजी उपमुख्यमंत्री अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला लाभलेल्या या संधीचा फायदा उठवण्याची गरज सध्या आहे. त्या ताकदीचा उमेदवार रिंगणात उतरवणे पक्षाला गरजेचे आहे. 

१९६३ ते २०१७ पर्यंत १३ विधानसभेच्या निवडणुका म्हापसा मतदारसंघातून घेण्यात आल्या. त्यात सातवेळा मगोचे, चार वेळा भाजपाचे तर दर एकावेळी काँग्रेस (अर्स) व राजीव काँग्रेसचे उमेदवार येथून निवडून आले आहेत. यात एकदा राजीव काँग्रेसचे आमदार म्हणून फ्रान्सिस डिसोझा पहिल्यांदाच निवडून आले होते. या दोन निवडणुका सोडल्यास या मतदारसंघावर मगो व भाजपाने अधिकार गाजवला आहे. एकूण १३ निवडणुकांतील पाच वेळा फ्रान्सिस डिसोझा यांनी तर तीनवेळा प्रा. सुरेंद्र सिरसाट यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. मात्र एकदाही या मतदारसंघाने काँग्रेसला हात दिला नाही. 

सध्या बाबूशनंतर काँग्रेसला त्यांचा उमेदवार निवडून आणण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. मात्र उमेदवारी कोणाला लाभणार यावरुन सर्व काही अवलंबून राहणार आहे.  सध्या पक्षाकडून तीन उमेदवार निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यांची नावेही चर्चेत आहेत. यात उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके, पक्षाचे जेष्ठ उपाध्यक्ष डॉ. गुरुदास नाटेकर तसेच आर्मिन ब्रागांझा यांचा समावेश आहे. अलिकडेच काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले माजी केंद्रीय मंत्री अडॅ. रमाकांत खलप यांचे पूत्र आश्वीन खलप व स्नुषा श्रद्धा खलप यांच्या भूमिकेकडे सुद्धा लक्ष लागून राहिलेले आहे. या इच्छुकातील सर्वांनी यापूर्वी म्हापसा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती; पण प्रत्येकवेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. ब्रागांझा यानी फक्त एकदाच निवडणूक लढवली होती तर भिके व नाटेकर यांनी प्रत्येकी दोन वेळा निवडणूक लढवलेली. २०१७ च्या निवडणुकीत भिके हे बाबूश यांचे प्रतिस्पर्धी म्हणून रिंगणात होते. त्यांनी अंदाजीत ३०१३  मते प्राप्त झाली होती. 

मतदारसंघात काँग्रेस पक्ष म्हणावा तसा सक्षम नसल्याचे दिसून आले असले तरी मागील काही महिन्यांपासून या पक्षाने आपल्या कार्याला बरीच गती दिली होती. भाजपा तसेच सरकाराच्या विरोधातील नेत्यांना एकत्रित आणण्याचे काम काँग्रेसने हाती घेतले आहे. यात माजी उपमुख्यमंत्री अ‍ॅड. दयानंद नार्वेकर यांच्यासह इतर काँग्रेस नेत्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी पक्ष पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यांनी आपण म्हापशातून निवडणूक लढवणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मतदारसंघातील नेते सुद्धा जोमाने कामाला लागले आहेत. फक्त पक्ष कोणाला उमेदवारी देतो यावर सर्व काही अवलंबून आहे. 

म्हापशातून उमेदवारी कोणाला देण्यात यावी यावर पक्ष पातळीवर निर्णय घेतला जाईल असे विजय भिके म्हणाले. मात्र उमेदवारी फक्त पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच देण्यात येणार असून आयात उमेदवाराला स्थान दिले जाणार नाही. मागील निवडणुका पासून या मतदारसंघात पक्षाने केलेल्या कार्याचा निवडणुकीत नक्कीच लाभदायी ठरणार असल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :congressकाँग्रेसgoaगोवाPoliticsराजकारण