शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सोनसाखळ्या चोर व पोलिस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 12:09 IST

राज्यात गुन्हेगारी अलीकडे चहूबाजूंनी वाढलेली आहे.

राज्यात गुन्हेगारी अलीकडे चहूबाजूंनी वाढलेली आहे. पोलिस खाते दरवेळी आकडेवारी देऊन गुन्हे वाढत नाहीत, असा दावा करत असते. कोणत्याच राज्याचे पोलिस खाते कधीच आपल्या प्रांतात गुन्हे वाढलेत असे सांगत नाही. गोव्यात तर अनेक पोलिस स्थानकांमध्ये छोट्या चोऱ्यांची आणि काही लोकांच्या तक्रारींची नोंददेखील होत नाही. 

चोरट्यांनी अगदी फुटकळ सामान चोरून नेले तर लोक पोलिसांत तक्रार द्यायला पुढे येत नाहीत. काहीवेळा लोक पुढे आले तरी, पोलिस स्थानकातील हवालदार किंवा पीएसआय सहकार्य करत नाही. प्रत्येक एफआयआर नोंद करायला हवा, असा आदेश असला तरी, पोलिसांचा कल असतो की, शक्यतो एफआयआर नोंद होऊच नये. त्यामुळे कागदोपत्री गुन्हे कमी दाखवता येतात. गोव्यातील रस्त्यांवर आजदेखील सगळीकडे वाहतूक पोलिसांची फौज आहे. हे वाहतूक पोलिस वाहतुकीचे व्यवस्थापन करण्याचे काम करत नाहीत. वाहतूक कोंडीकडे त्यांचे लक्ष नाही. त्यांचे लक्ष वसुलीकडे आहे. कळंगूटचे भाजप आमदार मायकल लोबो म्हणतात त्याप्रमाणे पोलिसांना दिवसाला चाळीस केसेस नोंद करण्याचे टार्गेट दिले गेले आहे. वाहतूक नियमभंगाचे दिवसाला चाळीस गुन्हे नोंद करण्याचे टार्गेट आम्ही पीएसआयना मुळीच दिलेले नाही असे स्पष्टीकरण लोबो यांच्या आरोपानंतर पोलिस खात्याने किंवा मुख्यमंत्र्यांनीही केले नाही. राज्यात स्थिती ही अशी आहे. अशावेळी चोरट्यांना पकडणे हे पोलिसांचे प्रथम प्राधान्य झालेलेच नाही. सोनसाखळी चोरणारे चोरटे सगळीकडे फिरत आहेत. 

ज्या गावांमध्ये पूर्वी कधी महिलांच्या सोनसाखळ्या चोरल्या जात नव्हत्या, तिथेदेखील अशा घटना घडू लागल्यात. दुचाकीवरून फिरणारे चोरटे सोनसाखळ्या हिसकावतात. मध्यंतरी मुरगावमधील दोन घटनांबाबत चोरटे पकडले गेले. अन्य घटनांचा छडा लागलेला नाही. केपे व फोंडा तालुक्यातही महिलांच्या सोनसाखळ्या पळविण्याच्या घटना घडल्या. सगळीकडे घबराट निर्माण झाली आहे. महिलांनी गळ्यात सोनसाखळी किंवा मंगळसूत्र घालून कुठे फिरणेच कठीण होऊ लागले आहे. केपे परिसरात तर बसमध्येही महिलांच्या अंगावरील साखळी पळवली गेली. मुख्यमंत्री सावंत यांनी या सर्व घटनांची दखल घेऊन पोलिस अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेण्याची गरज आहे. पूर्वी राज्यात कुठेही मोठा गुन्हा घडला की, गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांनी तातडीने मंत्रालयात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना बोलावून बैठक घेण्याची पद्धत होती. 

अलीकडे अशा बैठका होत नाहीत. फक्त दरोडे पडू लागले तरच पोलिस यंत्रणा व एकूणच सरकार सक्रिय होणार काय? सोनसाखळ्या पळविण्याच्या घटना सगळीकडे घडत असताना त्याविरुद्ध पोलिस खाते प्रभावी उपाययोजना करतेय, असा अनुभव येत नाही. सामान्य माणूस असुरक्षित झालेला आहे. अलीकडे प्राणघातक हल्ले व खुनाच्याही घटना घडल्या आहेत.

परप्रांतीय मजूरच बहुतांश गुन्ह्यांमध्ये अडकलेले असतात असे विधान मुख्यमंत्री सावंत यांनी यापूर्वी तीनवेळा केले. परप्रांतीय म्हणताना दोन राज्यांची नावेदेखील त्यांनी घेतली होती. अर्थात राज्यांची नावे घेण्याचे कारण नाही. मात्र परप्रांतीय मजुरांकडून गोव्यात गुन्हे वाढू नयेत म्हणून पोलिस खाते कोणती मोहीम राबवत आहे ते जरा सरकारने सांगितले तर बरे होईल. 

पूर्वी गुन्हे वाढले की, गोवा विधानसभा गाजत असे. आता विधानसभा अधिवेशनच सरकार जास्त दिवसांचे घेत नाही. विरोधकांना सामोरेच जाऊया नको, अशी भूमिका सरकारने घेतली आहे. या कातडीबचावू भूमिकेमुळे सर्वांनाच रान मोकळे मिळाले आहे. परप्रांतीय मजुरांची संख्या वाढत जाईलच. झोपडपट्टी भागांतील मजुरांबाबतची माहिती संबंधित पोलिस स्थानकांकडे असणे गरजेचे आहे.

मजुरांच्या पार्श्वभूमीबाबत पोलिसांकडे नोंद असणे गरजेचे आहे. पूर्वी पोलिस साध्या कपड्यांमध्ये फिरून माहिती गोळा करायचे आता तसे होत नाही. किनारी भागांमध्ये पर्यटक लुटले जात आहेत. त्यांच्या मौल्यवान वस्तू कधी हॉटेलच्या खोलीतून तर कधी किनाऱ्यावरून पळविल्या जात आहेत. यात दरवेळी परप्रांतीय मजूरच असतात असे नाही तर स्थानिकही असतात. वाढती गुन्हेगारी थांबवून सरकारने सुरक्षेचे वातावरण निर्माण करावे. पोलिसांचा अधिकाधिक वापर हा वाहने अडवून तालांव देण्यासाठी न करता चोरट्यांना एककासाठी केल्यास चांगले होईल.

 

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस