शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या फेरीबोटी ‘राम भरोसे’, गेल्या तीन वर्षात भरकटण्याच्या चार मोठ्या घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 20:32 IST

गोव्यातील बेटांवर राहणा-या लोकांना प्रवासाकरिता महत्त्वाचे साधन असलेल्या तसेच पर्यटकांचे मोठे आकर्षण असलेल्या फेरीबोटी ‘राम भरोसे’ ठरल्या आहेत. 

पणजी : गोव्यातील बेटांवर राहणा-या लोकांना प्रवासाकरिता महत्त्वाचे साधन असलेल्या तसेच पर्यटकांचे मोठे आकर्षण असलेल्या फेरीबोटी ‘राम भरोसे’ ठरल्या आहेत. गेल्या तीन वर्षांच्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी नद्यांमध्ये फेरीबोटी भरकटण्याचे चार मोठ्या घटना घडल्या. सुदैवाने यात जीवीतहानी झालेली नसली तरी फेरीबोटींमधील प्रवासी तब्बल दोन तासांहून अधिक काळ अडकून पडण्याचे प्रकार घडले. अगदी अलीकडे २६ आॅक्टोबर २0१७ रोजी  राजधानी शहरात पणजी-बेती जलमार्गावरील फेरीबोट रात्री भरकटल्यानंतर गोंधळ उडाला होता. सुमारे २0 वाहने तसेच प्रवाशी अडकून पडले होते. कांपाल येथे फेरीबोट रुतून पडली. प्रवाशांना सुखरुप बाहेर काढल्यानंतर तब्बल २४ तासांनी या फेरीबोटीची सुटका करण्यात येश मिळाले होते. 

राज्यात वेगवेगळ्या १९ जलमार्गांवर फेरीबोटी चालतात. या जलमार्गांवर पूल नसल्याने बेटांवरुन शहरांकडे ये-जा करण्यासाठी फेरीबोटी हेच प्रमुख साधन आहे. पणजी- बेती, चोडण-रायबंदर, दिवाडी-जुने गोवें, दिवाडी-सांपेद्र या जलमार्गांवर फेरीबोटींची मागणी जास्त आहे त्यामुळे प्रवासीही मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असतात. 

अशा भरकटल्या फेरीबोटी

जलमार्ग                 घटनेची तारीख

कामुर्ली-तुयें          १0 फेब्रुवारी २0१६

वाशी-आमई           ६ आॅक्टोबर २0१७

पणजी-बेती          २६ आॅक्टोबर २0१७

रासई-दुर्भाट           ८ आॅक्टोबर २0१७

अनेकदा सोसाट्याचा वारा किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे फेरीबोटी भरकटण्याचे प्रकार घडतात परंतु काहीवेळा अन्य कारणेही कारणीभूत असतात. आमदार रेजिनाल्द लॉरेन्स यांनी यासंबंधीचा प्रश्न नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा अधिवेशनात विचारला होता. प्रत्येक फेरीबोटीची तपासणी करण्यासाठी मशिनिस्ट नेमलेले असतात. फेरीबोटींवरील कर्मचाºयांकडे मोबाइल फोन दिलेले आहेत. नदी परिवहान खात्याचा वाहतूक विभाग २४ तास कार्यरत असतो आणि आणीबाणीच्यावेळी हे कर्मचारी घटनेची कल्पना या विभागाला देतात, असे लेखी उत्तर त्यांना देण्यात आले. 

आणीबाणीच्या काळात नदी परिवहन खात्याची सर्व यंत्रणा सज्ज असते असा दावा सरकारतर्फे केला जात असला तरी प्रवाशांचा अनुभव मात्र वाईट आहे. नदी परिवहन खात्याकडे अशी आणीबाणीची स्थिती हाताळण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही,  जलद कृती दलाचाही अभाव आहे. फेरीबोटीतून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. परंतु त्यांच्यासाठी लाइफ जॅकेटची मात्र सोय नसते. पर्यटकांना जलसफरी घडवून आणणाºया पणजीतील बोटींचीही हीच स्थिती आहे. 

फेरीबोटी भरकटण्यास खराब हवामान हे एक कारण आहेच. परंतु त्याचबरोबर योग्य प्रशिक्षण, नियम, अंमलबजावणीचा अभाव ही देखिल अन्य कारणे आहेत. 

टॅग्स :goaगोवा