शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

गोव्याच्या फेरीबोटी ‘राम भरोसे’, गेल्या तीन वर्षात भरकटण्याच्या चार मोठ्या घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 20:32 IST

गोव्यातील बेटांवर राहणा-या लोकांना प्रवासाकरिता महत्त्वाचे साधन असलेल्या तसेच पर्यटकांचे मोठे आकर्षण असलेल्या फेरीबोटी ‘राम भरोसे’ ठरल्या आहेत. 

पणजी : गोव्यातील बेटांवर राहणा-या लोकांना प्रवासाकरिता महत्त्वाचे साधन असलेल्या तसेच पर्यटकांचे मोठे आकर्षण असलेल्या फेरीबोटी ‘राम भरोसे’ ठरल्या आहेत. गेल्या तीन वर्षांच्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी नद्यांमध्ये फेरीबोटी भरकटण्याचे चार मोठ्या घटना घडल्या. सुदैवाने यात जीवीतहानी झालेली नसली तरी फेरीबोटींमधील प्रवासी तब्बल दोन तासांहून अधिक काळ अडकून पडण्याचे प्रकार घडले. अगदी अलीकडे २६ आॅक्टोबर २0१७ रोजी  राजधानी शहरात पणजी-बेती जलमार्गावरील फेरीबोट रात्री भरकटल्यानंतर गोंधळ उडाला होता. सुमारे २0 वाहने तसेच प्रवाशी अडकून पडले होते. कांपाल येथे फेरीबोट रुतून पडली. प्रवाशांना सुखरुप बाहेर काढल्यानंतर तब्बल २४ तासांनी या फेरीबोटीची सुटका करण्यात येश मिळाले होते. 

राज्यात वेगवेगळ्या १९ जलमार्गांवर फेरीबोटी चालतात. या जलमार्गांवर पूल नसल्याने बेटांवरुन शहरांकडे ये-जा करण्यासाठी फेरीबोटी हेच प्रमुख साधन आहे. पणजी- बेती, चोडण-रायबंदर, दिवाडी-जुने गोवें, दिवाडी-सांपेद्र या जलमार्गांवर फेरीबोटींची मागणी जास्त आहे त्यामुळे प्रवासीही मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असतात. 

अशा भरकटल्या फेरीबोटी

जलमार्ग                 घटनेची तारीख

कामुर्ली-तुयें          १0 फेब्रुवारी २0१६

वाशी-आमई           ६ आॅक्टोबर २0१७

पणजी-बेती          २६ आॅक्टोबर २0१७

रासई-दुर्भाट           ८ आॅक्टोबर २0१७

अनेकदा सोसाट्याचा वारा किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे फेरीबोटी भरकटण्याचे प्रकार घडतात परंतु काहीवेळा अन्य कारणेही कारणीभूत असतात. आमदार रेजिनाल्द लॉरेन्स यांनी यासंबंधीचा प्रश्न नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा अधिवेशनात विचारला होता. प्रत्येक फेरीबोटीची तपासणी करण्यासाठी मशिनिस्ट नेमलेले असतात. फेरीबोटींवरील कर्मचाºयांकडे मोबाइल फोन दिलेले आहेत. नदी परिवहान खात्याचा वाहतूक विभाग २४ तास कार्यरत असतो आणि आणीबाणीच्यावेळी हे कर्मचारी घटनेची कल्पना या विभागाला देतात, असे लेखी उत्तर त्यांना देण्यात आले. 

आणीबाणीच्या काळात नदी परिवहन खात्याची सर्व यंत्रणा सज्ज असते असा दावा सरकारतर्फे केला जात असला तरी प्रवाशांचा अनुभव मात्र वाईट आहे. नदी परिवहन खात्याकडे अशी आणीबाणीची स्थिती हाताळण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही,  जलद कृती दलाचाही अभाव आहे. फेरीबोटीतून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. परंतु त्यांच्यासाठी लाइफ जॅकेटची मात्र सोय नसते. पर्यटकांना जलसफरी घडवून आणणाºया पणजीतील बोटींचीही हीच स्थिती आहे. 

फेरीबोटी भरकटण्यास खराब हवामान हे एक कारण आहेच. परंतु त्याचबरोबर योग्य प्रशिक्षण, नियम, अंमलबजावणीचा अभाव ही देखिल अन्य कारणे आहेत. 

टॅग्स :goaगोवा