शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

गोव्याच्या फेरीबोटी ‘राम भरोसे’, गेल्या तीन वर्षात भरकटण्याच्या चार मोठ्या घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 20:32 IST

गोव्यातील बेटांवर राहणा-या लोकांना प्रवासाकरिता महत्त्वाचे साधन असलेल्या तसेच पर्यटकांचे मोठे आकर्षण असलेल्या फेरीबोटी ‘राम भरोसे’ ठरल्या आहेत. 

पणजी : गोव्यातील बेटांवर राहणा-या लोकांना प्रवासाकरिता महत्त्वाचे साधन असलेल्या तसेच पर्यटकांचे मोठे आकर्षण असलेल्या फेरीबोटी ‘राम भरोसे’ ठरल्या आहेत. गेल्या तीन वर्षांच्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी नद्यांमध्ये फेरीबोटी भरकटण्याचे चार मोठ्या घटना घडल्या. सुदैवाने यात जीवीतहानी झालेली नसली तरी फेरीबोटींमधील प्रवासी तब्बल दोन तासांहून अधिक काळ अडकून पडण्याचे प्रकार घडले. अगदी अलीकडे २६ आॅक्टोबर २0१७ रोजी  राजधानी शहरात पणजी-बेती जलमार्गावरील फेरीबोट रात्री भरकटल्यानंतर गोंधळ उडाला होता. सुमारे २0 वाहने तसेच प्रवाशी अडकून पडले होते. कांपाल येथे फेरीबोट रुतून पडली. प्रवाशांना सुखरुप बाहेर काढल्यानंतर तब्बल २४ तासांनी या फेरीबोटीची सुटका करण्यात येश मिळाले होते. 

राज्यात वेगवेगळ्या १९ जलमार्गांवर फेरीबोटी चालतात. या जलमार्गांवर पूल नसल्याने बेटांवरुन शहरांकडे ये-जा करण्यासाठी फेरीबोटी हेच प्रमुख साधन आहे. पणजी- बेती, चोडण-रायबंदर, दिवाडी-जुने गोवें, दिवाडी-सांपेद्र या जलमार्गांवर फेरीबोटींची मागणी जास्त आहे त्यामुळे प्रवासीही मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असतात. 

अशा भरकटल्या फेरीबोटी

जलमार्ग                 घटनेची तारीख

कामुर्ली-तुयें          १0 फेब्रुवारी २0१६

वाशी-आमई           ६ आॅक्टोबर २0१७

पणजी-बेती          २६ आॅक्टोबर २0१७

रासई-दुर्भाट           ८ आॅक्टोबर २0१७

अनेकदा सोसाट्याचा वारा किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे फेरीबोटी भरकटण्याचे प्रकार घडतात परंतु काहीवेळा अन्य कारणेही कारणीभूत असतात. आमदार रेजिनाल्द लॉरेन्स यांनी यासंबंधीचा प्रश्न नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा अधिवेशनात विचारला होता. प्रत्येक फेरीबोटीची तपासणी करण्यासाठी मशिनिस्ट नेमलेले असतात. फेरीबोटींवरील कर्मचाºयांकडे मोबाइल फोन दिलेले आहेत. नदी परिवहान खात्याचा वाहतूक विभाग २४ तास कार्यरत असतो आणि आणीबाणीच्यावेळी हे कर्मचारी घटनेची कल्पना या विभागाला देतात, असे लेखी उत्तर त्यांना देण्यात आले. 

आणीबाणीच्या काळात नदी परिवहन खात्याची सर्व यंत्रणा सज्ज असते असा दावा सरकारतर्फे केला जात असला तरी प्रवाशांचा अनुभव मात्र वाईट आहे. नदी परिवहन खात्याकडे अशी आणीबाणीची स्थिती हाताळण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही,  जलद कृती दलाचाही अभाव आहे. फेरीबोटीतून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. परंतु त्यांच्यासाठी लाइफ जॅकेटची मात्र सोय नसते. पर्यटकांना जलसफरी घडवून आणणाºया पणजीतील बोटींचीही हीच स्थिती आहे. 

फेरीबोटी भरकटण्यास खराब हवामान हे एक कारण आहेच. परंतु त्याचबरोबर योग्य प्रशिक्षण, नियम, अंमलबजावणीचा अभाव ही देखिल अन्य कारणे आहेत. 

टॅग्स :goaगोवा