शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

म्हादईच्या पाण्यावर गोव्याचे पाच पाणी प्रकल्प अवलंबून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 19:20 IST

म्हादई नदीत 113.57 टीएमसी एवढेच पाणी आहे. ते 188 टीएमसी असल्याचा म्हादई पाणी तंटा लवादाने काढलेला निष्कर्ष चुकीचा आहे, असे गोव्याच्या जलसंसाधन खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पणजी: म्हादई नदी गोव्याच्या एकूण 42 टक्के भौगोलिक क्षेत्रतून वाहते. या नदीच्या पाण्यावर दाबोस, उसगाव गांजेसह एकूण पाच पाणी पुरवठा प्रकल्प अवलंबून आहेत. साळावलीला देखील म्हादईचे पाणी प्राप्त होते. म्हादईचे पाणी वळविल्यानंतर साळावलीचा पाणी प्रकल्प देखील धोक्यात येईल याची कल्पना सरकारला आली आहे.

म्हादई नदीत 113.57 टीएमसी एवढेच पाणी आहे. ते 188 टीएमसी असल्याचा म्हादई पाणी तंटा लवादाने काढलेला निष्कर्ष चुकीचा आहे, असे गोव्याच्या जलसंसाधन खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गांजेनंतरचे बरेच पाणी हे खारे पाणी आहे. त्यामुळे ते विचारात घेता येत नाही. लवादाच्या निवाड्याप्रमाणे पाणी वाटप झाले तर 85 टीएमसीच पाणी म्हादई नदीत शिल्लक राहिल. अशावेळी गोव्यातील जैवसंपदा तसेच पाणी पुरवठा प्रकल्प अडचणीत येतील.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की म्हादई पाणीप्रश्नी लवादाच्या निवाडय़ाला आव्हान देण्याची कृती ही आपले सरकार अधिकारावर आल्यानंतरच केली गेली. केवळ उत्तर गोव्याचाच म्हादई नदीच्या पाण्याशी संबंध येतो असे नाही तर 42 टक्के भौगोलिक क्षेत्रतून म्हादई नदी जाते. साळावलीला देखील खांडेपार-काले नदीद्वारे म्हादईचेच पाणी प्राप्त होते. म्हादईचे पाणी कर्नाटकने थोडे वळविल्याने अगोदरच गोव्यात येणारे पाणी थोडे कमी झाले आहे.

राज्यातील पाणी पुरवठा प्रकल्प आम्हाला वाचवायचे आहेत. त्यासाठीच आम्ही लवादाचा निवाडा स्वीकारला नाही व त्यास आव्हान दिले. यापूर्वीच्या सरकारमधील जलसंसाधन मंत्री पालयेकर व अन्य एका मंत्र्याने त्यावेळी लवादाच्या निवाडय़ाचे स्वागत केले होते व सर्वोच्च न्यायालयात जाण्याची गरज नाही असे नमूद केले होते.

मुख्यमंत्री म्हणाले, की लवादाचा निवाडा अधिसूचित झाला म्हणजे लगेच कर्नाटकला म्हादईवरील सर्व कामांसाठी केंद्राकडून परवाने मिळतील असे मुळीच नाही. वन्यजीव मंडळाचा तसेच वन खात्याचा वगैरे परवाना मिळायला खूप वेळ लागतो. तोर्पयत सर्वोच्च न्यायालयात म्हादईप्रश्नी सुनावणी होईल. कर्नाटकला म्हादईचे पाणी वळवताच येणार नाही.

टॅग्स :goaगोवाWaterपाणीPramod Sawantप्रमोद सावंत