शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

गोव्यातील घरांत शिरले पाणी, सरकारची अनास्था पाण्यावर तरंगली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 19:37 IST

गोव्यातील सर्वच तालुक्यांमध्ये शुक्रवारी सलग काही तास प्रचंड पाऊस पडल्याने बहुतांश रस्ते पाण्याखाली गेले. तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने कुटुंबांचे अन्यत्र स्थलांतर करावे लागले आहे.

पणजी : गोव्यातील सर्वच तालुक्यांमध्ये शुक्रवारी सलग काही तास प्रचंड पाऊस पडल्याने बहुतांश रस्ते पाण्याखाली गेले. तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने कुटुंबांचे अन्यत्र स्थलांतर करावे लागले आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली, रस्ते व छोटे पुल वाहून गेले तर काही ठिकाणी वीज ट्रान्सफॉर्मर मोडले आहेत. शुक्रवारच्या मुसळधार पावसामुळे गोव्याला मोठ्या हानीला सामोरे जावे लागले. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या वल्गना करणाऱ्या सरकारची अनास्था पाण्यावर तरंगताना दिसून आली. 

उत्तर गोव्यातील वाळवंटी तसेच अस्नोडामधील पार या नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे जलसंसाधन खात्याने पंपिंग करून पाणी बाहेर सोडले. दुपारी पाऊस कमी झाल्यानंतर पूर ओसरला, अन्यथा हाहाकार उडाला असता. सभापती डॉ.प्रमोद सावंत यांनी साखळीला भेट देऊन स्थितीची पाहणी केली. गोव्यातील हरवळेचा धबधबाही भरला असून डिचोलीतील लाटंबार्से पंचायत क्षेत्रातील तीन घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे त्या कुटुंबांना तात्पुरते अन्यत्र स्थलांतरीत करावे लागले आहे. मुसळधार पावसामुळे राजधानी पणजीतील अनेक दुकानांत आणि काही घरांमध्येही पाणी गेले. तसेच पणजीतील सर्वच महत्त्वाचे रस्ते पाण्याखाली गेले होते. रस्त्यांच्या बाजूने पार्क करून ठेवलेली दुचाकी व अन्य वाहने अर्धी बुडाली होती. पणजी महापालिका इमारतीसमोरही गुडघाभर पाणी भरले होते. पणजी ते मिरामार व दोनापावल हा रस्ता पूर्ण पाण्याखाली गेला होता. सरकार एकाबाजूने लोकांना पणजी शहरास स्मार्ट सिटी बनविण्याच्या वल्गना करतेय. मात्र, दुसरीकडे पाऊस पडताच अर्धे शहर पाण्याखाली जाते. त्यामुळे सरकारकडून केवळ बोलाची कडी अन् बोलाचाच भात, होत असल्याचे दिसून येते. फोंडा, म्हापसा, वास्को, मडगाव अशा शहरांमध्येही पावसामुळे काही रस्त्यांना नद्यांचे रुप प्राप्त झाले होते. पेडण्यात एक छोटा पूल खचला. पणजीपासून जवळच असलेल्या बांबोळी येथील रस्त्यावर व क्रॉससमोरून जाणाऱ्या रस्त्यालाही नदीचे रुप आले होते. काही भागांत लोकांनी रस्त्यावरील पाण्यात होड्या चालवून निषेधही केला. राज्यभर झाडे उन्मळून पडली. सत्तरी, सांगे, केपे, डिचोली अशा तालुक्यातील दुर्गम भागांतील लोकांना पावसाचा मारा असह्य झाला. वीज पुरवठाही अनेक ठिकाणी खंडीत झाला. झाडांच्या फांद्या वीज वाहिन्यांवर पडल्याचे अनेक ठिकाणी पहायला मिळाले. कचरा, प्लॅस्टीक वगैरे पावसामुळे शहरांतील रस्त्यांवर वाहून आले.

टॅग्स :RainपाऊसgoaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर