शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

पहलगाम हल्ल्यामुळे गोवेकरांकडून जम्मू-काश्मीरचे बुकिंग रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 13:04 IST

वाघा बॉर्डरचे दौरेही गुंडाळले : असुरक्षित व भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पहलगाम येथील दहशतवादी-हल्ल्यानंतर अनेक गोवेकरांनी काश्मीर दौरे रद्द केले आहेत. ट्रॅव्हल एजंटांकडे तसेच स्वतः एअरलाइन्स कंपन्यांकडे आरक्षित केलेली तिकिटे रद्द करुन घेतली आहेत.

अनेकांनी अमृतसर, वाघा बॉर्डरचेही दौरे आखले होते तेही रद्द केले आहेत. दहशतवादी हल्ल्यामुळे पाकिस्तानशी संबंध ताणले गेल्याने वाघा बॉर्डरला होणारी 'बीटिंग रिट्रीट सेरेमनी' परेड तूर्त बंद करण्याच्या हालचाली भारत सरकारने चालवल्या आहेत. पर्यटक ही परेड पाहण्यासाठीच जात असतात. दररोज भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर ही परेड आयोजित केली जाते. हे राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक आहे आणि पर्यटकांसाठी अनोखा अनुभव असतो. सीमा दरवाजे सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुले असतात, परंतु दहशतवादी हल्ल्यानंतर ती बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

दूर अॅण्ड ट्रॅव्हल्स व्यतिरिक्त स्वतंत्रपणे काश्मीर दौरे करणारेही अनेक गोवेकर आहेत. एअर इंडिया, इंडिगोची दिल्लीमार्गे श्रीनगरला जाण्यासाठी रोज विमाने सुटतात. अनेक गोमंतकीय या विमानांनी काश्मीरला जाण्यासाठी प्रवास करत असतात. तसेच मुंबई, दिल्लीला जाऊन तेथूनही वेगवेगळ्या विमानांनी श्रीनगरला जात असतात. ही तिकिटे हल्ल्यानंतर अनेकांनी रद्द करून घेतली आहेत.

म्हणून बुकिंग रद्द : निलेश शहा

पीबीए हॉलीडेजचे नीलेश शहा म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरसाठी आमच्याकडील बुकिंग काहीजणांनी रद्द केले आहे. लोकांमध्ये असुरक्षिततेचे व भीतीचे वातावरण आहे. दहशतवाद्यांना प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकवर हल्ला चढवल्यास काश्मीरमध्ये अडकून पडण्याचीही भीती लोकांना वाटते. त्यामुळे आरक्षण रद्द केले जात आहे. शहा हे टूर अॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ गोवा (टीटीएजी) चे माजी अध्यक्ष म्हणाले की, गोव्यातून मे महिन्याच्या सुटीत सहलीसाठी जम्मू, काश्मीरला जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. साधारणपणे ४०० ते ५०० गोवेकर या दिवसात काश्मीरला जातात. मात्र, हल्ल्यामुळे गोमंतकीय आपले बुकिंग रद्द करत आहेत. 

टॅग्स :goaगोवाPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर