शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

गोवा हरित अर्थव्यवस्थेकडे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 07:19 IST

बेतुल येथे 'इंडिया एनर्जी वीक २०२६' चे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी:गोवा हरित आणि नील अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना, अशा आंतरराष्ट्रीय परिषदेचे यजमानपद मिळणे ही अभिमानाची बाब असून, यामुळे राष्ट्रीय विकासासोबतच स्थानिक रोजगार व संधींनाही चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. बेतुल येथे मंगळवारी इंडिया एनर्जी वीक २०२६ च्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायूमंत्री हरदीपसिंग पुरी, तसेच यूएईचे उद्योग व प्रगत तंत्रज्ञान मंत्री आणि अॅडनॉक समूहाचे सीईओ डॉ. सुलतान अल जाबेर यांची प्रमुख उपस्थिती होती. ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ आणि देश-विदेशातील प्रतिनिधींनी उपस्थिती लावली होती.

मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्य आभासी संदेशाने उद्घाटन सोहळ्यास विशेष उंची प्राप्त झाली. १२० हून अधिक देशांतील व्यावसायिक व प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत.

'गोवा शंभर टक्के अक्षय ऊर्जा राज्य बनेल'

दरम्यान, २०५० पर्यंत गोवा शंभर टक्के अक्षय ऊर्जा राज्य बनवण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. ऊर्जा संक्रमणाच्या दृष्टिकोनासह गोव्याने स्वच्छ ऊर्जा रोडमॅप तयार केला आहे. अधिकाधिक अक्षय ऊर्जा निर्माण करण्यासाठी गोवा कटिबद्ध आहे, असेही ते म्हणाले.

सिंग म्हणाले की, अणुऊर्जा व जहाजबांधणी क्षेत्रालाही चालना दिली जात आहे. २०४७ पर्यंत १०० गीगावॅट अणुऊर्जा क्षमता उभारण्याचे उद्दिष्ट जाहीर करण्यात आले. तेल व वायू व्यापारासाठी ६० नव्या जहाजांची तातडीची गरज असून त्यातून ५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक संधी निर्माण होणार आहे.इंडिया एनर्जी वीक वेगाने एका विश्वासार्ह जागतिक व्यासपीठात विकसित केले आहे, जे जागतिक ऊर्जा व्यवस्थेतील अभूतपूर्व संक्रमण आणि अस्थिरतेच्या काळात धोरणकर्ते, उत्पादक, ग्राहक, तंत्रज्ञान प्रदाते आणि गुंतवणूकदारांना एकत्र आणते. पुरी यांनी तेल, वायू, जैवइंधन, हरित हायड्रोजन, एलएनजी आणि स्वच्छ स्वयंपाक इंधनांमध्ये शाश्वत गुंतवणुकीची गरज अधोरेखित केली.

आणखी चार दिवस परिषद

दरम्यान, पुढील चार दिवस ३० पर्यंत इंडिया एनर्जी वीक परिषद गोव्यात चालणार आहे. भारताच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संरक्षणाखाली आणि फेडरेशन ऑफ इंडियन पेट्रोलियम इंडस्ट्री आणि डीएमजी कार्यक्रमांच्या संयुक्त विद्यमाने ती आयोजित केली आहे. जागतिक ऊर्जा परिवर्तनाच्या केंद्रस्थानी भारत आपली भूमिका मजबूत करत असताना इंडिया एनर्जी वीक २०२६ धोरणकर्ते, व्यावसायिक नेते, नवोन्मेषक आणि गुंतवणूकदारांना सुरक्षित, शाश्वत आणि परवडणाऱ्या ऊर्जा भविष्यासाठी व्यावहारिक उपाय चालविण्यासाठी एकत्र करेल.

ऊर्जा सुरक्षा व स्थैर्य राखणे आवश्यक : हरदीप सिंग पुरी

केंद्रीय पेट्रोलियममंत्री म्हणाले, की नवीकरणीय ऊर्जेचा जागतिक विद्युत निर्मितीतील वाटा वाढत असला तरी, पारंपरिक तेल व वायू क्षेत्रातील गुंतवणूक थांबल्यास जागतिक तेल उत्पादन दरवर्षी ८ टक्के घटेल. त्यामुळे ऊर्जा संक्रमणासोबत ऊर्जा सुरक्षा व स्थैर्य राखणे आवश्यक आहे. भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा ऊर्जा ग्राहक असून, २०५० पर्यंत भारताचा जागतिक ऊर्जा मागणीत १० टक्के वाटा असेल. भारतात प्रति व्यक्ती ऊर्जा वापर अजूनही जागतिक सरासरीच्या ५० टक्के इतकाच असल्याने वाढीची मोठी संधी आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Goa Aims for Green Economy: CM Pramod Sawant at Energy Week

Web Summary : Goa is transitioning to a green and blue economy, said CM Sawant at India Energy Week 2026. The state targets 100% renewable energy by 2050, fostering local jobs and national growth. Energy security is vital alongside renewable adoption, stated Union Minister Hardeep Singh Puri.
टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत