शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

गोव्याच्या पर्यटन व्यवसायाचे तीनतेरा, पोलिसांकडूनही लुबाडणूक, मंत्र्यांवर उद्योजकांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 19:29 IST

राज्याच्या पर्यटन व्यवसायासाठी सध्याचे वर्ष हे अत्यंत वाईट आहे असे सांगून गोवा टुर अॅण्ड ट्रॅव्हल या अत्यंत महत्त्वाच्या संघटनेने शुक्रवारी सरकारवर चौफेर हल्ला चढविला.

पणजी : राज्याच्या पर्यटन व्यवसायासाठी सध्याचे वर्ष हे अत्यंत वाईट आहे असे सांगून गोवा टुर अॅण्ड ट्रॅव्हल या अत्यंत महत्त्वाच्या संघटनेने शुक्रवारी सरकारवर चौफेर हल्ला चढविला. पोलिस, टॅक्सी व्यवसायिक व इतरांकडून पर्यटकांचा छळ केला जातो. पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांना तर पर्यटनातील काही कळतच नाही, अशा शब्दांत टुर अॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशनच्या काही सदस्यांनी टीका सोडले.

संघटनेचे अध्यक्ष सावियो मेसायस, माजी अध्यक्ष फ्रान्सिस ब्रागांझा, ज्ॉक सुखिजा, श्री. धोंड, थॉमस कुकचे अनस डायस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. सरकार दरवर्षी गोव्यात पर्यटकांची संख्या खूपच मोठी सांगत आहे. प्रत्यक्षात आमचा त्या आकडेवारीवर मुळीच विश्वास नाही. सरकारने आमच्यासोबत संयुक्तपणो डिसेंबर महिन्यात सव्रेक्षण करून घ्यावे. मग खरी आकडेवारी कळेल, असे सावियो मेसायस यांनी सांगितले. मुख्यमंत्री मनोहर र्पीकर हे 2क्17 च्या निवडणूक निकालानंतर सरकार स्थापन करत होते तेव्हा आम्ही त्यांना भेटलो होतो. खाण धंदा बंद झाल्याने पर्यटन व्यवसाय तरी नीट चालावा म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती पर्यटन मंत्रीपदी करा अशी विनंती आम्ही त्यांना केली होती व त्यांनी होकार दिला होता. नोटबंदी, जीएसटी अशा केंद्राच्या विविध निर्णयांनी गोव्याच्या पर्यटन व्यवसाय क्षेत्रत मंदी आणली पण पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी अजून एकदाही आम्हाला भेट दिलेली नाही. माविन गुदिन्हो व अन्य सगळे मंत्री मात्र आम्हाला भेटले. आजगावकर का भेटत नाहीत ते कळत नाही. त्यांना पर्यटनातील काही कळतही नाही, असे फ्रान्सिस ब्रागांझा म्हणाले. गोव्यात येणा:या पर्यटकांची गाडी अगोदर पोलिस अडवतात. पर्यटक म्हणजे जणू गुन्हेगारच आहे असे मानले जाते. 4क् टक्के पर्यटक संख्या कमी झाली आहे. चार्टर विमान ऑपरेटर्स गोव्याकडे पाठ फिरवत आहेत. टॅक्सी व्यवसायिक व टॅक्सी चालकांविरुद्ध विदेशी पर्यटकांकडून आमच्याकडे दर आठवडय़ाला किमान दोन तरी तक्रारी येतात. त्यांच्याकडून लुबाडणूक केली जाते असे पर्यटक सांगतात. डिजीटल मीटर, अॅप सिस्टम वगैरे टॅक्सींसाठी सरकारने लवकर आणावी, अशी मागणी मेसायस यांनी केली.

विवाह सोहळेही अडतातजास्त खर्च न करणा:या तसेच पर्यावरणाविषयी काही देणोघेणो नसलेल्या व चांगले वर्तनही न करणा:या देशी पर्यटकांचे प्रमाण अपेक्षेपेक्षा जास्त वाढत आहे ही गोष्ट चांगली नव्हे. त्यांच्या प्रमाणाचे व्यवस्थापन करायला हवे. कळंगुटच्या पट्टय़ातील हॉटेल व्यवसायिक तर अशा पर्यटकांना कंटाळले आहेत. राज्यात नोंदणी न करता शेकडो छोटी हॉटेल्स चालवली जात आहेत. त्यांच्याकडून सरकारला काही महसुलही मिळत नाही. त्याकडे सरकारने लक्ष द्यावे. गोव्यात मोठे विवाह सोहळे आयोजित करण्यासाठी जीसीङोडएम, पंचायत व अन्य ब:याच यंत्रणांची परवानगी घ्यावी लागते. जीसीङोडएमची बैठक तर महिन्याला दोनचवेळा होते. परवानगीवीना विवाह सोहळे रद्द करावे लागतात. केरळमध्ये तर कोणतेच शूल्क व परवान्यांवीना विवाह सोहळे पार पडतात. असे मेसायस म्हणाले. 

गोव्यातील कचरा समस्या, वारंवार खोदले जाणारे रस्ते, अस्वच्छ किनारे या सगळ्य़ा समस्यांमुळे पर्यटक गोव्याला कंटाळतात. किनारे स्वच्छ ठेवण्याचे काम हे पर्यटन खात्याला जमत नाही, तरीही किनारपट्टी कंत्रटासाठी निविदा तेच खाते जारी करते. सन बर्न, सेरंडिपीटी आदी महोत्सव गोव्यात झाले तर जास्त पर्यटक येतात. मात्र विविध प्रकारच्या परवान्या व विविध प्रकारचे शूल्क महोत्सवाच्या आयोजकांना भरावे लागते. आम्ही तर म्हणतो की अशा महोत्सवांसाठी शुल्क आकारले जाऊ नये, असे मेसायस म्हणाले.

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन