शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या पर्यटन व्यवसायाचे तीनतेरा, पोलिसांकडूनही लुबाडणूक, मंत्र्यांवर उद्योजकांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 19:29 IST

राज्याच्या पर्यटन व्यवसायासाठी सध्याचे वर्ष हे अत्यंत वाईट आहे असे सांगून गोवा टुर अॅण्ड ट्रॅव्हल या अत्यंत महत्त्वाच्या संघटनेने शुक्रवारी सरकारवर चौफेर हल्ला चढविला.

पणजी : राज्याच्या पर्यटन व्यवसायासाठी सध्याचे वर्ष हे अत्यंत वाईट आहे असे सांगून गोवा टुर अॅण्ड ट्रॅव्हल या अत्यंत महत्त्वाच्या संघटनेने शुक्रवारी सरकारवर चौफेर हल्ला चढविला. पोलिस, टॅक्सी व्यवसायिक व इतरांकडून पर्यटकांचा छळ केला जातो. पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांना तर पर्यटनातील काही कळतच नाही, अशा शब्दांत टुर अॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशनच्या काही सदस्यांनी टीका सोडले.

संघटनेचे अध्यक्ष सावियो मेसायस, माजी अध्यक्ष फ्रान्सिस ब्रागांझा, ज्ॉक सुखिजा, श्री. धोंड, थॉमस कुकचे अनस डायस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. सरकार दरवर्षी गोव्यात पर्यटकांची संख्या खूपच मोठी सांगत आहे. प्रत्यक्षात आमचा त्या आकडेवारीवर मुळीच विश्वास नाही. सरकारने आमच्यासोबत संयुक्तपणो डिसेंबर महिन्यात सव्रेक्षण करून घ्यावे. मग खरी आकडेवारी कळेल, असे सावियो मेसायस यांनी सांगितले. मुख्यमंत्री मनोहर र्पीकर हे 2क्17 च्या निवडणूक निकालानंतर सरकार स्थापन करत होते तेव्हा आम्ही त्यांना भेटलो होतो. खाण धंदा बंद झाल्याने पर्यटन व्यवसाय तरी नीट चालावा म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती पर्यटन मंत्रीपदी करा अशी विनंती आम्ही त्यांना केली होती व त्यांनी होकार दिला होता. नोटबंदी, जीएसटी अशा केंद्राच्या विविध निर्णयांनी गोव्याच्या पर्यटन व्यवसाय क्षेत्रत मंदी आणली पण पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी अजून एकदाही आम्हाला भेट दिलेली नाही. माविन गुदिन्हो व अन्य सगळे मंत्री मात्र आम्हाला भेटले. आजगावकर का भेटत नाहीत ते कळत नाही. त्यांना पर्यटनातील काही कळतही नाही, असे फ्रान्सिस ब्रागांझा म्हणाले. गोव्यात येणा:या पर्यटकांची गाडी अगोदर पोलिस अडवतात. पर्यटक म्हणजे जणू गुन्हेगारच आहे असे मानले जाते. 4क् टक्के पर्यटक संख्या कमी झाली आहे. चार्टर विमान ऑपरेटर्स गोव्याकडे पाठ फिरवत आहेत. टॅक्सी व्यवसायिक व टॅक्सी चालकांविरुद्ध विदेशी पर्यटकांकडून आमच्याकडे दर आठवडय़ाला किमान दोन तरी तक्रारी येतात. त्यांच्याकडून लुबाडणूक केली जाते असे पर्यटक सांगतात. डिजीटल मीटर, अॅप सिस्टम वगैरे टॅक्सींसाठी सरकारने लवकर आणावी, अशी मागणी मेसायस यांनी केली.

विवाह सोहळेही अडतातजास्त खर्च न करणा:या तसेच पर्यावरणाविषयी काही देणोघेणो नसलेल्या व चांगले वर्तनही न करणा:या देशी पर्यटकांचे प्रमाण अपेक्षेपेक्षा जास्त वाढत आहे ही गोष्ट चांगली नव्हे. त्यांच्या प्रमाणाचे व्यवस्थापन करायला हवे. कळंगुटच्या पट्टय़ातील हॉटेल व्यवसायिक तर अशा पर्यटकांना कंटाळले आहेत. राज्यात नोंदणी न करता शेकडो छोटी हॉटेल्स चालवली जात आहेत. त्यांच्याकडून सरकारला काही महसुलही मिळत नाही. त्याकडे सरकारने लक्ष द्यावे. गोव्यात मोठे विवाह सोहळे आयोजित करण्यासाठी जीसीङोडएम, पंचायत व अन्य ब:याच यंत्रणांची परवानगी घ्यावी लागते. जीसीङोडएमची बैठक तर महिन्याला दोनचवेळा होते. परवानगीवीना विवाह सोहळे रद्द करावे लागतात. केरळमध्ये तर कोणतेच शूल्क व परवान्यांवीना विवाह सोहळे पार पडतात. असे मेसायस म्हणाले. 

गोव्यातील कचरा समस्या, वारंवार खोदले जाणारे रस्ते, अस्वच्छ किनारे या सगळ्य़ा समस्यांमुळे पर्यटक गोव्याला कंटाळतात. किनारे स्वच्छ ठेवण्याचे काम हे पर्यटन खात्याला जमत नाही, तरीही किनारपट्टी कंत्रटासाठी निविदा तेच खाते जारी करते. सन बर्न, सेरंडिपीटी आदी महोत्सव गोव्यात झाले तर जास्त पर्यटक येतात. मात्र विविध प्रकारच्या परवान्या व विविध प्रकारचे शूल्क महोत्सवाच्या आयोजकांना भरावे लागते. आम्ही तर म्हणतो की अशा महोत्सवांसाठी शुल्क आकारले जाऊ नये, असे मेसायस म्हणाले.

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन