शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

राज्य संकटात, गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण तब्बल १३ टक्क्यांनी वाढले: विजय सरदेसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 07:54 IST

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत हल्लाबोल

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे. गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण १३ टक्क्यांनी वाढले तर उत्तर गोव्यात घरफोड्या व चोऱ्यांचे प्रमाण २५ टक्क्यांनी वाढले, असा दावा करीत विरोधी आमदार विजय सरदेसाई यांनी काल विधानसभेत सरकारवर हल्लाबोल केला.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेवेळी बोलताना सरदेसाई यांनी सरकार विविध आघाड्यांवर अपयशी ठरले असल्याची घणाघाती टीका केली. ते म्हणाले की, आकडेवारी पाहिल्यास २०२३ च्या तुलनेत गेल्यावर्षी २०२४ मध्ये राज्यात गंभीर गुन्हे १३ टक्क्याने वाढले. पोलिस केश कर्तनालयांमध्ये न्हाव्यांकडूनही खंडणी उकळत आहेत.

या सरकारने गोवा विकायला काढला आहे, अशी टीका करत सरदेसाई यांनी ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम भाडेपट्टीवर देण्यास जोरदार विरोध केला. ते म्हणाले की, जनसंघाच्या संस्थापकाचे नाव दिलेला हा स्टेडियम सरकार लाटू पाहत आहे. हे सरकार गोवा विकायलाही मागे पुढे पाहणार नाही.

दिल्लीतील धनाढ्य लोक गोव्यात जमिनी खरेदी करता एवढेच माहित होते. परंतु आता दिल्लीतील पर्यटक गोव्यात येऊन स्थानिकांना मारहाणही करू लागले आहेत ही मोठी शोकांतिका आहे.

सरकारच्या आर्थिक स्थितीवर टीका करताना सरदेसाई म्हणाले की, कर्ज काढून सण साजरे करण्याचा प्रकार चालला आहे. सरकारकडे पैसे नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या मार्गातून लोकांच्या खिशाला कात्री लावली जात आहे. साऊंड सिस्टमसाठी परवानगी घेताना आता वेगवेगळे शुल्क लागू केले आहे. ही अधिकृत खंडणीच आहे.'

काँग्रेस आमदार कार्ल्स फेरेरा यांनी महिला तसेच वृद्धांना सरकारच्या कल्याणकारी योजनांचे पैसे दोन ते तीन महिने मिळतच नाहीत. थेट बँकेत पैसे जमा करण्याची योजना फसली आहे, अशी टीका केली. ते म्हणाले की, 'सरकार राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे.

उत्तर प्रदेश होऊन आरोपी पकडून आणताना तो मुंबईत पोलिसांच्या हातून निसटतो व असे असूनही संबंधित पोलिसांवर कोणतीच कारवाई केली जात नाही. गिरी येथे मोठ्या प्रमाणात ड्रग्सचे घबाड पकडले जाते परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स आले कुठून याचा शोध पोलिस घेत नाहीत. मार्केटिंग फेडरेशनमध्ये व्यवस्थापकीय संचालकांकडून २९ लाखांचा घोटाळा केला जातो. पण त्याच्यावर कारवाई केली जात नाही. पर्यटक गोव्यात येतात आणि स्थानिकांना मारहाण करतात. परंतु कोणतीच कारवाई होत नाही. सरकार सर्व बाबतीत अपयशी ठरले आहे.'

बिहारदिन कसला साजरा करताय?

गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व जपले, तो सार्वमतदिन साजरा करण्याचे टाळले जाते व बिहारदिन मात्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, अशी टीकाही सरदेसाई यांनी सरकारवर केली. ते म्हणाले की, आसामामध्ये बिहारदिन साजरा करण्याचे बंद केले आहे. सावंत सरकार ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत त्या राज्यांचे दिन आता साजरे करायला निघाले आहे, हे गोवेकरांचे दुर्दैव होय.

गुन्हेगारीवर वचक हवाच

राज्यात वाढत्या गुन्हेगारीचा स्थानिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. नोकरी-व्यवसायानिमित्त तसेच पर्यटनासाठी परराज्यातून येणाऱ्यांवर पोलिसांचा वॉच नाही. त्यामुळे गोवा गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान बनत असून यावर गांभीर्याने विचार व्हायला हवा, असेही सरदेसाई म्हणाले.

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभा