शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

गोव्यात दहावीचा विक्रमी ९१.२७ टक्के निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 16:46 IST

गोवा शालांत मंडळाने एप्रिलमध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल ९१.२७ टक्के इतका लागला आहे. ७८ माध्यमिक विद्यालयांचा निकाल १00 टक्के लागला असून यात २१ सरकारी तर ५७ अनुदानित माध्यमिक विद्यालये आहेत. निकालात मुलींनीच बाजी मारली.

 पणजी - गोवा शालांत मंडळाने एप्रिलमध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल ९१.२७ टक्के इतका लागला आहे. ७८ माध्यमिक विद्यालयांचा निकाल १00 टक्के लागला असून यात २१ सरकारी तर ५७ अनुदानित माध्यमिक विद्यालये आहेत. निकालात मुलींनीच बाजी मारली.

गोवा शालांत मंडळाचे चेअरमन रामकृष्ण सामंत यांनी आज दुपारी पर्वरी येथे पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. यावेळी बोर्डाचे सचिव भगिरथ शेट्ये, साहाय्यक सचिव ज्योत्ना सरीन तसेच बोर्डाचे आयटी विभागाचे प्रमुख भरत चोपडे उपस्थित होते. १९,५९६  विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यातील १७,८८६ उत्तीर्ण झाले. एकूण २७ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आल्या. काही विषय वगळून परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ६६५ होती. पैकी २५६ उत्तीर्ण झाले. एकूण १0,१५८ मुलगे परीक्षेला बसले त्यातील ९00९ म्हणजेच ८८.६९ टक्के उत्तीर्ण झाले तर १0,0९३ मुलींनी परीक्षा दिली त्यातील ९१३३ म्हणजेच ९0.४९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. गेल्या वर्षी ९१.५७ टक्के इतका निकाल लागला होता. यंदाचा निकाल त्यापेक्षा किंचित कमी आहे.

          क्रीडा गुणांचा ३७६ जणांना प्रत्यक्ष लाभ 

एकूण ८४५१ विद्यार्थ्यांना क्रीडा गुण देण्यात आले. काही विषयांमध्ये नापास झाल्याने उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्यक्षात ३७६ जणांना या गुणांचा लाभ झाला. ही टक्केवारी ४.0४ टक्के इतकी आहे. विक्रमी निकालाची अनेक कारणे सांगितली जात आहेत. नॅशनल स्कीम क्वालिफाइड फ्रेमवर्क अभ्यासक्रम लागू केल्याने हे विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही सहा विषयात उत्तीर्ण झाले तरी उत्तीर्ण घोषित केले जाते. विक्रमी निकालाचे हे एक कारण आहेच शिवाय क्रीडा गुण, व्यावसायिकपूर्व विषय आणि विशेष गरजा असलेल्या मुलांना योग्य त्या सोयी सुविधा दिल्या हीदेखिल विक्रमी निकालाची कारणे असल्याचा दावा त्यांनी केला. 

विशेष मुलांचीही उत्कृष्ट कामगिरी 

दरम्यान, विशेष गरजा असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी बजावली. अशा विद्यार्थ्यांसाठी असलेले पर्वरीचे संजय स्कूल, ढवळी व प्रियोळ येथील लोकविश्वासन प्रतिष्ठानचे स्कूल तसेच जुने गोवें येथील झेवियर अकादमी स्कूल या चारही विद्यालयांनी १00 टक्के निकाल प्राप्त केला. 

१५ जूनपासून पुरवणी परीक्षा 

३३ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळालेल्या आणि ‘सुधारणा हवी’ असा शेरा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी १५ जूनपासून पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी २९ मे ते ७ जून या कालावधीत केवळ आॅनलाइन अर्ज स्वीकारले जातील. ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहेत आणि त्यांना गुणांमध्ये सुधारणा हवी असेल तर त्यांनीही ही परीक्षा देता येईल. रिव्हॅल्युएशनसाठी १ जूनपर्यंत, उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रतीसाठी ५ जूनपर्यंत तर व्हेरिफिकेशनसाठी २ जूनपर्यंत अर्ज सादर करता येतील. 

 

गेल्या पाच वर्षातील दहावीचा निकाल

२0१३    -     ८५.३४ टक्के

२0१४  -       ८३.५१ टक्के

२0१५    -     ८५.१५ टक्के

२0१६    -      ९0.९३ टक्के

२0१७    -      ९१.५७ टक्के

टॅग्स :goaगोवाSSC Results 2018दहावी निकाल २०१८Education Sectorशिक्षण क्षेत्र