शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

गोव्यात दहावीचा विक्रमी ९१.२७ टक्के निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 16:46 IST

गोवा शालांत मंडळाने एप्रिलमध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल ९१.२७ टक्के इतका लागला आहे. ७८ माध्यमिक विद्यालयांचा निकाल १00 टक्के लागला असून यात २१ सरकारी तर ५७ अनुदानित माध्यमिक विद्यालये आहेत. निकालात मुलींनीच बाजी मारली.

 पणजी - गोवा शालांत मंडळाने एप्रिलमध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल ९१.२७ टक्के इतका लागला आहे. ७८ माध्यमिक विद्यालयांचा निकाल १00 टक्के लागला असून यात २१ सरकारी तर ५७ अनुदानित माध्यमिक विद्यालये आहेत. निकालात मुलींनीच बाजी मारली.

गोवा शालांत मंडळाचे चेअरमन रामकृष्ण सामंत यांनी आज दुपारी पर्वरी येथे पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. यावेळी बोर्डाचे सचिव भगिरथ शेट्ये, साहाय्यक सचिव ज्योत्ना सरीन तसेच बोर्डाचे आयटी विभागाचे प्रमुख भरत चोपडे उपस्थित होते. १९,५९६  विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यातील १७,८८६ उत्तीर्ण झाले. एकूण २७ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आल्या. काही विषय वगळून परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ६६५ होती. पैकी २५६ उत्तीर्ण झाले. एकूण १0,१५८ मुलगे परीक्षेला बसले त्यातील ९00९ म्हणजेच ८८.६९ टक्के उत्तीर्ण झाले तर १0,0९३ मुलींनी परीक्षा दिली त्यातील ९१३३ म्हणजेच ९0.४९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. गेल्या वर्षी ९१.५७ टक्के इतका निकाल लागला होता. यंदाचा निकाल त्यापेक्षा किंचित कमी आहे.

          क्रीडा गुणांचा ३७६ जणांना प्रत्यक्ष लाभ 

एकूण ८४५१ विद्यार्थ्यांना क्रीडा गुण देण्यात आले. काही विषयांमध्ये नापास झाल्याने उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्यक्षात ३७६ जणांना या गुणांचा लाभ झाला. ही टक्केवारी ४.0४ टक्के इतकी आहे. विक्रमी निकालाची अनेक कारणे सांगितली जात आहेत. नॅशनल स्कीम क्वालिफाइड फ्रेमवर्क अभ्यासक्रम लागू केल्याने हे विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही सहा विषयात उत्तीर्ण झाले तरी उत्तीर्ण घोषित केले जाते. विक्रमी निकालाचे हे एक कारण आहेच शिवाय क्रीडा गुण, व्यावसायिकपूर्व विषय आणि विशेष गरजा असलेल्या मुलांना योग्य त्या सोयी सुविधा दिल्या हीदेखिल विक्रमी निकालाची कारणे असल्याचा दावा त्यांनी केला. 

विशेष मुलांचीही उत्कृष्ट कामगिरी 

दरम्यान, विशेष गरजा असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी बजावली. अशा विद्यार्थ्यांसाठी असलेले पर्वरीचे संजय स्कूल, ढवळी व प्रियोळ येथील लोकविश्वासन प्रतिष्ठानचे स्कूल तसेच जुने गोवें येथील झेवियर अकादमी स्कूल या चारही विद्यालयांनी १00 टक्के निकाल प्राप्त केला. 

१५ जूनपासून पुरवणी परीक्षा 

३३ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळालेल्या आणि ‘सुधारणा हवी’ असा शेरा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी १५ जूनपासून पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी २९ मे ते ७ जून या कालावधीत केवळ आॅनलाइन अर्ज स्वीकारले जातील. ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहेत आणि त्यांना गुणांमध्ये सुधारणा हवी असेल तर त्यांनीही ही परीक्षा देता येईल. रिव्हॅल्युएशनसाठी १ जूनपर्यंत, उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रतीसाठी ५ जूनपर्यंत तर व्हेरिफिकेशनसाठी २ जूनपर्यंत अर्ज सादर करता येतील. 

 

गेल्या पाच वर्षातील दहावीचा निकाल

२0१३    -     ८५.३४ टक्के

२0१४  -       ८३.५१ टक्के

२0१५    -     ८५.१५ टक्के

२0१६    -      ९0.९३ टक्के

२0१७    -      ९१.५७ टक्के

टॅग्स :goaगोवाSSC Results 2018दहावी निकाल २०१८Education Sectorशिक्षण क्षेत्र