शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

म्हादईप्रश्नी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे न्या- सुदिन ढवळीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 7:49 PM

कर्नाटकचे केंद्रीय नेते प्रल्हाद जोशी यांच्यासह तेथील सगळे महत्त्वाचे नेते केंद्रीय जलशक्ती मंत्रलयाच्या मंत्र्यांना 26 रोजी भेटतात व दुसऱ्याच दिवशी म्हादई जलतंटा लवादाचा निवाडा अधिसूचित होतो.

पणजी : म्हादई पाणीप्रश्नी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्याहून सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे न्यावे अशी मागणी मगोपचे ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली आहे. गोव्याचे खासदार, केंद्रीय मंत्री, जलसंसाधन मंत्री वगैरे म्हादईप्रश्नी गोव्याचे हितरक्षण करण्यात पूर्ण अपयशी ठरले, अशी टीका ढवळीकर यांनी केली.

कर्नाटकचे केंद्रीय नेते प्रल्हाद जोशी यांच्यासह तेथील सगळे महत्त्वाचे नेते केंद्रीय जलशक्ती मंत्रलयाच्या मंत्र्यांना 26 रोजी भेटतात व दुसऱ्याच दिवशी म्हादई जलतंटा लवादाचा निवाडा अधिसूचित होतो. मात्र गोव्याचे खासदार, केंद्रीय मंत्री, जलसंसाधन मंत्री, मुख्यमंत्री कुणीच दिल्लीत जात नाही. म्हादईप्रश्नी गोव्याच्या मंत्री व मुख्यमंत्र्यांचे केंद्र सरकार काहीच ऐकून घेत नाही असा याचा अर्थ होतो, असे ढवळीकर म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी निदान आता गोव्यातील सर्वपक्षीयांकडून निवेदन तरी लिहून घ्यावे व कडक शब्दांतील निवेदन पंतप्रधानांना पाठवावे, असे ढवळीकर यांनी सूचविले. हा विषय गोव्याच्या हितरक्षणाचा आहे. म्हादईचे परिणाम एवढे गंभीर होतील की, दाबोससह सर्व पाणी पुरवठा योजना बंद पडतील. लोकांना रस्त्यावर उतरावे लागेल. प्रमोद सावंत सभापती होते तेव्हा त्यांनी म्हादईच्या खोऱ्याला भेट देऊन कर्नाटकच्या प्रयत्नांमुळे गोव्यातील गांजे उसगावची पाणी पुरवठा योजना अडचणीत येईल असे म्हटले होते, आता ते का गप्प आहेत ते कळत नाही. लवादाचा निवाडा अधिसूचित होणो म्हणजे केंद्राने पाणी वळविण्यास कर्नाटकला थेट एनओसी दिल्यासारखा अर्थ होतो, असे ढवळीकर म्हणाले.

सरकारची ढोंगबाजी : सावळ 

म्हादईचे पाणी कर्नाटकने काही प्रमाणात वळविल्यामुळे आताच डिचोली नदीचे पाणी कमी झाले आहे व आमठाणो धरणातही पाण्याची पातळी कमी होत असल्याचे माजी आमदार नरेश सावळ यांनी सांगितले. म्हादईप्रश्नी गोवा सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. म्हादई म्हणजे स्वत:ची आई आहे असे सरकारने सांगणो ही निव्वळ ढोंगबाजी आहे, असे सावळ म्हणाले.

म्हादईचे पाणी वळविण्याचे दुष्परिणाम पूर्ण गोव्याला पुढील दहा-पंधरा वर्षात दिसून येतील. येथील निसर्ग, पर्यावरण, जैवसंपदा नष्ट होईल. ज्या हिंटरलँड पर्यटनाच्या गोष्टी सरकार सांगते, ते ग्रामीण भागातील पर्यटनच संपुष्टात येईल, असे मिलिंद पिळगावकर यांनी सांगितले. कुडचिरे, म्हावळींगे सारख्या भागात म्हादईच्या उपनद्यांवर शेती, कुळागरे जगतात. यापुढे तेही नष्ट होईल, असे पिळगावकर म्हणाले. जिल्हा पंचायत निवडणुकीत लोकांनी भाजपला धडा शिकवावा, असे ढवळीकर म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा