शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गोवा सुरक्षा मंचचे दरवाजे शिवसेनेबरोबर युतीसाठी अद्याप खुले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 20:39 IST

गोवा सुरक्षा मंच लोकसभेसाठी दोन्ही उमेदवार येत्या रविवारी ३१ रोजी जाहीर करणार आहे.

पणजी : गोवा सुरक्षा मंच लोकसभेसाठी दोन्ही उमेदवार येत्या रविवारी ३१ रोजी जाहीर करणार आहे. लोकसभा तसेच विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडे युतीचे दरवाजे या पक्षाने अजून खुले ठेवले आहेत. पत्रकार परिषदेत पक्षप्रमुख सुभाष वेलिंगकर म्हणाले की, ‘सेनेकडे युतीचा पर्याय खुला असला तरी मांद्रेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.१0 एप्रिलपर्यंत मांद्रे आणि शिरोडा मतदारसंघात प्रचाराची पहिली फेरी पूर्ण होईल. त्यानंतर आठ दिवसात दुसरी फेरी पूर्ण होईल. पणजी मतदारसंघासाठी अजून तारीख जाहीर झाली नसली तरी आगामी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पर्रीकरांच्या तोडीचा उमेदवार आम्ही देणार आहोत. म्हापशात बूथस्तरीय बैठका पूर्ण झालेल्या आहेत. तेथेही १0 एप्रिलपर्यंत प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली जाईल. लोकसभेसाठी उत्तरेत आणि दक्षिणेत प्रत्येकी एकेक नाव निश्चित झालेले आहे आणि ३१ रोजी या नावांची घोषणा केली जाईल.’ 

 ‘मध्यावधी निवडणुका अटळ’

गोव्यात सध्या राजकीय स्तरावर जे काही चालले आहे ते पाहता विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका अटळ असल्याचे भाकित वेलिंगकर यांनी केले. ते म्हणाले की, केवळ ४ विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर कमीत कमी २५ मतदारंसंघांमध्ये उमेदवार देण्याची तयारी गोसुमंने केली आहे. या मतदारसंघांमध्येही पक्षाचे काम जोमाने सुरु आहे.

 अस्थिकलश कार्यक्रम ‘फ्लॉप शो’ - वेलिंगकर यांची टीका 

 भाजपवर आरोप करताना वेलिंगकर म्हणाले की, ‘दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा अस्थिकलश गावोगावी फिरविण्याचा कार्यक्रम कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याने ‘फ्लॉप शो’ ठरला आहे. पर्रीकरांच्या राजकारणातील प्रतिमेचे भांडवल करण्यासाठी तसेच सहानुभूतीचा फायदा उठविण्यासाठीच अस्थिकलश फिरवण्यात आले. परंतु लोकांनी भाजपला भांडवल करू दिले नाही. लोकहिताच्या अनेक विषयांवर भाजप अपयशी ठरल्याचा आरोप वेलिंगकर यांनी केला. ते म्हणाले की, ‘ बेरोजगारी, म्हादई, सीआरझेड, प्रादेशिक आराखडा, खाणबंदी या प्रश्नांवर भाजपने लोकांची फसवणूक केली.